शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

हाफ चेंज तो कमी महत्त्वाचा कसा?

By admin | Updated: July 10, 2014 19:16 IST

तसं बघितलं गेल्यास मी ‘लोकमत’चा नियमित वाचक, पण मधल्या काळात कामाच्या व्यापात वाचण्यातला सातत्यपणा कमी झाला असला तरी लोकमतबरोबर येणा-या ‘ऑक्सिजन’ पुरवणीची मी आजही दर शुक्रवारी आतुरतेने वाट पहातो.

 

- दीपक म्हस्के
 
तसं बघितलं गेल्यास मी ‘लोकमत’चा नियमित वाचक, पण मधल्या काळात कामाच्या व्यापात वाचण्यातला सातत्यपणा कमी झाला असला तरी लोकमतबरोबर येणा-या ‘ऑक्सिजन’ पुरवणीची मी आजही दर शुक्रवारी आतुरतेने वाट पहातो. ‘ऑक्सिजन’मध्ये अलीकडेच मी ‘आम्ही पाहिला बदल’ या शीर्षकाचा स्वाती चक्रवर्ती यांचा लेख वाचल्याचं आठवतं.
तो लेख वाचत असताना मी पण माङया भूतकाळात शिरलो. आणि माङया डोळ्यासमोर उभं ठाकलं माझं गाव. भोकर तालुक्यात महाराष्ट्र व आंध्रच्या सीमेवर वसलेलं छोटंसं खेडं. खेडं कसले 3क् ते 35 घरांची वस्ती. याच वस्तीला लागून दोन तांडे म्हणजे बंजारा समाज. तसं पाहिल्यास भोकर तालुका माळरानात वसलेला, सिंचनाची कुठलीही व्यवस्था नसलेला, विकासापासून कोसो दूर. अशा या गावात एम.एस.डब्ल्यू.ची पदवी घेऊन मी पाऊल ठेवलं तेव्हाचा हा अनुभव.  
गावातील एखाद्या व्यक्तीकडून काही गुन्हा, अपराध झाला किंवा भांडणं झाली तर त्याची तक्रार पोलीस स्टेशनर्पयत न जाता ती पंचायतीच्या माध्यमातून त्या तक्रारीचे निवारण केलं जातं. सदर तक्रारीत संबंधित व्यक्ती दोषी आढळला की, त्याला गावच्या पंचायत प्रमुखांकडून शिक्षा म्हणून दंड स्वरूपात पैसा वसूल केला जातो. मिळालेल्या पैशातून संध्याकाळी संपूर्ण गावात मटन शिजवून खाल्लं जायचं. या अजब प्रथेचं सुरुवातीला मला नवल वाटलं आणि रागपण आला. म्हणून मी ठरवलं या असल्या प्रथेविरुद्ध आपण उभे ठाकायचं. आणि मग हळूहळू मी असल्या पंचायतीला विरोध करू लागलो. पण माझं ऐकणार कोण?
तुझं शहरातलं शहाणपण इथं चालणार नाही, असं मला सुनावण्यात आलं. मग मी एक शक्कल लढविली. पंचायत व्यवस्था जरी अशीच कायम राहिली तरी गुन्हेगाराला झालेल्या शिक्षेच्या स्वरूपातून मिळणारा पैसा सामाजिक कार्यासाठी वापरावा असं सुचवलं. उदा. त्यामधून गावातील मंदिरासाठी लागणारे पैसे, प्राथमिक शाळेतील मुलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा गोष्टी युवकांना संघटित करून मी पटवून देऊ लागलो. सुरुवातीला याही गोष्टीला प्रचंड विरोध झाला. पण गावपातळीवर युवकांच्या माध्यमातून गावात सार्वजनिक गणोशोत्सवात गाव स्वच्छता मोहीम, वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजूषा आदि कार्यक्रमातून विरोध करणा:या युवकांनाच आम्ही जवळ केलं. त्यांनाही आमचं म्हणणं पटलं. आता त्या पैशातून गावात चार गोष्टी ब:या घडताहेत याचंच मला समाधान आहे. 
गावातील ती जुनी व्यवस्था बदलण्यात मला अपयश आलं हे खरंय, पण मधला मार्ग काढत युवकांच्या मदतीनं काहीतरी बरं घडलं हेही काय कमी?
हे सगळं इथे सांगण्याचं कारण म्हणजे मी काही फार मोठं काम केलंय अशातला भाग नाही; परंतु हा माझा अनुभव तुमच्याशी शेअर करावासा वाटला. संपूर्ण बदल ना सही, छोटा बदल तरी आपण घडवू शकलो एवढाच आनंद वाटून घेतोय या निमित्तानं.