शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

निम्मी वर्गणी गरजूंना

By admin | Updated: August 29, 2014 10:11 IST

सांगलीचा वखारभाग म्हणजे एकेकाळची व्यापारी पेठ. गुजराती आणि राजस्थानी मंडळींचा हा भाग. ५४ वर्षांपूर्वी म्हणजे १९६१ मध्ये वखारभाग, मार्केट यार्डमधील व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी गणेशोत्सव सुरू केला. मंडळाचं नावही ठरलं,

 लक्ष्मीनारायण मंडळ, 

सांगली
 
सांगलीचा वखारभाग म्हणजे एकेकाळची व्यापारी पेठ. गुजराती आणि राजस्थानी मंडळींचा हा भाग. 
५४ वर्षांपूर्वी म्हणजे १९६१ मध्ये वखारभाग, मार्केट यार्डमधील व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी गणेशोत्सव सुरू केला. मंडळाचं नावही ठरलं,
 ‘श्री लक्ष्मीनारायण’. पौराणिक, भव्य, हलत्या देखाव्यांसाठी या मंडळाची जिल्हाभरासह शेजारच्या कर्नाटकातही ख्याती. मात्र आजपासून पंचवीस वर्षांपूर्वीच या मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवासाठी जमा होणार्‍या वर्गणीतून निम्मी वर्गणी केवळ सामाजिक उपक्रमांवर खर्च करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून अगदी नेमानं दरवर्षी दोन ते तीन लाख रुपयांची पुंजी गरजू रुग्णांच्या उपचारासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यासठी बाजूला काढून ठेवली जाते.
पूर्वी मंडळाच्या मिरवणुकीवर हजारो रुपये खर्च होत. त्यावेळी बंकटलाल मालू, हेमंत काबरा, श्रीकांत र्मदा, मनोहर सारडा, लक्ष्मीकांत मालपाणी या तेव्हाच्या ‘तरुण तुर्कां’ची बैठक झाली. त्यांनी मिरवणूक, गुलाल, आतषबाजीला फाटा दिला आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करायची शपथच घेतली! 
शासकीय रुग्णालय, शहरातील खासगी रुग्णालयांना गरजू रुग्णांवर उपचार आणि शस्त्रक्रिया यासाठी धनादेश देण्यात येतो. साधारण दीड लाख रुपयांची मदत केली जाते. मदत कोणाला द्यायची, याचा शोध जाणकार कार्यकर्ते घेतात. दुसरीकडं वस्तीतल्या पालिकांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात येतं. 
मंडळाच्या नावावरील ठेवींच्या व्याजापोटी ५0 हजार रुपये गोळा होतात. उर्वरित वर्गणी कार्यकर्त्यांच्या खिशातून दिली जाते. महत्वाचं म्हणजे डॉल्बी, मिरवणूक, गुलाल, चुरमुर्‍यांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी याला मंडळानं कायम फाटा दिलाय. मंडळाचं आज स्वत:चं ‘माहेश्‍वरी भवन’ नावाचं मंगल कार्यालय आहे, सामाजिक कार्यासाठी ते निम्म्या भाड्यात उपलब्ध करून दिलं जातं.
 
- श्रीनिवास नागे