शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

आपण जगू ना, आपल्यासाठी थोडं तरी!

By admin | Updated: April 10, 2017 17:57 IST

वाटतं त्यापलिकडे उरलंय का काही या दिवसांचं नाविन्य? मारे संकल्प केले तरी ते पूर्णत्वाकडे नेण्यासाठी फारसे कष्टही आपण घेत नाही.

- वैशाली भगवानराव खंडागळेता. जि. परभणीगुढीपाडवा झाला. अजून आपण त्यावेळी आलेले शुभेच्छांचे फोटो डिलीट करतो आहोत.निमित्त काहीही असो गुढीपाडवा किंवा १ जानेवारी सोशल मिडियांवर फॉरवर्ड होणारे मेसेज आणि फोनवर शुभेच्छांचा वर्षाव होतो.वाटतं त्यापलिकडे उरलंय का काही या दिवसांचं नाविन्य? मारे संकल्प केले तरी ते पूर्णत्वाकडे नेण्यासाठी फारसे कष्टही आपण घेत नाही.अर्थात भरमसाठ संकल्प करून अर्धवट सोडण्यापेक्षा आणि त्याचं ओझं वागवण्यापेक्षा सहज सोपं आपल्याला जमल आणि झेपेल असं काही तरी करूयात ना! सोशल मिडिया आपला कितीतरी वेळ फुकट जातो; आणि त्यापलिकडे आपल्याला काही दिसत नाही आणि आपण ते पहायचा प्रयत्न ही करत नाही.मग एक छोटसं काम नक्कीच करू शकतो आपण की सोशल मिडियावर वाया जाणारा वेळ हळूहळू कमी करू शकतो. ओझं न घेता केलं की जमतं सगळं. त्यामुळे आपल्याला आपले छंद जोपसण्यास वेळ मिळेल.तणावयुक्त जीवनामध्ये आपल्याला स्वत:साठी वेळ नाही. सतत धावपळ, दगदग, ताणतणाव आणि उदासिनता मग यामध्ये स्वत: करता वेळच कुठे आपल्याला? स्वत:च्या शरीरासोबत मनही निरोगी ठेवणं फार गरजेचं आहे. व्यायाम आणि आवडणाऱ्या गोष्टीकरता रोज वेळ कसा काढायचा हे ठरवायला हवं. ते केलं तर आपल्याला आपलंच आयुष्य भारी वाटू शकेल. आयुष्यात ज्यांना मनापासून सॉरी म्हणायच त्यांना भेटून सॉरी म्हणणं एवढं कुठं अवघड आहे? आपल्याकरता सतत काहीतरी करणाऱ्या लोकांना तुम्ही माझ्याकरता किती महत्त्वाचे आहात हेही सांगूच ना एकदा तरी. खूप दिवसापासून राहून गेलेलं कामाचा आजपासूनच शुभारंभ करू. आणि काहीच नाही तर ‘एक उनाड दिवस’ मनसोक्त जगत आयुष्यावर भरभरून प्रेम करू.