शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
2
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
3
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
4
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
5
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
6
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
7
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
8
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
9
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
10
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
11
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
12
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
13
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
14
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
15
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
16
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
17
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
18
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!
19
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
20
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल

दिसाड दिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 2:00 AM

-नागनाथ खरातनागनाथ खरात.२३ वर्षांचा हा मुलगा.सभोवतालचं खेड्यापाड्यातलंवास्तव पाहून अस्वस्थ झालेला.त्यानं ठरवलं आपण सिनेमा करू.कथा लिहिली.पैसे हातउसनवार घेतले.मोबाइलवर शूट केलंआणि सांगितली,जागतिकीकरणानंतर बदलत चाललेलीखेड्यापाड्यातली गोष्टफक्त १४ मिनिटांत.आणि आजवर अनेक फिल्म फेस्टिव्हलही या फिल्मनं गाजवले.कसं जमलं त्याला हे?त्याविषयी सांगणारा नागनाथचा हा लेखचार वर्षांपूर्वी सिनेमा बनवायचं, असं जर मी घरी सांगितलं असतं, तर घरच्यांना ...

-नागनाथ खरात

नागनाथ खरात.२३ वर्षांचा हा मुलगा.सभोवतालचं खेड्यापाड्यातलंवास्तव पाहून अस्वस्थ झालेला.त्यानं ठरवलं आपण सिनेमा करू.कथा लिहिली.पैसे हातउसनवार घेतले.मोबाइलवर शूट केलंआणि सांगितली,जागतिकीकरणानंतर बदलत चाललेलीखेड्यापाड्यातली गोष्टफक्त १४ मिनिटांत.आणि आजवर अनेक फिल्म फेस्टिव्हलही या फिल्मनं गाजवले.कसं जमलं त्याला हे?त्याविषयी सांगणारा नागनाथचा हा लेखचार वर्षांपूर्वी सिनेमा बनवायचं, असं जर मी घरी सांगितलं असतं, तर घरच्यांना वेडच लागलं असतं...अकरावी-बारावीत असतानाच वर्तमानपत्रातून- मासिकातून कविता, लेख, छापून आले होते. एका कथेला पारितोषिकही मिळालं होतं. परंतु बोलण्यातला न्यूनगंड, गावाकडून शहरात आल्यामुळे आलेला बुजरेपणा, कोणाजवळही हवं तसं व्यक्त होता न आल्यानं निर्माण झालेली अस्वस्थता. त्यामुळे माणसापेक्षा पुस्तकं, सिनेमागृहं जवळची वाटत...परंतु आईवडिलांनी शेतात राब-राब राबायचं आणि आपण त्याच पैशाचा थेटरात बसून (एसीत) सिनेमा पहायचा, म्हणजे खूप मोठा गुन्हा केल्याचा ‘फील’ यायचा. असे गुन्हे आठवड्याला करत होतो. पण सिनेमा अंगात भिनला होता...शेतीला लागलेला ‘भिरूडा’च्या झळा मला पुण्यात बसायच्याघरची चारबाजूंनी ओढाताण करून असताना मी फिल्मचा विषय काढणं म्हणजे पापच करतो असं वाटायचं. पाठीमागे घराकडे पाहिलं की सगळी फिल्मी स्वप्नं गायीला वेसण घातल्यासारखी आकसून जायची.कुठं तरी नोकरी धरावी म्हणून प्रयत्न करायचो.कामातून एक रुपया कमवायची अक्कल नाही. बºयाचदा मित्राबरोबर केटरिंगच्या वगैरे कामाला जायचो. तिथे जर कोणी कवी म्हणून ओळख करून दिली तर जी घालमेल व्हायची ती शब्दात व्यक्त करण्यापलीकडे आहे.मग तेही बंद केलं......असा सगळ्याच बाजूंनी अंधार पसरलाय असं वाटायचं. आहे ती गावाकडची दहा एकर जमीन विकावी आणि इकडे यावं असं वाटायचं.जीव भयाण उदास व्हायचा......इकडे दुसºया बाजूला ‘स्मार्ट सिटी’ च्या घोषणा होत होत्या, मेट्रोचा धुराळा उडतोय, नुस्ताच टोलेजंग झगमगाट निर्माण होतोय, मीडियादेखील या डोळे टिपणाºया विकासाचा देखावा निर्माण करतोय. पण दुसºया बाजूला ६० टक्के लोक स्वप्नांना मारून जगण्यासाठीच संघर्ष करताहेत.. याची दखल कोणालाच कशी नाही?कवी पाश म्हणतो ना ‘सबसे खतरनाक होता है, सपनो का मर जाना! आज देशातील युवकांची काय अवस्था आहे? पुण्या-मुंबईत येणारे लोंढेच्या लोंढे या देशातील सरकारी धोरणाचीच प्रचिती आहे.‘दिसाड दिस’ या माझ्या शॉर्टफिल्मचं बीज इथेच आहे’. अर्थातच ती काही वरील मुद्द्यांना धरून केलेली फिल्म नाही. ती विद्रोह करत नाही. टीका करत नाही.ती फक्त गोष्ट सांगते..दूरपर्यंत पसरलेली माळराने, कोणीतरी पाठीमागून हंडा घेऊन चाललेली म्हातारी, समकालीन राजकीय, सामाजिक स्थितीचे चित्रण. यात कोणावर टीका नाही, थेटपणे भाष्य नाही. आहे ते अशोक, अब्बास आणि शीतल या माझ्याच जगण्याचं प्रतिबिंब घेऊन आलेल्या तीन लहान मुलांची कथा. ते अप्रत्यक्षरीत्या बºयाचशा बाबींवर भाष्य करतात. जागतिकीकरणानंतर बदललेलं शेतकरी तरुणाचं, गावखेड्याचं एक चित्र सांगतात...चार-साडेचार महिन्यांत पटकथा लिहिली. पण निर्माता मिळणं अवघडच होतं. तीन-चार वर्षे जागतिक सिनेमाशी थोडाफार संबंध आल्यामुळे काहीसा आत्मविश्वास होताच. पण कोणत्याही प्रकारचा ‘कोर्स’ वगैरचं माझ्याकडे प्रमाणपत्र नव्हतं. त्यामुळे कोणी विश्वास ठेवणं दुरापास्त होतं. ‘परंतु आता थांबलो तर आपली फिल्म मरून जाईल’ असं वाटायला लागलं. पुण्यातील एका शिक्षकाकडून दहा हजार रुपये घेतले. दीपक शिंदे नावाच्या मित्राला बरोबर घेऊन मी माझ्या गावी गेलो. (फेब्रुवारी २०१६ मध्ये)‘‘कॉलेजचा १५ मार्कांचा प्रोजेक्ट असल्याचं आणि त्यासाठी आपल्या गावचं शूटिंग करून न्यायचं आहे’’ अशी थाप मी घरी हाणली. कारण फिल्मशूट करायला आलोय असं सांगितलं, असतं तर डोंब उठला असता...सगळं झालं होतं; पण कॅमेरा हवा तसा मिळत नव्हता... मी घाईवर आलो होतो. सगळं गुंडाळून पुण्याला माघारी जावं लागू नये एवढंच वाटत होतं...शेवटी मोबाइलवरच चित्रित करायचा निर्णय घेतला...मोटेवाडीच्या ज्या माळरानातून टिटव्या, पखुर्ड्या, होल्यांची कोटी (घरटी) शोधत लहानपणी फिरायचो, तिथलं चित्रीकरण केलं. शीतल मोटे, दीपक वायदंडे, महादेव खरात या गावातीलच त्या बालकलाकारांनी कामं केली.संकलन झाल्यानंतर पुढचा फिल्म पोहचविण्याचा टप्पा ही तितकाच अवघड होता.टीव्हीवर ज्या लोकांना ऐकायचो, पाहायचो किंवा ज्याचं काम पाहत फिल्म शिकलो, त्यांनीच दिलेल्या प्रतिक्रिया खूप उत्साह वाढवणाºया होत्या. माझ्या नावासकट देशा-परदेशातील महोत्सवात झळकली हाच मोठा दिसाड दिस कडून मिळालेला अवॉर्ड होता.अर्थातच काटेरी वाटेवरचा संघर्ष संपला अशातला भाग नाही. अजून लय लांबचा पल्ला गाठायचाय. परंतु समकालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती मला सतत अस्वस्थ करत असते.रोजगार शून्य विकासाचे इमले उभे राहताहेत. तरुण धड शेतीही करत नाही नोकरीतही तगत नाही. सामान्य माणसे किड्या-मुंगीसारखी कुचलेली जात आहे...दिसाड दिस मधला अब्बास स्थलांतर करतो, हे त्याचेच प्रतीक आहे...अजून काय सांगू, दिसाड दिस जाताहेत, इतकंच..