शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

भारतीय तिरंदाजी संघटनेवर जागतिक संघटनेने केली बंदीची कारवाई; आशियाई अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपदही भारताने गमावले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2018 1:31 AM

दिलेल्या मुदतीमध्ये निवडणूक न घेतल्याने जागतिक तिरंदाजी संघटनेने (वर्ल्ड आर्चेरी) भारतीय तिरंदाजी संघटनेविरुद्ध (एएआय) कठोर निर्णय घेताना त्यांच्यावर बंदीची कारवाई केली. त्याचवेळी, भारतीय तिरंदाजांनाही आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी करुन घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : दिलेल्या मुदतीमध्ये निवडणूक न घेतल्याने जागतिक तिरंदाजी संघटनेने (वर्ल्ड आर्चेरी) भारतीय तिरंदाजी संघटनेविरुद्ध (एएआय) कठोर निर्णय घेताना त्यांच्यावर बंदीची कारवाई केली. त्याचवेळी, भारतीय तिरंदाजांनाही आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी करुन घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.दखल घेण्याची बाब म्हणजे, एएआयने दिलेल्या मुदतीमध्ये निवडणूक न घेतल्याने आणि याविषयी क्रीडा मंत्रालयाकडूनही कोणती हमी न मिळाल्याने जागतिक तिरंदाजी आशिया संघटनेने (डब्ल्यूएए) टोकिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी होणाऱ्या पात्रता स्पर्धेचे यजमानपदही भारताकडून काढून घेतले आहे. यामुळे आता आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेचे यजमानपद थायलंडला बहाल करण्यात आले.शिवाय या प्रकरणाचा सगळा अहवालही ‘डब्ल्यूएए’ने जागतिक तिरंदाजी संघटनेकडे सोपविला आहे. विशेष म्हणजे हा निर्णय ‘डब्ल्यूएए’च्या कार्यकारिणी बैठकीत झाला आणि या बैठकीमध्ये ‘एएआय’चा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता.‘एएआय’च्या न झालेल्या निवडणूकीमुळे जागतिक तिरंदाजी संघटना नाराज आहे. जागतिक तिरंदाजी संघटनेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ‘एएआय’ला २६ जुलैला पाठविलेल्या पत्रामध्ये आशियाई अजिंक्यपद आणि संघटनेच्या निवडणूकीबाबत स्पष्टीकरण मागितले होते. (वृत्तसंस्था)‘एएआय’ला पाठविण्यात आलेल्या पत्रात असेही म्हटले होते की, समाधानकारक उत्तर न दिल्यास आणि निवडणूक प्रक्रीया न केल्यास केवळ ‘एएआय’लाच नाही, तर भारताच्या खेळाडूंनाही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागापासून रोखण्यात येईल. हे पत्र बंदीच्या कारवाईला सामोरे गेलेले माजी सरचिटणीस अनिल कामिनेनी यांना लिहिले गेले होते. हे पत्र कामिनेनी यांनी सर्वोच्च न्यायालयद्वारे नेमण्यात आलेले प्रशासक एस. वाय. कुरेशी यांना सोपविले होते.यावर सूत्रांनी माहिती दिली की, कुरेशी यांनी याबाबत जागतिक संघटनेला भारतीय संघटनेच्या सर्व वस्तुस्थितीची माहिती दिली होती, तसेच आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या आयोजनाबाबतही भरवसा दिला होता. मात्र, जागतिक संघटना कुरेशी यांच्या उत्तरावर समाधानी नव्हते. त्याच बरोबर या स्पर्धेच्या आयोजनाविषयी क्रीडा मंत्रालयाकडूनही कोणत्याही प्रकारची हमी देण्यात आली नाही. दरम्यान ‘जागतिक संघटनेकडून अहवालाचा अंतिम निर्णय येणे अद्याप बाकी आहे.

टॅग्स :Indiaभारत