शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
4
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
5
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
6
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
7
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
8
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
9
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
10
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
12
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
13
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
14
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
15
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
16
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
17
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
18
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
19
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
20
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
Daily Top 2Weekly Top 5

कर्णधारपदाच्या निर्णयासाठी प्रतिक्षा करा - धोनी

By admin | Updated: August 18, 2014 12:55 IST

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील लाजीरवाण्या पराभवानंतर कर्णधारपद सोडणार का या प्रश्नावर उत्तर देताना 'आणखी थोडा वेळ प्रतिक्षा करा' असे सूचक विधान महेंद्रसिंह धोनीने केले आहे.

ऑनलाइन लोकमत 

लंडन, दि. १८ - इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-१ असा दारुण पराभव स्वीकाराव्या लागलेल्या भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आता कर्णधारपद सोडण्याचे संकेत दिले आहे. या पराभवानंतर कर्णधारपद सोडणार का या प्रश्नावर उत्तर देताना 'आणखी थोडा वेळ प्रतिक्षा करा' असे सूचक विधान महेंद्रसिंह धोनीने केले आहे. 
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या तिन्ही कसोटी सामन्यात भारतीय संघांला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर महेंद्रसिंह धोनीने सामन्यानंतर पत्रकार परिषद घेतली. या दारुण पराभवानंतर कर्णधारपद सोडणार का असा प्रश्न धोनीला पत्रकारांनी विचारला. 'या पराभवातून पुन्हा नव्या दमाने उभं राहण्यास मी सक्षम आहे की नाही हे बघण्यासाठी तुम्हाला आणखी काही वेळ प्रतिक्षा करावी लागेल' असे सूचक उत्तर धोनीने दिले आहे. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणून खूप काम केलय का या प्रश्नावरही त्याने 'बहुतेक, हो' असे उत्तर दिले आहे. 
शेवटच्या तीन सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला टक्कर देण्यात सपशेल अपयशी ठरल्याने आम्ही खूप निराश आहोत असे धोनीने सांगितले.  तीन दिवसाच्या आतच हा सामना संपल्यावर धोनीने फलंदाजांनाही सुनावले. 'भारतीय फलंदाजांच्या सुमार कामगिरीचे  हे प्रतिबिंब आहे' असे धोनीने म्हटले आहे. २०११ मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौ-यात भारतीय संघाने लागोपाठ आठ कसोटी सामने गमावले आहेत. तर २०१३ - १४ मध्ये दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि इंग्लंड दौ-यामध्येही भारताची पराभवाची मालिका सुरुच आहे. 
मुरली विजयने चांगली फलंदाजी केली. पण सलामीची जोडी दमदार सुरुवात करुन देण्यात अपयशी ठरत होती. त्यामुळे तिस-या क्रमांकावर येणारा फलंदाज हा सामन्याच्या पहिल्या पाच षटकाच्या आतच मैदानात यायचा. विराट कोहलीलाही सूर सापडला नाही असे धोनीने स्पष्ट केले. सहा फलंदाज घेऊन खेळत असताना झटपट विकेट गेल्यास त्याचा फटका संघाला बसतो. तळाच्या फलंदाज खेळल्यास संघाने ३०० ची मजल गाठली व तेही बाद झाल्यास संघ धावा करण्यासाठी झटत होता असे विश्लेषण धोनी मांडतो. भुवनेश्वर कुमार हा भारताचा एकमेव खेळाडू आहे जो संपूर्ण मालिकेत सातत्त्याने चांगली कामगिरी करत होता असे सांगत धोनीने भुवनेश्वरचे कौतुक केले.