शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

विराटकडे ‘पूर्णवेळ’ नेतृत्व येणार

By admin | Updated: January 6, 2017 01:43 IST

इंग्लंडविरुद्ध १५ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या प्रत्येकी तीन वन-डे आणि टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय निवडकर्ते आज, शुक्रवारी संघ निवड करतील.

मुंबई : इंग्लंडविरुद्ध १५ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या प्रत्येकी तीन वन-डे आणि टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय निवडकर्ते आज, शुक्रवारी संघ निवड करतील. कसोटी संघाचा कर्णधार असलेल्या विराट कोहली याच्याकडे दोन्ही प्रकाराचे नेतृत्वदेखील सोपविले जाईल, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.महेंद्रसिंग धोनी याने बुधवारी रात्री दोन्ही प्रकारच्या क्रिकेटचे कर्णधारपद सोडले. कोहलीकडे नेतृत्व सोपविले जाण्याबाबत कुठलीही शंका नाही; पण निवड करताना संघातील संतुलन राखण्याचे अवघड आव्हान समितीपुढे असेल. अनेक खेळाडू जखमांनी त्रस्त आहेत. मुंबईचे दोन्ही फलंदाज रोहित शर्मा व अजिंक्य रहाणे बाहेर आहेत. यामुळे खराब फॉर्मचा सामना करीत असलेल्या शिखर धवनला के. एल. राहुलसोबत सलामीला पाठविले जाऊ शकते. याशिवाय एकदम नव्या चेहऱ्यावरदेखील विश्वास टाकला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्नाटकचा राहुल जखमी झाल्याने न्यूझीलंड विरुद्ध तो खेळू शकला नव्हता. धवन आॅस्ट्रेलियात अखेरचा वन-डे खेळला होता. पहिल्या दोन्ही सामन्यांत ‘फ्लॉप’ राहिल्यानंतर पुढील तीन सामन्यांत एक शतक आणि दोन अर्धशतके ठोकली होती. इंग्लंडविरुद्ध तिहेरी शतक झळकविणारा करुण नायर याला मर्यादित षटकांच्या सामन्यात संधी दिली जाईल, असे संकेत आहेत.इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत जखमी झालेला आश्विन तमिळनाडूकडून रणजी सामन्यात खेळला नव्हता. त्याच्या उपलब्धतेबाबतही अनिश्चितता आहे. अखेरच्या कसोटीत जखमी झालेला आॅफ स्पिनर जयंत यादव याचे नाव संघात येण्याआधी फिटनेस चाचणी होईल का, हे पाहणे रंजक ठरेल. मोहम्मद शमी आणि धवल कुलकर्णी हे देखील जखमी आहेत.धोनी नेतृत्वाच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी खेळाडू म्हणून उपलब्ध असेल. रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव आणि ईशांत शर्मा यांची नावे संघात निश्चित मानली जात आहेत. हार्दिक पांड्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेदरम्यान जखमी झाला होता. तो आता डी. वाय. पाटील टी-२० स्पर्धेत खेळत आहे. त्यालादेखील संघात स्थान मिळू शकते. सुरेश रैनावर निवडकर्ते विश्वास दाखवितात काय, हे देखील पाहावे लागेल. तो फिट झाल्यानंतरच संघात राहू शकेल. १० आणि १२ जानेवारीला ब्रेबॉर्न स्टेडियमवर दोन सराव सामन्यांचे आयोजन होत आहे. त्यासंदर्भात भारतीय ‘अ’ संघदेखील निवडला जाईल. बैठकीबाबत अधिकृत माहिती देताना बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी म्हणाले. ‘सचिवाचे स्थान रिक्त असल्याने मी स्वत: शिर्के यांचे स्थान घेऊ शकतो.’ इंग्लंड संघाचे रविवारी भारतात आगमन होत आहे. ख्रिसमसनिमित्त हा संघ मायदेशी परत गेला होता. धोनीची जागा घेण्यास कोहली निर्णय सज्जनवी दिल्ली : कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा महेंद्रसिंग धोनीने घेतलेला निर्णय कर्णधारपदाचा राजीनामा योग्य वेळी दिला. कारण कर्णधार म्हणून विराट कोहलीने स्वत:ला सिद्ध केले आहे, असे वक्तव्य राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी केले. विशेष म्हणजे हे वक्तव्य करतानाच त्यांनी संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे सोपविण्यात येणार असल्याचेही संकेत दिले. धोनीच्या कर्णधारपदाच्या राजीनाम्याबद्दल प्रसाद म्हणाले की, ‘जर धोनीने एक वर्ष किंवा सहा महिने आधी निर्णय घेतला असता तर मी चिंतेत पडलो असतो; पण त्याने योग्य वेळी हा निर्णय घेतला आहे. त्याला जाणीव आहे की, कोहलीने स्वत:ला सिद्ध केले आहे आणि कर्णधार म्हणून तो चांगली कामगिरी करीत आहे.’