शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
3
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
4
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
5
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
6
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
7
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
8
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
9
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
10
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
11
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
12
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
13
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
14
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
15
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
16
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
17
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
18
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
19
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
20
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी

विराटकडे ‘पूर्णवेळ’ नेतृत्व येणार

By admin | Updated: January 6, 2017 01:43 IST

इंग्लंडविरुद्ध १५ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या प्रत्येकी तीन वन-डे आणि टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय निवडकर्ते आज, शुक्रवारी संघ निवड करतील.

मुंबई : इंग्लंडविरुद्ध १५ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या प्रत्येकी तीन वन-डे आणि टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय निवडकर्ते आज, शुक्रवारी संघ निवड करतील. कसोटी संघाचा कर्णधार असलेल्या विराट कोहली याच्याकडे दोन्ही प्रकाराचे नेतृत्वदेखील सोपविले जाईल, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.महेंद्रसिंग धोनी याने बुधवारी रात्री दोन्ही प्रकारच्या क्रिकेटचे कर्णधारपद सोडले. कोहलीकडे नेतृत्व सोपविले जाण्याबाबत कुठलीही शंका नाही; पण निवड करताना संघातील संतुलन राखण्याचे अवघड आव्हान समितीपुढे असेल. अनेक खेळाडू जखमांनी त्रस्त आहेत. मुंबईचे दोन्ही फलंदाज रोहित शर्मा व अजिंक्य रहाणे बाहेर आहेत. यामुळे खराब फॉर्मचा सामना करीत असलेल्या शिखर धवनला के. एल. राहुलसोबत सलामीला पाठविले जाऊ शकते. याशिवाय एकदम नव्या चेहऱ्यावरदेखील विश्वास टाकला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्नाटकचा राहुल जखमी झाल्याने न्यूझीलंड विरुद्ध तो खेळू शकला नव्हता. धवन आॅस्ट्रेलियात अखेरचा वन-डे खेळला होता. पहिल्या दोन्ही सामन्यांत ‘फ्लॉप’ राहिल्यानंतर पुढील तीन सामन्यांत एक शतक आणि दोन अर्धशतके ठोकली होती. इंग्लंडविरुद्ध तिहेरी शतक झळकविणारा करुण नायर याला मर्यादित षटकांच्या सामन्यात संधी दिली जाईल, असे संकेत आहेत.इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत जखमी झालेला आश्विन तमिळनाडूकडून रणजी सामन्यात खेळला नव्हता. त्याच्या उपलब्धतेबाबतही अनिश्चितता आहे. अखेरच्या कसोटीत जखमी झालेला आॅफ स्पिनर जयंत यादव याचे नाव संघात येण्याआधी फिटनेस चाचणी होईल का, हे पाहणे रंजक ठरेल. मोहम्मद शमी आणि धवल कुलकर्णी हे देखील जखमी आहेत.धोनी नेतृत्वाच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी खेळाडू म्हणून उपलब्ध असेल. रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव आणि ईशांत शर्मा यांची नावे संघात निश्चित मानली जात आहेत. हार्दिक पांड्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेदरम्यान जखमी झाला होता. तो आता डी. वाय. पाटील टी-२० स्पर्धेत खेळत आहे. त्यालादेखील संघात स्थान मिळू शकते. सुरेश रैनावर निवडकर्ते विश्वास दाखवितात काय, हे देखील पाहावे लागेल. तो फिट झाल्यानंतरच संघात राहू शकेल. १० आणि १२ जानेवारीला ब्रेबॉर्न स्टेडियमवर दोन सराव सामन्यांचे आयोजन होत आहे. त्यासंदर्भात भारतीय ‘अ’ संघदेखील निवडला जाईल. बैठकीबाबत अधिकृत माहिती देताना बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी म्हणाले. ‘सचिवाचे स्थान रिक्त असल्याने मी स्वत: शिर्के यांचे स्थान घेऊ शकतो.’ इंग्लंड संघाचे रविवारी भारतात आगमन होत आहे. ख्रिसमसनिमित्त हा संघ मायदेशी परत गेला होता. धोनीची जागा घेण्यास कोहली निर्णय सज्जनवी दिल्ली : कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा महेंद्रसिंग धोनीने घेतलेला निर्णय कर्णधारपदाचा राजीनामा योग्य वेळी दिला. कारण कर्णधार म्हणून विराट कोहलीने स्वत:ला सिद्ध केले आहे, असे वक्तव्य राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी केले. विशेष म्हणजे हे वक्तव्य करतानाच त्यांनी संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे सोपविण्यात येणार असल्याचेही संकेत दिले. धोनीच्या कर्णधारपदाच्या राजीनाम्याबद्दल प्रसाद म्हणाले की, ‘जर धोनीने एक वर्ष किंवा सहा महिने आधी निर्णय घेतला असता तर मी चिंतेत पडलो असतो; पण त्याने योग्य वेळी हा निर्णय घेतला आहे. त्याला जाणीव आहे की, कोहलीने स्वत:ला सिद्ध केले आहे आणि कर्णधार म्हणून तो चांगली कामगिरी करीत आहे.’