शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

विराटकडे ‘पूर्णवेळ’ नेतृत्व येणार

By admin | Updated: January 6, 2017 01:43 IST

इंग्लंडविरुद्ध १५ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या प्रत्येकी तीन वन-डे आणि टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय निवडकर्ते आज, शुक्रवारी संघ निवड करतील.

मुंबई : इंग्लंडविरुद्ध १५ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या प्रत्येकी तीन वन-डे आणि टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय निवडकर्ते आज, शुक्रवारी संघ निवड करतील. कसोटी संघाचा कर्णधार असलेल्या विराट कोहली याच्याकडे दोन्ही प्रकाराचे नेतृत्वदेखील सोपविले जाईल, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.महेंद्रसिंग धोनी याने बुधवारी रात्री दोन्ही प्रकारच्या क्रिकेटचे कर्णधारपद सोडले. कोहलीकडे नेतृत्व सोपविले जाण्याबाबत कुठलीही शंका नाही; पण निवड करताना संघातील संतुलन राखण्याचे अवघड आव्हान समितीपुढे असेल. अनेक खेळाडू जखमांनी त्रस्त आहेत. मुंबईचे दोन्ही फलंदाज रोहित शर्मा व अजिंक्य रहाणे बाहेर आहेत. यामुळे खराब फॉर्मचा सामना करीत असलेल्या शिखर धवनला के. एल. राहुलसोबत सलामीला पाठविले जाऊ शकते. याशिवाय एकदम नव्या चेहऱ्यावरदेखील विश्वास टाकला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्नाटकचा राहुल जखमी झाल्याने न्यूझीलंड विरुद्ध तो खेळू शकला नव्हता. धवन आॅस्ट्रेलियात अखेरचा वन-डे खेळला होता. पहिल्या दोन्ही सामन्यांत ‘फ्लॉप’ राहिल्यानंतर पुढील तीन सामन्यांत एक शतक आणि दोन अर्धशतके ठोकली होती. इंग्लंडविरुद्ध तिहेरी शतक झळकविणारा करुण नायर याला मर्यादित षटकांच्या सामन्यात संधी दिली जाईल, असे संकेत आहेत.इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत जखमी झालेला आश्विन तमिळनाडूकडून रणजी सामन्यात खेळला नव्हता. त्याच्या उपलब्धतेबाबतही अनिश्चितता आहे. अखेरच्या कसोटीत जखमी झालेला आॅफ स्पिनर जयंत यादव याचे नाव संघात येण्याआधी फिटनेस चाचणी होईल का, हे पाहणे रंजक ठरेल. मोहम्मद शमी आणि धवल कुलकर्णी हे देखील जखमी आहेत.धोनी नेतृत्वाच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी खेळाडू म्हणून उपलब्ध असेल. रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव आणि ईशांत शर्मा यांची नावे संघात निश्चित मानली जात आहेत. हार्दिक पांड्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेदरम्यान जखमी झाला होता. तो आता डी. वाय. पाटील टी-२० स्पर्धेत खेळत आहे. त्यालादेखील संघात स्थान मिळू शकते. सुरेश रैनावर निवडकर्ते विश्वास दाखवितात काय, हे देखील पाहावे लागेल. तो फिट झाल्यानंतरच संघात राहू शकेल. १० आणि १२ जानेवारीला ब्रेबॉर्न स्टेडियमवर दोन सराव सामन्यांचे आयोजन होत आहे. त्यासंदर्भात भारतीय ‘अ’ संघदेखील निवडला जाईल. बैठकीबाबत अधिकृत माहिती देताना बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी म्हणाले. ‘सचिवाचे स्थान रिक्त असल्याने मी स्वत: शिर्के यांचे स्थान घेऊ शकतो.’ इंग्लंड संघाचे रविवारी भारतात आगमन होत आहे. ख्रिसमसनिमित्त हा संघ मायदेशी परत गेला होता. धोनीची जागा घेण्यास कोहली निर्णय सज्जनवी दिल्ली : कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा महेंद्रसिंग धोनीने घेतलेला निर्णय कर्णधारपदाचा राजीनामा योग्य वेळी दिला. कारण कर्णधार म्हणून विराट कोहलीने स्वत:ला सिद्ध केले आहे, असे वक्तव्य राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी केले. विशेष म्हणजे हे वक्तव्य करतानाच त्यांनी संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे सोपविण्यात येणार असल्याचेही संकेत दिले. धोनीच्या कर्णधारपदाच्या राजीनाम्याबद्दल प्रसाद म्हणाले की, ‘जर धोनीने एक वर्ष किंवा सहा महिने आधी निर्णय घेतला असता तर मी चिंतेत पडलो असतो; पण त्याने योग्य वेळी हा निर्णय घेतला आहे. त्याला जाणीव आहे की, कोहलीने स्वत:ला सिद्ध केले आहे आणि कर्णधार म्हणून तो चांगली कामगिरी करीत आहे.’