शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

भारतात कुठलाही धोका नाही : शहरयार खान

By admin | Updated: March 20, 2016 04:06 IST

भारतात आमच्या खेळाडूंच्या जीविताला धोका असल्याचा गाजावाजा करणारे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांना आयसीसी टी-२० चषकासाठी त्यांचा

नवी दिल्ली : भारतात आमच्या खेळाडूंच्या जीविताला धोका असल्याचा गाजावाजा करणारे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांना आयसीसी टी-२० चषकासाठी त्यांचा संघ भारतात दाखल होताच सुरक्षेबाबतची सर्व चिंता संपल्यासारखी वाटत आहे. पाकिस्तान सरकारच्या सुरक्षाविषयक चिंतेमुळे राष्ट्रीय संघ भारतात उशिरा दाखल झाला. याच कारणास्तव संघाला एका सराव सामन्यास देखील मुकावे लागले होते. भारत-पाक हा सामना देखील पाकच्या मागणीवरून धरमशाला येथून कोलकाता येथे हलविण्यात आला हे विशेष. ‘टाइम्स नाऊ’शी बोलताना शहरयार म्हणाले,‘सुरक्षेची चिंता संपली असून अल्लाच्या कृपेने सामने होत आहेत. माझ्यामते मुद्दा राजकीय होता. राजकीय स्वरुपात भारताकडून पाकला अनेक धोके आहेत. एका समूहाकडून पाकला सतत त्रास देण्यात येतो. सुरक्षेबाबतची आमच्या सरकारची चिंता योग्य होती. भारताकडून आश्वासन मिळताच आमच्या सरकारने संघ पाठविण्यात कुठलाही अडसर निर्माण केला नाही. भारताच्या गृहमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आता मला कुठलाही धोका आढळत नाही. आमचे येथे जल्लोषात स्वागत झाले. भारतात आम्हाला पाकपेक्षा अधिक प्रेम मिळते, या पाकचा कर्णधार शाहीद आफ्रिदीच्या वक्तव्यावर बरेच वादळ माजले. यावर शहरयार खान यांचे मत जाणून घेताच ते म्हणाले, मला आफ्रिदीवर विश्वास आहे. त्याच्या बोलण्याचा अर्थ वेगळा काढण्यात आला. त्याला तसे म्हणायचे नव्हतेच. त्याच्या बोलण्याचा अर्थ जो निघाला त्यावर जनता नाराज होती. तो वेगळ्या भाषेत सांगू शकला असता. तरीही लहान लहान गोष्टींवर भाष्य करणे योग्य नाही. आफ्रिदीच्या वक्तव्यापेक्षा त्याचा दृष्टिकोन विचारात घ्यायला हवा, असे माझे मत आहे. मी आफ्रिदीचे समर्थन करतो.’(वृत्तसंस्था)