शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

सरकार, हितधारकांच्या पाठिंब्यामुळे पॅरालिम्पिकमध्ये मिळाले यश !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 5:08 AM

काही पदके थोड्या फरकाने हुकली, पण नेमबाज स्वरूप उन्हाळकर, ॲथलिट संदीप चौधरी, सोमण राणा आणि नवदीप तसेच बॅडमिंटनपटू तरुण ढिल्लन सकीना खातून (पॉवरलिफ्टिंग), राम पाल आणि अमित सरोहा (ॲथ्लेटिक्स) आणि राहुल जाखड (नेमबाजी) यांनी कौतुकास्पद कामगिरी केली.

ठळक मुद्देकाही पदके थोड्या फरकाने हुकली, पण नेमबाज स्वरूप उन्हाळकर, ॲथलिट संदीप चौधरी, सोमण राणा आणि नवदीप तसेच बॅडमिंटनपटू तरुण ढिल्लन सकीना खातून (पॉवरलिफ्टिंग), राम पाल आणि अमित सरोहा (ॲथ्लेटिक्स) आणि राहुल जाखड (नेमबाजी) यांनी कौतुकास्पद कामगिरी केली.

दीपा मलिक

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पाच सुवर्ण आणि आठ रौप्यासह भारताने अभूतपूर्व १९ पदके जिंकली. त्यामुळे माझ्या आनंदाला उधाण आले आहे. नऊ प्रकारात ५४ खेळाडू पाठविण्यात आले तेव्हापासूनच यंदा सर्वोत्तम कामगिरीची मला खात्री होती. १९६८ ला पॅरालिम्पिक सुरू झाल्यापासून २०१६ च्या रिओ आयोजनापर्यंत आमच्या खेळाडूंनी केवळ १२ पदके जिंकली होती. यंदा १९ पदके जिंकून १६२ देशांमध्ये भारत २४व्या स्थानी आला.त्यातही अविस्मरणीय कामगिरीसह पदकांची कमाई केली. सुमित अंतिलने भालाफेकीत विश्वविक्रमासह सुवर्ण, अवनी लेखराने विश्व विक्रमाची बरोबरी करीत सुवर्ण, तर मनीष नरवालने पिस्तूल प्रकारात विक्रमी सुवर्ण पटकविले. निषाद कुमार आणि प्रवीण कुमार यांनी उंच उडीत आशियाई विक्रम प्रस्थापित केले.

काही पदके थोड्या फरकाने हुकली, पण नेमबाज स्वरूप उन्हाळकर, ॲथलिट संदीप चौधरी, सोमण राणा आणि नवदीप तसेच बॅडमिंटनपटू तरुण ढिल्लन सकीना खातून (पॉवरलिफ्टिंग), राम पाल आणि अमित सरोहा (ॲथ्लेटिक्स) आणि राहुल जाखड (नेमबाजी) यांनी कौतुकास्पद कामगिरी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा स्वतः मार्ग दाखवतात, तेव्हा खेळाडूंचे काम सोपे होते. टोकियोकडे रवाना होण्याआधी मोदींनी दोन तास खेळाडूंशी संवाद साधला. पदक जिंकल्यानंतर प्रत्यक्ष बोलून पाठ थोपटली. सर्वोच्च नेतृत्वाकडून, असे प्रोत्साहन मिळणे खेळाडूच्या यशात मोठी भूमिका बजावते.भारतीय खेळाडूंनी हा चमत्कार कसा केला, याबाबत मला वारंवार विचारणा झाली. मी म्हणेन,‘भारत सरकार, पॅरालिम्पिक समिती, पॅरा स्पोर्टसला समर्थन देणारे, राष्ट्रीय क्रीडा महासंघ आणि निमशासकीय संघटना यांच्यातील झालेल्या बदलाचा आणि योग्य समन्वयाचा हा परिणाम आहे.’ पीसीआयमध्ये आम्ही खेळाडूंना केंद्रस्थानी ठेवून काम केले. 

२०१६च्या पॅरालिम्पिकची पदक विजेती म्हणून खेळाडूला सर्वोच्च प्राधान्य दिल्यास सकारात्मक निकाल येऊ शकतात हे मी अनुभवातून सिद्ध केले. रिओमध्ये चार पदके मिळाल्यापासून पॅरास्पोर्ट्सकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलला. दिव्यांग खेळाडू क्षमतेच्या बळावर काहीही करू शकतात, अनेकजण सशक्त व्यासपीठ म्हणून आमच्या खेळाकडे पाहू लागले. धोरणे अधिक सर्वसमावेशक झाली. भारतीय क्रीडा प्राधिकरणाला क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाचा पाठिंबा लाभला. खेळाडूंनी कशाचीही काळजी न करता तयारीवर लक्ष केंद्रित करावे याची खात्री पटली. कोरोनामुळे मर्यादा असताना सरकारने आमच्या तयारीसाठी कुठलीही कसर शिल्लक राखली नाही. भारतात आता पॅरालिम्पिकचे नवे पर्व सुरू झाले, हे मी आत्मविश्वासाने सांगू शकते. टोकियो २०२० ही केवळ सुरुवात आहे.  

टॅग्स :Paralympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धाIndiaभारतGoldसोनं