शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

एका खेळाडूसाठी राजपथवर उतरली होती जनता, तेव्हा सरकारलाही घ्यावे लागले होते नमते 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 12:43 IST

दिल्लीतील राजपथवर 52 वर्षांपूर्वी असेच एक आंदोलन झाले होते. त्याचा परिणाम दिसून आला आणि या निषेधामुळे भारताला असा खेळाडू मिळाला, जो आशियाई चॅम्पियनही झाला. ही स्टोरी आहे भारताचे स्टार अॅथलीट श्रीराम सिंह यांची. 

नवी दिल्ली : भारतीय कुस्तीपटूंनी केलेल्या आंदोलनामुळे देशातील लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. दरम्यान, ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत देशासाठी पदक जिंकणारे खेळाडू आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात जंतरमंतरवर आंदोलन केले. याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. तीन दिवस गोंधळ झाला आणि अखेर क्रीडा मंत्रालयाला या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. पण, हे पहिल्यांदाच घडले नाही. खेळाडूंना हक्क मिळवून देण्यासाठी भारतात यापूर्वीही अशाच प्रकारचे आंदोलन झाले आहे. दिल्लीतील राजपथवर 52 वर्षांपूर्वी असेच एक आंदोलन झाले होते. त्याचा परिणाम दिसून आला आणि या निषेधामुळे भारताला असा खेळाडू मिळाला, जो आशियाई चॅम्पियनही झाला. ही स्टोरी आहे भारताचे स्टार अॅथलीट श्रीराम सिंह यांची. 

श्रीराम सिंह हे भारतातील सर्वात यशस्वी मिडल डिस्टेंस (400 मीटर आणि 800 मीटर) अॅथलेटिक्सपैकी एक आहेत. 1968 मध्ये ते राजपुताना रायफल्समध्ये सामील झाले.  जिथे अॅथलेटिक्स प्रशिक्षक इलियास बाबर यांनी श्रीराम यांना 400 आणि 800 मीटर शर्यतीत सहभागी होण्यास सांगितले.  त्यांनी राष्ट्रीय स्तरावर खूप यश मिळवले. 1970 मध्ये बँकॉक येथे आशियाई क्रीडा स्पर्धा होणार होत्या. श्रीराम हे या स्पर्धेत सहभागी होऊन पदक आणणार, याची सर्वांना खात्री होती.  मात्र, खेळाडूंची नावे जाहीर करताना श्रीराम यांच्या नावाचा समावेश नसल्याचे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

राजपथवर झाला होता निषेधश्रीराम यांची कामगिरी ज्यांना माहीत होती, त्यांना हे आवडले नाही. ज्येष्ठ पत्रकार नॉरिस प्रीतम यांनी एका टीव्ही कार्यक्रमात सांगितले की, दिल्लीचे काही स्थानिक खेळाडू श्रीराम यांच्या समर्थनार्थ पुढे आले. त्यांनी काळी पट्टी बांधून आणि राजपथवर मॅरेथॉन केली. दुसऱ्या दिवशी ही बातमी वर्तमानपत्रात ठळकपणे प्रसिद्ध झाली.  सरकारने याची दखल घेतली आणि त्यानंतर श्रीराम यांना आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी संघात स्थान मिळाले. श्रीराम यांनी आपल्या समर्थकांना निराश केले नाही. त्यांनी 800 मीटरमध्ये रौप्यपदक जिंकले. ही त्यांच्या शानदार कारकिर्दीची फक्त सुरुवात होती.

भारताला जिंकून दिले अनेक पदक!यानंतर, श्रीराम यांनी 1974 मध्ये तेहरान येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 800 मीटरमध्ये सुवर्ण आणि 4X400 मीटर रिलेमध्ये रौप्य पदक जिंकले. तसेच, 1978 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ते 800 मीटर शर्यतीत चॅम्पियन बनले आणि पुन्हा एकदा रिलेमध्ये रौप्यपदक जिंकले. याशिवाय, 1976 च्या मॉन्ट्रियल ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी 800 मीटरच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पात्रता फेरीत त्यांनी 1:45.86 अशी वेळ नोंदवून 14 वर्षे टिकून असलेला आशियाई विक्रम केला. त्याचवेळी त्यांचा हा राष्ट्रीय विक्रम 42 वर्षे भारतात राहिला. 2018 मध्ये जिनसन जॉन्सनने त्यांचा विक्रम मोडला होता.

टॅग्स :delhiदिल्ली