शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

श्रीलंकेला २०१ धावांत गुंडाळले, भारत ३ बाद २१ धावा

By admin | Published: August 30, 2015 11:48 AM

तिस-या व निर्णायक कसोटीत ईशांत शर्माचा भेदक मा-याने श्रीलंकेचा डाव अवघ्या २०१ धावांवर आटोपला आहे. तर दुस-या डावात भारताची स्थिती ३ बाद २१ धावा अशी झाली आहे.

ऑनलाइन लोकमत

कोलंबो, दि. ३० - तिस-या व निर्णायक कसोटीत ईशांत शर्माच्या भेदक मा-यामुळे श्रीलंकेचा पहिला डाव २०१ डावांवर आटोपला असून भारताला १११ धावांची आघाडी घेतली आहे. मात्र दुस-या डावात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत भारताची अवस्था ३ बाद २१ धावा अशी झाली आहे. 

तिस-या दिवशी ८ बाद २९२ धावांवरुन पुढे खेळताना श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारताच्या तळाच्या फलंदाजांना झटपट बाद केले. ईशांत शर्मा ६ तर उमेश यादव ४ धावांवर बाद झाल्याने भारताचा डाव ३१२ धावांवर आटोपला. सलामीवीर चेतेश्वर पुजारा १४५ धावांवर नाबाद राहिला. श्रीलंकेतर्फे धम्मिका प्रशादने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर रंगना हेराथने तीन विकेट घेतल्या.

फलंदाजीसाठी उतरलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारताच्या भेदक मा-यापुढे शरणागती पत्कारली  सलामीवीर उपूल थरंगा ४, कौशल सिल्वा ३ धावांवर बाद झाले. तर दिनेश चंडिमल २३ आणि अँजेलो मॅथ्यूज १ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ करुणारत्ने व लाहिरु थिरीमानेही स्वस्तात बाद झाल्याने श्रीलंकेची अवस्था ६ बाद ४७ धावा अशी झाली होती. मात्र त्यानंतर कुशल परेराने ५५ धावांची खेळी करत लंकेचा डाव सावरला. धम्मिका प्रसाद जायबंदी झाल्याने तो माघारी परतला. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या रंगना हेराथने ४९ धावांची खेळी करत परेराला मोलाची साथ दिली. हे दोघे बाद झाल्यावर प्रसाद पुन्हा मैदानात आला. तो २७ धावांवर बाद झाला. भारतातर्फे ईशांत शर्माने पाच विकेट घेतल्या. ईशांतने कसोटीत पाच विकेट घेण्याची ही सातवी वेळ आहे. स्टुअर्ट बिन्नी व अमित मिश्राने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. उमेश यादवने एक विकेट घेतली. 

दुस-या डावात भारताची सुरुवात निराशाजनक झाली. चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाला. त्यापाठोपाठ लोकेश राहुल २ तर अजिंक्य रहाणे ४ धावांवर बाद झाल्याने भारताची अवस्था ३ बाद २१ अशी झाली.पावसामुळे तिस-या दिवसाचा खेळ लवकर थांबवण्यात आला. त्यामुळे आघाडी घेऊनही भारताचे सलामीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्याने सामन्याला कलाटणी मिळाली आहे.