शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

एक राज्य एक संघटना, मुंबई हॉकीला वाचवा! माजी हॉकीपटूंचे क्रीडामंत्र्यांना पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 3:26 AM

याबाबत ‘एमएचएएल’चे सचिव रामसिंग राठोड यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ‘संघटनेत कायद्यानुसार काम करावे लागते. आम्ही हॉकी महाराष्ट्राची मान्यता घेतली नसती, तर आज मुंबई हॉकी कुठेच दिसली नसती

मुंबई : दिग्गज ऑलिम्पियन हॉकीपटू एम. एम. सोमय्या, जोकिम कार्व्हालो आणि धनराज पिल्ले यांसारख्या अनेक माजी खेळाडूंनी मुंबई हॉकीला वाचविण्यासाठी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांच्याकडे अपील केले आहे. मुंबई संघाला आता राष्ट्रीय स्पर्धेत स्वतंत्रपणे सहभागी होता येणार नसल्याने माजी खेळाडूंनी आवाज उठविला आहे.

‘एक राज्य एक संघटना’ या नियमानुसार हॉकी इंडियाने मुंबई हॉकी संघटनेची (एमएचएएल) मान्यता रद्द करताना राज्यातील एकमेव संघटना म्हणून ‘हॉकी महाराष्ट्र’ला मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे एमएचएएलनेही याविरुद्ध कोणताही आक्षेप न घेता हॉकी महाराष्ट्रला पाठिंबा दर्शविला आहे. जानेवारीमध्ये हॉकी इंडियाने जाहीर केलेला हा निर्णय एक जुलैपासून लागू होईल.

यामुळेच, धनराज पिल्ले, एम. एम. सोमय्या, जोकिम कार्व्हालो, मेर्विन फर्नांडिस, मार्सेलस गोम्स, बलबीरसिंग ग्रेवाल, गुरबक्षसिंग ग्रेवाल, विरेन रस्किन्हा, इक्बालजित सिंग, एलिझा नेल्सन, सेल्मा डीसिल्व्हा आणि मार्गारेट टोस्कानो या माजी आंतररष्ट्रीय हॉकीपटूंनी मुंबई हॉकी वाचविण्यासाठी क्रीडामंत्र्यांसह भारतीय आॅलिम्पिक संघटना प्रमुख (आयओए) नरिंदर बत्रा, सचिव राजीव मेहता आणि हॉकी इंडियाचे अध्यक्ष मुश्ताक अहमद यांच्याकडे ईमेलद्वारे अपील केले आहे. माजी खेळाडूंनी ईमेलमध्य म्हटले आहे की, ‘राष्ट्रीय स्पर्धेत मुंबईच्या संघाला स्वतंत्रपणे सहभागी होण्यापासून रोखण्यात आले, तर मोठे नुकसान होईल. यामुळे भारतीय हॉकी गुणवत्ता कमजोर होईल. यामुळे मुंबईतील खूप कमी खेळाडूंना महाराष्ट्राचे प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळेल.’

याबाबत ‘एमएचएएल’चे सचिव रामसिंग राठोड यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ‘संघटनेत कायद्यानुसार काम करावे लागते. आम्ही हॉकी महाराष्ट्राची मान्यता घेतली नसती, तर आज मुंबई हॉकी कुठेच दिसली नसती. यामध्ये सर्व सदस्य, खेळाडू, पंच, अधिकारी यांचे नुकसान झाले असते. त्यामुळे खेळाडूंचे हित आणि त्यांचे मत जाणून आम्ही हा निर्णय घेतला आहे. मुंबईतील सर्व स्पर्धा महाराष्ट्र संघटनेच्या मान्यतेने खेळविण्यात येतील. त्यामुळे खेळाडूंचे कोणतेही नुकसान होणार नाही.’‘आधी हॉकी इंडिया आता हॉकी महाराष्ट्र’जानेवारीत हॉकी इंडियाचे पत्र मिळाल्यानंतर आम्ही बैठक घेऊन कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्याचा निर्णय घेतला. जर आम्ही हा निर्णय मान्य केला नसता, तर एमएचएएलचे अस्तित्व संपुष्टात आले असते. त्यामुळे आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. अनेकांना असे वाटते की, एमएचएएलने एक पाऊल मागे घेतले आहे, पण तसे नाहीये. आता एकच फरक पडेल की, आधी हॉकी इंडियाला रिपोर्ट करावे लागायचे, ते आता हॉकी महाराष्ट्राला करावे लागेल. राष्ट्रीय स्तरावर खेळाडूंना आता थोड्या प्रमाणात अधिक संघर्ष करावा लागेल हे नक्की. - मंघासिंग बक्षी, अध्यक्ष, एमएचएएल

टॅग्स :Hockeyहॉकी