शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

सरकारचे बॅडमिंटन खेळाडूंना पूर्ण सहकार्य: सायना नेहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 08:20 IST

भारतात फक्त क्रिकेटच प्रसिद्ध झाले असे नाही. गेल्या दशकातील हा सर्वात मोठा बदल आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये आम्ही आमच्या खेळाचा ठसा उमटवू शकतो. भारताचे बरेच खेळाडू जागतिक पातळीवर बऱ्याच खेळांमध्ये चांगली कामगिरी करतात. भारतात फक्त क्रिकेटच प्रसिद्ध झाले असे नाही. गेल्या दशकातील हा सर्वात मोठा बदल आहे. त्याचे चांगले निकाल मिळवल्याने हे होऊ शकले.मी हे मान्य केले पाहिजे की, एक खेळाडू म्हणून मी व्यस्त होते. मला व्यवस्थेकडे जाऊन इतर बाबींसाठी वेळ नव्हता. मात्र हा गेल्या काही वर्षातील हा सकारात्मक बदल आहे. जगभर खेळासाठी म्हणून प्रवास करतांना सरकारने आर्थिकदृष्ट्या सहकार केले. टार्गेट ऑलिम्पिक पोडिअम स्किम (टॉप्स) २०१४-१५ मध्येच सुरू करणे हे मोठे पाऊल होते. एक वेळ होती की आम्हाला काही क्रीडा साहित्य लागले तर ते एनजीओकडे मागावे लागत होते. मात्र आता टॉप्समधून मदत मिळवणे खेळाडूंना सोपे झाले आहे. दर महिन्याला मिळणारा निधी हे मोठे पाऊल ठरले. त्यामुळे प्रशिक्षण, डाएट, आणि स्पर्धांना जाणे सोपे झाले आहे.

एक चांगली बाब म्हणजे खेळाडूंशी संपर्क आणि त्यांना खेळाकडे लक्ष देण्यास प्रोत्साहन देणे, त्यांचा सराव आणि साहित्यामुळे ते चांगली टक्कर देऊ लागले आहेत. मी हे म्हणू शकते की प्रत्येक वर्षीही व्यवस्था चांगली होत आहे. आम्ही नशिबवान आहोत की गेल्या १० ते १५ वर्षात भारताकडे चांगले खेळाडू तयार झाले आहेत. मी हे नमूद करायला हवे की, लोकांनी मला भारतीय बॅडमिंटनमध्ये पायोनियर म्हणून बघितले. आणि आता अव्वल ५० मध्ये अनेक भारतीय खेळाडू आहेत. प्रामाणिकपणे सांगायचे तर मी खेळाची मोठी चाहती नव्हते. मी खेळायला सुरूवात केली तेव्हा मी ऑलिम्पिकला फार महत्त्व दिले नाही. पण २००८ बिजींगसाठी जेव्हा मी निवडले गेले. तेव्हा मी उत्साहित झआले होते. मला युवा खेळाडू म्हणून देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची संधी होती. मी तेथे पदक जिंकू शकले असते पण मला विश्वास होत नाही मी इंडोनेशियाच्या मारिया युलिन्तीविरोधात उपांत्यपुर्व फेरीतील तिसऱ्या गेममध्ये ११-३ असा कसा गमावला. त्यावेळी अपेक्षांचे ओझे नव्हते. 

पण मला ऑलिम्पिक पोडिअमची किंमत कळली. आणि देशाचा झेंडा वर जातांना कसे वाटते हे देखील कळले. मी नंतर लंडन ऑलिम्पिक २०१२ ला कांस्य पदक जिंकले. ती माझी दुसरी ऑलिम्पिक स्पर्धा होती. मला हे कळले की ऑलिम्पिकच्या तयारीसाठी मला खुप जास्त स्पर्धा खेळाव्या लागतील. मी स्वत:ला सुपर सिरीज इव्हेंट्समध्ये सिद्ध केले. त्यानंतर २०१० मध्ये तीन पदके मिळवली. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. 

(सायना नेहवाल ही भारताची २०१२ ची ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती खेळाडू आहे.)

टॅग्स :BadmintonBadmintonSaina Nehwalसायना नेहवाल