शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

सरकारचे बॅडमिंटन खेळाडूंना पूर्ण सहकार्य: सायना नेहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 08:20 IST

भारतात फक्त क्रिकेटच प्रसिद्ध झाले असे नाही. गेल्या दशकातील हा सर्वात मोठा बदल आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये आम्ही आमच्या खेळाचा ठसा उमटवू शकतो. भारताचे बरेच खेळाडू जागतिक पातळीवर बऱ्याच खेळांमध्ये चांगली कामगिरी करतात. भारतात फक्त क्रिकेटच प्रसिद्ध झाले असे नाही. गेल्या दशकातील हा सर्वात मोठा बदल आहे. त्याचे चांगले निकाल मिळवल्याने हे होऊ शकले.मी हे मान्य केले पाहिजे की, एक खेळाडू म्हणून मी व्यस्त होते. मला व्यवस्थेकडे जाऊन इतर बाबींसाठी वेळ नव्हता. मात्र हा गेल्या काही वर्षातील हा सकारात्मक बदल आहे. जगभर खेळासाठी म्हणून प्रवास करतांना सरकारने आर्थिकदृष्ट्या सहकार केले. टार्गेट ऑलिम्पिक पोडिअम स्किम (टॉप्स) २०१४-१५ मध्येच सुरू करणे हे मोठे पाऊल होते. एक वेळ होती की आम्हाला काही क्रीडा साहित्य लागले तर ते एनजीओकडे मागावे लागत होते. मात्र आता टॉप्समधून मदत मिळवणे खेळाडूंना सोपे झाले आहे. दर महिन्याला मिळणारा निधी हे मोठे पाऊल ठरले. त्यामुळे प्रशिक्षण, डाएट, आणि स्पर्धांना जाणे सोपे झाले आहे.

एक चांगली बाब म्हणजे खेळाडूंशी संपर्क आणि त्यांना खेळाकडे लक्ष देण्यास प्रोत्साहन देणे, त्यांचा सराव आणि साहित्यामुळे ते चांगली टक्कर देऊ लागले आहेत. मी हे म्हणू शकते की प्रत्येक वर्षीही व्यवस्था चांगली होत आहे. आम्ही नशिबवान आहोत की गेल्या १० ते १५ वर्षात भारताकडे चांगले खेळाडू तयार झाले आहेत. मी हे नमूद करायला हवे की, लोकांनी मला भारतीय बॅडमिंटनमध्ये पायोनियर म्हणून बघितले. आणि आता अव्वल ५० मध्ये अनेक भारतीय खेळाडू आहेत. प्रामाणिकपणे सांगायचे तर मी खेळाची मोठी चाहती नव्हते. मी खेळायला सुरूवात केली तेव्हा मी ऑलिम्पिकला फार महत्त्व दिले नाही. पण २००८ बिजींगसाठी जेव्हा मी निवडले गेले. तेव्हा मी उत्साहित झआले होते. मला युवा खेळाडू म्हणून देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची संधी होती. मी तेथे पदक जिंकू शकले असते पण मला विश्वास होत नाही मी इंडोनेशियाच्या मारिया युलिन्तीविरोधात उपांत्यपुर्व फेरीतील तिसऱ्या गेममध्ये ११-३ असा कसा गमावला. त्यावेळी अपेक्षांचे ओझे नव्हते. 

पण मला ऑलिम्पिक पोडिअमची किंमत कळली. आणि देशाचा झेंडा वर जातांना कसे वाटते हे देखील कळले. मी नंतर लंडन ऑलिम्पिक २०१२ ला कांस्य पदक जिंकले. ती माझी दुसरी ऑलिम्पिक स्पर्धा होती. मला हे कळले की ऑलिम्पिकच्या तयारीसाठी मला खुप जास्त स्पर्धा खेळाव्या लागतील. मी स्वत:ला सुपर सिरीज इव्हेंट्समध्ये सिद्ध केले. त्यानंतर २०१० मध्ये तीन पदके मिळवली. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. 

(सायना नेहवाल ही भारताची २०१२ ची ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती खेळाडू आहे.)

टॅग्स :BadmintonBadmintonSaina Nehwalसायना नेहवाल