शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

रविचंद्रन आश्विन भारताचा शानदार फिरकीपटू

By admin | Updated: January 4, 2016 03:04 IST

फिरकीपटू आर. आश्विन याच्याकडे विकेट मिळविण्याची शानदार क्षमता आहे. त्याच्या गोलंदाजीत विविधता आहे. कसोटी, एकदिवसीय, टी-टष्ट्वेन्टी या तीनही प्रकारांसाठी त्याने

हैदराबाद : फिरकीपटू आर. आश्विन याच्याकडे विकेट मिळविण्याची शानदार क्षमता आहे. त्याच्या गोलंदाजीत विविधता आहे. कसोटी, एकदिवसीय, टी-टष्ट्वेन्टी या तीनही प्रकारांसाठी त्याने स्वत:ला सिद्ध केले असून, हीच गोष्ट त्याला मॅचविनर गोलंदाज बनविते, अशा शब्दांत भारताचा माजी गोलंदाज व्यंकटपती राजू याने आश्विनची स्तुती केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रमवारीत अव्वल कसोटी गोलंदाजाचे स्थान त्याने पटकावले आहे. याविषयी बोलताना राजू म्हणाला, की भारताकडे प्रत्येक वेळी फिरकी गोलंदाजांची एक सक्षम फळी राहिली आहे. अनिल कुंबळे, हरभजनसिंग यांनीदेखील आपापली भूमिका समर्थपणे सांभाळली. सध्या संघाच्या मुख्य गोलंदाजाची भूमिका आश्विन सांभाळत आहे. आश्विनच्या नैसर्र्गिक गोलंदाजीतच खूप विविधता आहे. त्यामुळे बळी मिळविण्यासाठी त्याला दुसरे काही करण्याची गरज नाही. त्याने स्वत:च्या नैसर्गिक गोलंदाजीपेक्षा इतर काही करण्याचे प्रयोग केले; मात्र तो त्यात यशस्वी झाला नाही. त्याला पुन्हा आपल्याच मूळ शैलीचाच अंगीकार करावा लागला. अक्षर पटेल व रवींद्र जडेजा यांच्याविषयी बोलताना राजू म्हणाला, की संघात प्रतिस्पर्धी असणे एका दृष्टीने चांगले असते. निकोप स्पर्धा असेल तर संघ निवडकर्त्यांसाठी ते आव्हानात्मक असते. या वर्षी भारतात १३ सामने खेळले जाणार आहेत. त्यात फिरकी गोलंदाज महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे सध्या बहरात असलेले खेळाडू आपल्याला हवे आहेत. दुखापत, थकावट यामुळे चांगल्या खेळाडूंची उपलब्धता आवश्यक असते. सामना जिंकण्यासाठी जितकी षटके टाकावी लागतील त्याचा विचार केल्यास संघात तीन फिरकीपटू असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर फिरकीतील विविधता असणे गरजेचे आहे. आपल्याकडे लेग व आॅफस्पिन करणारे गोलंदाज असल्याने चांगले संतुलन आहे. भारतात होत असलेल्या आगामी विश्वचषक टी-२० स्पर्धेत जो संघ शानदार क्षेत्ररक्षण करेल व संधीचा अधिकाधिक फायदा उठवेल, तो संघ वरचढ ठरेल. यजमान भारतीय संघावर प्रेक्षकांचा अधिक दबाव असेल. भारतीय संघाला हरताना पाहणे प्रेक्षकांना नको असते. त्यामुळे असा दबाव झेलून अव्वल कामगिरी करणाऱ्या संघाला विजयाची अधिक संधी असेल. - व्यंकटपती राजू,माजी क्रिकेटपटू