शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
2
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
3
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
4
Test Rankings: आयसीसी टेस्ट क्रमवारीत बुमराहची बादशाहत कायम; मोहम्मद सिराजचेही मोठी झेप!
5
गुंतवणूकदार 'गार', टांगा पलटी घोडे फरार...! बाजारात येताच 40% आपटला शेअर, लोकांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
6
EPFO सदस्यांना मोफत मिळतो लाखो रुपयांचा लाईफ इन्शुरन्स कव्हर! काय आहे EDLI योजना?
7
Max Life पेन्शन फंडाचा परवाना रद्द; लोकांच्या पैशाचं काय होणार? जाणून घ्या
8
Video - देवदूत! भूस्खलनानंतर रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी डॉक्टरने स्वत:चा जीव घातला धोक्यात
9
“PM मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी”: वडेट्टीवार
10
खान कुटुंबात आली परी! अरबाज खान लेकीला घेऊन निघाला; रुग्णालयाबाहेरील व्हिडीओ व्हायरल
11
शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना दिलासा नाही! ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणी अडचणी वाढल्या; न्यायालयाने दिले हे आदेश
12
शेतकऱ्याने तहसील कार्यालयात घेतले विष, खासदार प्रतिभा धानोरकरांवर गंभीर आरोप; मृतदेह स्वीकारण्यास नकार
13
“ठाकरेंची बाजू अतिशय भक्कम, ज्यांची कमकुवत ते प्रकरण पुढे ढकलायचा प्रयत्न करतात”: असीम सरोदे
14
आजपासून पिनसोबतच चेहरा अन् बोटांचे ठसे वापरूनही करा यूपीआयवरून व्यवहार; फसवणुकीला आळा बसणार
15
नात्याला काळीमा! सासूच्या प्रेमात वेडा झाला जावई; पत्नीची केली हत्या, प्रायव्हेट फोटो व्हायरल
16
'डिजिटल अरेस्ट' पासून कसे वाचायचे? समन्स खरे की खोटे असे ओळखा; ईडीने सगळीच माहिती सांगितली
17
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
18
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
19
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
20
भारतासोबतच्या संघर्षादरम्यान मोठी घडामोड; अमेरिका पाकिस्तानला देणार अत्याधुनिक क्षेपणास्त्रे!

रविचंद्रन आश्विन भारताचा शानदार फिरकीपटू

By admin | Updated: January 4, 2016 03:04 IST

फिरकीपटू आर. आश्विन याच्याकडे विकेट मिळविण्याची शानदार क्षमता आहे. त्याच्या गोलंदाजीत विविधता आहे. कसोटी, एकदिवसीय, टी-टष्ट्वेन्टी या तीनही प्रकारांसाठी त्याने

हैदराबाद : फिरकीपटू आर. आश्विन याच्याकडे विकेट मिळविण्याची शानदार क्षमता आहे. त्याच्या गोलंदाजीत विविधता आहे. कसोटी, एकदिवसीय, टी-टष्ट्वेन्टी या तीनही प्रकारांसाठी त्याने स्वत:ला सिद्ध केले असून, हीच गोष्ट त्याला मॅचविनर गोलंदाज बनविते, अशा शब्दांत भारताचा माजी गोलंदाज व्यंकटपती राजू याने आश्विनची स्तुती केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रमवारीत अव्वल कसोटी गोलंदाजाचे स्थान त्याने पटकावले आहे. याविषयी बोलताना राजू म्हणाला, की भारताकडे प्रत्येक वेळी फिरकी गोलंदाजांची एक सक्षम फळी राहिली आहे. अनिल कुंबळे, हरभजनसिंग यांनीदेखील आपापली भूमिका समर्थपणे सांभाळली. सध्या संघाच्या मुख्य गोलंदाजाची भूमिका आश्विन सांभाळत आहे. आश्विनच्या नैसर्र्गिक गोलंदाजीतच खूप विविधता आहे. त्यामुळे बळी मिळविण्यासाठी त्याला दुसरे काही करण्याची गरज नाही. त्याने स्वत:च्या नैसर्गिक गोलंदाजीपेक्षा इतर काही करण्याचे प्रयोग केले; मात्र तो त्यात यशस्वी झाला नाही. त्याला पुन्हा आपल्याच मूळ शैलीचाच अंगीकार करावा लागला. अक्षर पटेल व रवींद्र जडेजा यांच्याविषयी बोलताना राजू म्हणाला, की संघात प्रतिस्पर्धी असणे एका दृष्टीने चांगले असते. निकोप स्पर्धा असेल तर संघ निवडकर्त्यांसाठी ते आव्हानात्मक असते. या वर्षी भारतात १३ सामने खेळले जाणार आहेत. त्यात फिरकी गोलंदाज महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे सध्या बहरात असलेले खेळाडू आपल्याला हवे आहेत. दुखापत, थकावट यामुळे चांगल्या खेळाडूंची उपलब्धता आवश्यक असते. सामना जिंकण्यासाठी जितकी षटके टाकावी लागतील त्याचा विचार केल्यास संघात तीन फिरकीपटू असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर फिरकीतील विविधता असणे गरजेचे आहे. आपल्याकडे लेग व आॅफस्पिन करणारे गोलंदाज असल्याने चांगले संतुलन आहे. भारतात होत असलेल्या आगामी विश्वचषक टी-२० स्पर्धेत जो संघ शानदार क्षेत्ररक्षण करेल व संधीचा अधिकाधिक फायदा उठवेल, तो संघ वरचढ ठरेल. यजमान भारतीय संघावर प्रेक्षकांचा अधिक दबाव असेल. भारतीय संघाला हरताना पाहणे प्रेक्षकांना नको असते. त्यामुळे असा दबाव झेलून अव्वल कामगिरी करणाऱ्या संघाला विजयाची अधिक संधी असेल. - व्यंकटपती राजू,माजी क्रिकेटपटू