शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत भारतीय IT कर्मचाऱ्यांसाठी 'टेन्शन'! H-1B व्हिसा मिळणं ७०% नी घटलं; TCS चाही रिजेक्शन रेट वाढला!
2
Nanded Murder Case : "तुझ्या बहिणीचं ज्याच्यासोबत लफडं त्याला मारुन ये....", सक्षमला मारण्याआधी पोलीस चौकीतील घटनाक्रम; आंचलने सांगितली धक्कादायक माहिती
3
एका झटक्यात चांदीची किंमत ९३८१ रुपयांनी वाढली, सोन्यातही जोरदार वाढ; पाहा नवे दर
4
श्रेयस अय्यरसोबत रिलेशनशिपच्या चर्चांवर अखेर मृणाल ठाकूरने सोडलं मौन; म्हणाली...
5
पाक लष्कराचा 'बॉस' कोण? COAS मुनीर यांचा कार्यकाळ संपला, पण CDFचे पद रिकामेच! नेमका अडसर कशाचा?
6
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
7
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
8
नेव्ही ऑफिसरच्या भूमिकेत दिलजीत दोसांझ, 'बॉर्डर २'मधून अभिनेत्याचा पहिला व्हिडीओ आउट
9
चुकीच्या वेळी दूध प्यायल्याने मुलांच्या वाढीवर परिणाम? सकाळ की संध्याकाळ... 'ही' आहे सर्वोत्तम वेळ
10
लग्नासाठी ऑनलाइन वधू शोधत होता अन् लागला ४९ लाखांचा चुना; पीचडी करण्याऱ्या तरुणासोबत काय घडलं?
11
स्वस्त झाला सिलिंडर; आजपासून किती रुपयांना मिळणार, पाहा ATF च्या किंमतीत किती झाला बदल?
12
भारतीय युवकानं नाकारली ६७ लाखांची जॉब ऑफर; 'वर्क फ्रॉम होम'पासून का काढतायेत पळ? समोर आलं कारण
13
Ajit Pawar: जाहीर सभेत अजित पवारांचा 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख; दादा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले...
14
काळीज हेलावणारी घटना! ७ वर्षांच्या लेकाला वाचवण्यासाठी धावली, आणि भरधाव बसने आईला चिरडले; तीन लेकरांसमोर मातेचा मृत्यू
15
वैभव सूर्यवंशीचा टीम इंडियात धमाका; बिहारमध्ये गेल्यावर बॅटला लागलं 'ग्रहण'
16
खळबळजनक! 'तो' वाद टोकाला गेला, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच विवाहितेसोबत घडलं भयंकर
17
नोकरी करणं गरज नाही तर केवळ छंद राहिल; Nikhil Kamath यांच्या पॉडकॉस्ट मध्ये Elon Musk यांची भविष्यवाणी
18
'तुम्ही चर्चा करत नाही, तो ड्रामा'; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
19
SIP ला लावा 'टॉप-अप'चा बुस्टर! दरवर्षी रक्कम वाढवा आणि तुमचं आर्थिक लक्ष्य वेळेआधी पूर्ण करा!
20
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक समायोजनाला बसला ब्रेक, समायोजन स्थगित; आता २०२५-२६ च्या संचमान्यतेनंतरच प्रक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

रविचंद्रन आश्विन भारताचा शानदार फिरकीपटू

By admin | Updated: January 4, 2016 03:04 IST

फिरकीपटू आर. आश्विन याच्याकडे विकेट मिळविण्याची शानदार क्षमता आहे. त्याच्या गोलंदाजीत विविधता आहे. कसोटी, एकदिवसीय, टी-टष्ट्वेन्टी या तीनही प्रकारांसाठी त्याने

हैदराबाद : फिरकीपटू आर. आश्विन याच्याकडे विकेट मिळविण्याची शानदार क्षमता आहे. त्याच्या गोलंदाजीत विविधता आहे. कसोटी, एकदिवसीय, टी-टष्ट्वेन्टी या तीनही प्रकारांसाठी त्याने स्वत:ला सिद्ध केले असून, हीच गोष्ट त्याला मॅचविनर गोलंदाज बनविते, अशा शब्दांत भारताचा माजी गोलंदाज व्यंकटपती राजू याने आश्विनची स्तुती केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रमवारीत अव्वल कसोटी गोलंदाजाचे स्थान त्याने पटकावले आहे. याविषयी बोलताना राजू म्हणाला, की भारताकडे प्रत्येक वेळी फिरकी गोलंदाजांची एक सक्षम फळी राहिली आहे. अनिल कुंबळे, हरभजनसिंग यांनीदेखील आपापली भूमिका समर्थपणे सांभाळली. सध्या संघाच्या मुख्य गोलंदाजाची भूमिका आश्विन सांभाळत आहे. आश्विनच्या नैसर्र्गिक गोलंदाजीतच खूप विविधता आहे. त्यामुळे बळी मिळविण्यासाठी त्याला दुसरे काही करण्याची गरज नाही. त्याने स्वत:च्या नैसर्गिक गोलंदाजीपेक्षा इतर काही करण्याचे प्रयोग केले; मात्र तो त्यात यशस्वी झाला नाही. त्याला पुन्हा आपल्याच मूळ शैलीचाच अंगीकार करावा लागला. अक्षर पटेल व रवींद्र जडेजा यांच्याविषयी बोलताना राजू म्हणाला, की संघात प्रतिस्पर्धी असणे एका दृष्टीने चांगले असते. निकोप स्पर्धा असेल तर संघ निवडकर्त्यांसाठी ते आव्हानात्मक असते. या वर्षी भारतात १३ सामने खेळले जाणार आहेत. त्यात फिरकी गोलंदाज महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे सध्या बहरात असलेले खेळाडू आपल्याला हवे आहेत. दुखापत, थकावट यामुळे चांगल्या खेळाडूंची उपलब्धता आवश्यक असते. सामना जिंकण्यासाठी जितकी षटके टाकावी लागतील त्याचा विचार केल्यास संघात तीन फिरकीपटू असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर फिरकीतील विविधता असणे गरजेचे आहे. आपल्याकडे लेग व आॅफस्पिन करणारे गोलंदाज असल्याने चांगले संतुलन आहे. भारतात होत असलेल्या आगामी विश्वचषक टी-२० स्पर्धेत जो संघ शानदार क्षेत्ररक्षण करेल व संधीचा अधिकाधिक फायदा उठवेल, तो संघ वरचढ ठरेल. यजमान भारतीय संघावर प्रेक्षकांचा अधिक दबाव असेल. भारतीय संघाला हरताना पाहणे प्रेक्षकांना नको असते. त्यामुळे असा दबाव झेलून अव्वल कामगिरी करणाऱ्या संघाला विजयाची अधिक संधी असेल. - व्यंकटपती राजू,माजी क्रिकेटपटू