शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

पाकिस्तान पराभूत, सेमीफायनलमध्ये भारताची गाठ कागारूंशी

By admin | Updated: March 20, 2015 16:10 IST

विश्वचषकाच्या उपउपांत्य फेरीमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा सहा गडी आणि ९७ चेंडू राखून सहज पराभव केला आहे.

ऑनलाइन लोकमत
अॅडलेड, दि. २० - विश्वचषकाच्या उपउपांत्य फेरीमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा सहा गडी आणि ९७ चेंडू राखून सहज पराभव केला आहे. आता सेमी फायनलमध्ये २६ मार्च रोजी कांगारुंची गाठ भारताशी पडणार आहे. कप्तान स्मिथ आणि शेन वॅटसनने प्रत्येकी अर्धशतक झळकावले आणि २१४ धावांचे लक्ष्य लिलया पार केले. वॅटसन व नंतर मॅक्सवेल या दोघांचाही एकेक झेल वहाबच्या गोलंदाजीवर पाकच्या क्षेत्ररक्षकांनी टाकला, अन्यथा सामन्यात अधिक रंगत आली असती. चार बळी घेत पाकिस्तानच्या फलंदाजीचा कणा मोडणा-या हेझेलवूडला समानावीराचा किताब देण्यात आला.
वर्ल्डकपमधील तिस-या क्वार्टर फायनलमध्ये पहिली फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या भेदक मा-यासमोर पाकिस्तानची फलंदाजी कोसळली आणि पाकिस्तानचा डाव २१३ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २१४ धावांचे माफक आव्हान असले तरी पाकची गोलंदाजी काही चमत्च्याकार करेल का याची उत्सुकता होती.
पाकिस्तानने नाणेेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु सर्फराज अहमद आणि अहमद शेहजाद ही सलामीची जोडी अवघ्या २४ धावांमध्येच तंबूत परतली. सर्फराज १० तर शेहजाद ५ धावांवर बाद झाला. यानंतर हारिस सोहेल व कर्णधार मिसबाह उल हक या जोडीने पाकचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र मिसबाह ३६ धावांवर असताना बाद झाला. यानंतर हारिस सोहेल ४१ धावांवर बाद झाला. उमर अकमल, शाहिद आफ्रिदीही स्वस्तात माघारी परतले. वहाब रियाझ आणि एहसान आदिल या तळाच्या फलंदाजांनी १६ व १५ धावांची खेळी करत पाकिस्तानला २०० चा टप्पा गाठून दिला. शेवटी ४९.५ षटकांत २१३ धावांवर पाकिस्तानचा डाव संपुष्टात आला. 
ऑस्ट्रेलियातर्फे जॉस हॅझलवूडने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. मिशेल स्टार्क व ग्लॅन मॅक्सवेलने प्रत्येकी दोन तर मिशेल जॉन्सनने एक विकेट घेतली. या सामन्यामध्ये पाकिस्तानचे सर्व फलंदाज झेलबाद झाले. आता ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर नमवत भारत फायनलमध्ये प्रवेश करतो याकडे तमाम भारतीयांचे लक्ष लागले आहे.