शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

मुंबईचा दुसरा पराभव

By admin | Updated: January 8, 2016 03:13 IST

श्रेयश अय्यरने झळकावलेल्या धमाकेदार अर्धशतकी खेळीनंतरही मुंबईला सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत उत्तर प्रदेश विरुद्ध ४ विकेट्सने पराभव पत्करावा लागला

कटक : श्रेयश अय्यरने झळकावलेल्या धमाकेदार अर्धशतकी खेळीनंतरही मुंबईला सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत उत्तर प्रदेश विरुद्ध ४ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. उत्तर प्रदेशने मधल्या फळीतील उमंग शर्माच्या (नाबाद ४७) निर्णायक खेळीच्या जोरावर मुंबईने दिलेल्या १६५ धावांचे लक्ष्य २ चेंडू राखून पार केले.बाराबती स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून उत्तर प्रदेशने मुंबईला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. अखिल हेरवाडकर आणि श्रेयश यांनी मुंबईला शानदार ६७ धावांची सलामी दिली. हेरवाडकरला (२८) बाद करून पीयूष चावलाने ही जोडी फोडली. यानंतर श्रेयशने कर्णधार आदित्य तरेसह ५८ धावांची भागीदारी करून संघाच्या धावसंख्येला आकार दिला. मुंबईच्या धावफलकावर ११२ धावा लागलेल्या असताना श्रेयश अंकित राजपूतचा शिकार ठरला. श्रेयशने ४३ चेंडूत १० चौकार व २ षटकारांसह ७८ धावा कुटल्या. यानंतर मात्र मुंबईच्या फलंदाजीला गळती लागली. ठरावीक अंतराने धक्के देत उत्तर प्रदेशने मुंबईला निर्धारित २० षटकांत ६ बाद १६४ धावांवर रोखले. अंकित राजपूत आणि पीयूष चावला यांनी प्रत्येकी २ बळी घेताना मुंबईच्या धावसंख्येला ब्रेक दिला. अखेरच्या क्षणी उत्तर प्रदेशने टिच्चून मारा करताना मुंबईकरांना जखडवून ठेवण्यात यश मिळवले. प्रशांत गुप्ता (३३) आणि समर्थ सिंग (१६) यांनी उत्तर प्रदेशला ४० धावांची सलामी दिली. यानंतर कर्णधार सुरेश रैना (२०) आणि अक्षदीप सिंग (१४) यांनीही योगदान दिले. मात्र उमंग शर्माने मुंबईकरांचा खरपूस समाचार घेताना ३२ धावांत ४ चौकार व २ षटकारांसह निर्णायक नाबाद ४७ धावांची खेळी करून उत्तर प्रदेशला विजयी केले. मुंबईकडून धवल कुलकर्णी आणि सिद्धेश लाड यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. तर प्रवीण तांबे व अभिषेक नायर यांना प्रत्येकी एक बळी घेण्यात यश आले. यासह सलग चौथा विजय मिळवताना उत्तर प्रदेशने ‘ड’ गटात सर्वाधिक १६ गुणांसह अव्वल स्थान पटकावले असून स्पर्धेच्या सुपर लीग फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित केला आहे. त्याचवेळी मुंबईचा चार सामन्यांतून हा दुसरा पराभव आहे. ८ गुणांसह मुंबईकर तिसऱ्या स्थानी आहेत.मुंबई : २० षटकांत ६ बाद १६४ धावा (श्रेयश अय्यर ७८, अखिल हेरवाडकर २८, अभिषेक नायर नाबाद २२; अंकित राजपूत २/२७, पीयूष चावला २/२१) उत्तर प्रदेश : १९.४ षटकांत ६ बाद १६८ धावा. (उमंग शर्मा नाबाद ४७, प्रशांत गुप्ता ३३; धवल कुलकर्णी २/३१, सिद्धेश लाड २/२७)