शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईची पकड घट्ट !

By admin | Updated: January 31, 2015 04:55 IST

यंदाच्या रणजी मोसमात तब्बल ६ सामन्यांनंतर अखेर बडोदाविरुद्ध मुंबईचा बहारदार खेळ पाहायला मिळाला. पहिल्या डावात यजमान

बडोदा : यंदाच्या रणजी मोसमात तब्बल ६ सामन्यांनंतर अखेर बडोदाविरुद्ध मुंबईचा बहारदार खेळ पाहायला मिळाला. पहिल्या डावात यजमान बडोदाने २८७ धावांमध्ये रोखल्यानंतर मुंबईने बलविंदर संधू (४/३५) आणि हरमीत सिंग (४/५२) यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर यजमानांना १८४ धावांत गुंडाळून तब्बल १०३ धावांची मजबूत आघाडी घेतली. याआधी नवनिर्वाचित कर्णधार आदित्य तरे (२६६ चेंडूंत १२७ धावा) याने फटकावलेल्या संयमी नाबाद शतकाच्या जोरावर मुंबईला अडीचशेचा टप्पा ओलांडता आला.मुंबईच्या धावसंख्येचा पाठलाग करताना सलामीवीर केदार देवधर (२३) आणि कर्णधार आदित्य वाघमोडे (०) लागोपाठ बाद झाल्याने बडोदाची अवस्था बिनबाद ४७वरून २ बाद ४७ अशी झाली. यानंतर फलकावर ५२ धावा लागलेल्या असताना सौरभ वाकसकर (२२)देखील माघारी परतल्याने यजमान अडचणीत आले. विशेष म्हणजे हे तिन्ही फलंदाज संधूने बाद केल्याने त्याने आपली निवड सार्थ ठरवली. यानंतर मुंबईचा हुकमी एक्का शार्दुल ठाकूरने युसुफ पठाणला माघारी धाडत बडोदाची ४ बाद ६१ अशी कोंडी केली.या वेळी मुंबई पकड घट्ट करणार असे दिसत असतानाच हार्दिक पंड्या (५३) आणि दीपक हुडा (३१) यांनी पाचव्या विकेटसाठी ६६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मात्र पुन्हा एकदा संधूने मुंबईला यश मिळवून देताना हुडाचा अडसर दूर केला. तर यजमानांचे शेपूट फार वेळ तग धरणार नाही याची योग्य खबरदारी घेताना हरमीत सिंगने इरफान पठाण (११), पिनल शहा (०), स्वप्निल सिंग (१६) आणि भार्गव भट्ट (६) यांना तंबूचा रस्ता दाखवत मुंबईला निर्णायक आघाडी मिळवून दिली. यजमानांकडून हार्दिक पंड्याने एकाकी लढत देताना सर्वाधिक ५३ धावा काढल्या. तत्पूर्वी कालच्या ६ बाद २१८ या धावसंख्येवरून सुरुवात करताना मुंबईला सुरुवातीलाच धक्का बसला. शार्दुल ठाकूरला भोपळा फोडण्यात अपयश आल्याने याच धावसंख्येवर मुंबईची सातवी विकेट पडली. त्याचवेळी एका बाजूने फलंदाज केवळ हजेरी लावून जात असताना कर्णधार तरे मात्र तळ ठोकून उभा होता. तरेने मोक्याच्या वेळी फटकेबाजी करताना मुंबईची धावसंख्या २८७ धावांवर नेली. तरेने १४ चौकार व १ उत्तुंग षटकार खेचताना शतक झळकावले. तर यजमानांकडून पठाण बंधूंनी प्रत्येकी ३ तर मुनाफ पटेलने २ गडी बाद करताना मुंबईची धावसंख्या मर्यादित राखली. (क्रीडा प्रतिनिधी)