शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

क्रिकेटसाठी सट्टा कायदेशीर करा!

By admin | Updated: January 5, 2016 03:26 IST

सट्टेबाजीमुळे अनेक खेळाडूंचे क्रिकेटविश्वच उद्ध्वस्त झालेले असताना सट्टेबाजीचा हा खेळच कायदेशीर करा, अशी शिफारस सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त केलेल्या तीन सदस्यीय लोढा समितीने केली आहे.

नवी दिल्ली : सट्टेबाजीमुळे अनेक खेळाडूंचे क्रिकेटविश्वच उद्ध्वस्त झालेले असताना सट्टेबाजीचा हा खेळच कायदेशीर करा, अशी शिफारस सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त केलेल्या तीन सदस्यीय लोढा समितीने केली आहे. याशिवाय मंत्र्यांना संघटनेतील पदापासून दूर ठेवणे, पदाधिकाऱ्यांसाठी वय आणि कार्यकाळ याचा कालावधी निश्चित करणे, बीसीसीआय आरटीआयच्या कक्षेत आणणे आणि एक राज्य एक संघटना अशा काही आमूलाग्र बदल घडवू पाहणाऱ्या शिफारशीही या समितीने सुचविल्या आहेत. न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) आर.एम. लोढा यांच्या नेतृत्वाखालील या समितीने मोठे बदल करण्याच्या सूचना केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात १५९ पानांचा अहवाल सोपविल्यानंतर लोढा यांनी शिफारशींबाबत विस्तृत माहिती देताना सांगितले की, ‘सुरुवातीला संघटनेची बांधणी आणि घटना याबाबत चर्चा झाली. बीसीसीआयचे ३० पूर्णकालिक सदस्य आहेत, याची सर्वांना कल्पना आहे. त्यापैकी सेना, रेल्वे यांचा कुठलाही निश्चित प्रदेश नाही. त्यापैकी काही स्पर्धांमध्ये सहभागी होत नाहीत. काही राज्यांमध्ये अनेक सदस्य आहेत. त्यात महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये प्रत्येकी तीन सदस्य आहेत. बीसीसीआयसाठी एक राज्य एक संघटना ही संकल्पना योग्य ठरेल. आम्ही ज्या सदस्यांसोबत चर्चा केली त्यापैकी काही सदस्यांचा अपवाद वगळता उर्वरित सर्व सदस्यांनी सहमती दर्शवली.’लोढा समितीने सर्वांत धक्कादायक शिफारस करताना सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता देण्याची सूचना केली आहे. समितीच्या मते त्यामुळे भ्रष्टाचार रोखण्यासाठी मदत मिळेल. त्याचप्रमाणे समितीने खेळाडू आणि पदाधिकाऱ्यांचा अपवाद वगळता अन्य लोकांना संलग्न साईट््सवर सट्टा लावण्याची परवानगी मिळायला पाहिजे, अशी शिफारस केली आहे. समितीने म्हटले आहे की, बीसीसीआयच्या कार्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेला माहितीच्या अधिकाराखाली (आरटीआय) आणणे आवश्यक आहे. बोर्डाने यापूर्वी स्वायत्त संस्था असल्याचा हवाला देत याला विरोध दर्शविला आहे. न्यायमूर्ती लोढा म्हणाले, बीसीसीआय सार्वजनिक कार्यामध्ये जुळलेली संस्था आहे. त्यामुळे लोकांना संस्थेचे कार्य आणि सुविधा त्याचप्रमाणे अन्य कार्याबाबत माहिती जाणून घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे बीसीसीआय आरटीआयच्या कक्षेत असायला हवे, असे आमचे मत आहे. न्या. लोढा यांनी सांगितले की, अध्यक्षाला तीन वर्षांचे दोन कार्यकाळ पदावर राहता येईल, पण अन्य पदाधिकाऱ्यांना तीन कार्यकाळ पदावर राहता येईल. सर्व पदाधिकाऱ्यांसाठी प्रत्येक कार्यकाळानंतर अंतर असणे अनिवार्य राहील. खेळाडूंचीही संघटना असावी, स्पॉट फिक्सिंगमुळे संकटात आलेल्या आयपीएल संचालन परिषदेमध्ये बदलाची शिफारसही समितीने केली आहे. बीसीसीआय आणि आयपीएल यासाठी वेगळी संचालन परिषद असावी, असे अहवालात म्हटले आहे.आयपीएल आणि बीसीसीआयसाठी स्वतंत्र नियामक स्थापन करा.मंत्री किंवा सरकारी अधिकाऱ्यांना बीसीसीआयमध्ये पदाधिकारी बनवू नका. बीसीसीआयमध्ये सलग दोन टर्म पदे भूषवल्यानंतर पुन्हा नियुक्ती करू नये.बीसीसीआयच्या लेखापरीक्षकांमध्ये कॅगच्या अधिकाऱ्याचा समावेश करावा.बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांचे वय ७०पेक्षा जास्त नसावे.बोर्डाचे अधिकारी, क्रिकेटपटू आणि अन्य भागधारकांसोबत ३८ बैठका केल्या. समितीने केलेल्या शिफारशी बीसीसीआय स्वीकारण्यास बाध्य आहे किंवा नाही, याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेणार आहे.- आर.एम. लोढा, निवृत्त सरन्यायाधीश