शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

मल्लविद्येचा शिरपेच ‘महाराष्ट्र केसरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:49 IST

महाराष्ट्राच्या मल्लविद्येतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा महाराष्ट्र केसरी किताब म्हणजे कुस्तीगीराच्या दृष्टीने अनेक योद्ध्यांनी केलेल्या दिग्विजयाप्रमाणे महाराष्ट्र केसरी किताबापाठीमागेदेखील अनेक कुस्तीगीरांचे दिग्विजय मनाच्या पटलावरून पुसले जाणार नाहीत, एवढे कुस्तीप्रमींच्या मनात खोलवर रुजलेले आहेत.

महाराष्ट्राच्या मल्लविद्येतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा महाराष्ट्र केसरी किताब म्हणजे कुस्तीगीराच्या दृष्टीने अनेक योद्ध्यांनी केलेल्या दिग्विजयाप्रमाणे महाराष्ट्र केसरी किताबापाठीमागेदेखील अनेक कुस्तीगीरांचे दिग्विजय मनाच्या पटलावरून पुसले जाणार नाहीत, एवढे कुस्तीप्रमींच्या मनात खोलवर रुजलेले आहेत.मल्लविद्येतील आपल्या अखंड तपश्चर्येने १९६४ व ६५ मध्ये गणपतराव खेडकर, १९६७ व ६८ मध्ये चंबा मुत्नाळ, १९६९-७० मध्ये दादू चौगुले, १९७२-७३ मध्ये लक्ष्मण वडार, तर २००७-०८ मध्ये चंद्रहार पाटील यांनी डबल महाराष्ट्र केसरी किताब मिळवून देदीप्यमान कामगिरी केली. ‘वीरपुरुष जन्माला येतात ते इतिहास निर्माण करण्यासाठी’ या उक्तीप्रमाणे आणि आपल्या नावातच पराक्रमी पुरुषाचा अर्थ सामावलेल्या मुंबईच्या नरसिंग यादवने महाराष्ट्र केसरी किताबाची हॅट्ट्रिक करीत ‘न भूतो न भविष्यती’ अशी कामगिरी केली. परंतु पराक्रमी पुरुषांची जननी असलेल्या या महाराष्ट्राच्या रणमैदानात जणू काही अद्वितीय कामगिरी करून इतिहास निर्माण करण्याची चढाओढच लागली होती. २०१४ ते २०१६ या कालावधीत जळगावच्या विजय चौधरीने नरसिंगच्या पराक्रमाची बरोबरी करीत महाराष्ट्र केसरीची हॅट्ट्रिक मिळवून दिग्विजयाचा डंका वाजविला.१९६१ पासून १९८७ पर्यंत महाराष्ट्र केसरी किताबाची लढत ही लाल मातीच्या आखाड्यामध्ये होत होती. परंतु कुस्तीची जननी लाल माती तिला न विसरता आंतरराष्ट्रीयस्तरावर महाराष्ट्रातील मल्लांची कामगिरी उंचावली पाहिजे ही विचारधारणा मनात ठेवून कुस्तीमहर्षी बाळासाहेब लांडगे यांनी महाराष्ट्र केसरी किताबाची अंतिम लढत मॅटवर खेळविण्याची संकल्पना कार्यकारिणीमध्ये मांडून १९८८ पासून अंतिम लढतीसाठी मॅटवर प्रारंभ झाला. चापल्य आणि वेग यांचा सुरेख संगम साधत सोलापूर जिल्ह्यातील निमगावच्या रावसाहेब मगरने मॅटवरील अंतिम फेरीची लढत जिंकून महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवला.पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चिंबळी गावच्या पिता व पुत्र हिरामण बनकर आणि विजय बनकर त्याचप्रमाणे कोल्हापूरचे दादू चौगुले व विनोद चौगुले यांनी मिळवलेले महाराष्ट्र केसरीचे किताब कुस्तीक्षेत्रातील पराक्रमाचे अलौकिक ऐतिहासिक पान म्हणून लिहावे लागेल. अशा अद्वितीय, अविस्मरणीय पराक्रम लाभलेल्या महाराष्ट्र केसरी किताबाची पुढील गाथा लिहिण्यासाठी मुळशी तालुक्यातील भूगाव सज्ज झाले आहे.-दिनेश गुंड(आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच)