शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

मल्लविद्येचा शिरपेच ‘महाराष्ट्र केसरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:49 IST

महाराष्ट्राच्या मल्लविद्येतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा महाराष्ट्र केसरी किताब म्हणजे कुस्तीगीराच्या दृष्टीने अनेक योद्ध्यांनी केलेल्या दिग्विजयाप्रमाणे महाराष्ट्र केसरी किताबापाठीमागेदेखील अनेक कुस्तीगीरांचे दिग्विजय मनाच्या पटलावरून पुसले जाणार नाहीत, एवढे कुस्तीप्रमींच्या मनात खोलवर रुजलेले आहेत.

महाराष्ट्राच्या मल्लविद्येतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा महाराष्ट्र केसरी किताब म्हणजे कुस्तीगीराच्या दृष्टीने अनेक योद्ध्यांनी केलेल्या दिग्विजयाप्रमाणे महाराष्ट्र केसरी किताबापाठीमागेदेखील अनेक कुस्तीगीरांचे दिग्विजय मनाच्या पटलावरून पुसले जाणार नाहीत, एवढे कुस्तीप्रमींच्या मनात खोलवर रुजलेले आहेत.मल्लविद्येतील आपल्या अखंड तपश्चर्येने १९६४ व ६५ मध्ये गणपतराव खेडकर, १९६७ व ६८ मध्ये चंबा मुत्नाळ, १९६९-७० मध्ये दादू चौगुले, १९७२-७३ मध्ये लक्ष्मण वडार, तर २००७-०८ मध्ये चंद्रहार पाटील यांनी डबल महाराष्ट्र केसरी किताब मिळवून देदीप्यमान कामगिरी केली. ‘वीरपुरुष जन्माला येतात ते इतिहास निर्माण करण्यासाठी’ या उक्तीप्रमाणे आणि आपल्या नावातच पराक्रमी पुरुषाचा अर्थ सामावलेल्या मुंबईच्या नरसिंग यादवने महाराष्ट्र केसरी किताबाची हॅट्ट्रिक करीत ‘न भूतो न भविष्यती’ अशी कामगिरी केली. परंतु पराक्रमी पुरुषांची जननी असलेल्या या महाराष्ट्राच्या रणमैदानात जणू काही अद्वितीय कामगिरी करून इतिहास निर्माण करण्याची चढाओढच लागली होती. २०१४ ते २०१६ या कालावधीत जळगावच्या विजय चौधरीने नरसिंगच्या पराक्रमाची बरोबरी करीत महाराष्ट्र केसरीची हॅट्ट्रिक मिळवून दिग्विजयाचा डंका वाजविला.१९६१ पासून १९८७ पर्यंत महाराष्ट्र केसरी किताबाची लढत ही लाल मातीच्या आखाड्यामध्ये होत होती. परंतु कुस्तीची जननी लाल माती तिला न विसरता आंतरराष्ट्रीयस्तरावर महाराष्ट्रातील मल्लांची कामगिरी उंचावली पाहिजे ही विचारधारणा मनात ठेवून कुस्तीमहर्षी बाळासाहेब लांडगे यांनी महाराष्ट्र केसरी किताबाची अंतिम लढत मॅटवर खेळविण्याची संकल्पना कार्यकारिणीमध्ये मांडून १९८८ पासून अंतिम लढतीसाठी मॅटवर प्रारंभ झाला. चापल्य आणि वेग यांचा सुरेख संगम साधत सोलापूर जिल्ह्यातील निमगावच्या रावसाहेब मगरने मॅटवरील अंतिम फेरीची लढत जिंकून महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवला.पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चिंबळी गावच्या पिता व पुत्र हिरामण बनकर आणि विजय बनकर त्याचप्रमाणे कोल्हापूरचे दादू चौगुले व विनोद चौगुले यांनी मिळवलेले महाराष्ट्र केसरीचे किताब कुस्तीक्षेत्रातील पराक्रमाचे अलौकिक ऐतिहासिक पान म्हणून लिहावे लागेल. अशा अद्वितीय, अविस्मरणीय पराक्रम लाभलेल्या महाराष्ट्र केसरी किताबाची पुढील गाथा लिहिण्यासाठी मुळशी तालुक्यातील भूगाव सज्ज झाले आहे.-दिनेश गुंड(आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच)