शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

महाराष्ट्र केसरी : उस्मानाबादच्या हणमंत पुरीने घेतली सुवर्ण पकड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 23:09 IST

५७ किलो वजनी गटात सोलापूरच्या आबासाहेब अटकळेचे वर्चस्व

पुणे : उस्मानाबादच्या हणमंत पुरी आणि सोलापूरच्या आबासाहेब अटकळे यांनी अनुक्रमे ७९ किलो आणि ५७ किलो वजनी गटातील माती विभागात बाजी मारत यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सुवर्ण सुरुवात केली. हणमंतने आपल्या अंतिम सामन्यात एकतर्फी बाजी मारली, तर अत्यंत अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात आबासाहेबने निर्णायक एक गुण मिळवत सुवर्ण पदकावर कब्जा केला.  

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मानाच्या स्पर्धेला म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात धडाक्यात सुरुवात झाली. यामध्ये उस्मानाबाद आणि सोलापूरच्या मल्लांनी यंदाचे पहिले सुवर्ण मिळवण्याचा मान मिळवला. माती विभागातील ७९ किलो वजनी गटाची अंतिम लढत एकतर्फी रंगली. हणमंतने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत सोलापूर जिल्ह्याच्या सागर चौगुलेला एकही संधी न देताना ५-० असा दणदणीत विजय मिळवला. हणमंतच्या दमदार खेळापुढे सागरला पुनरागमन करण्याची एकही संधी मिळाली नाही. त्याचवेळी कांस्य पदकाच्या लढतीमध्ये नाशिकच्या धर्मा शिंदेने बाजी मारताना परभणीच्या गिरिधारी दुबे याचा ८-२ असा पराभव केला.दुसरीकडे, मातीमधील ५७ किलो गटाची अंतिम लढत दिग्गज मल्ल काका पवार यांच्या शिष्यांमध्येच रंगली. आबासाहेबने यावेळी सुवर्ण पटकावले खरे, मात्र यासाठी त्याला कुस्तीचे माहेरघर असलेल्या कोल्हापूरच्या संतोष हुरुगडे याच्या तगड्या आव्हानाचा सामना करावा लागला. दोघांनी तोडीस तोड खेळ करताना ८-८ अशी बरोबरी साधली. मात्र अंतिम क्षणी आबासाहेबने निर्णायक एक गुण मिळवत सुवर्ण पदकावरा नाव कोरले. त्याचवेळी नाशिकच्या ओंकार लाड याने कांस्य पदक जिंकण्यात यश मिळवले.सोलापूरचा रामचंद्र अंतिम फेरीतमॅटवरील ७९ किलो वजनी गटात सोलापूरच्या रामचंद्र कांबळेने एकतर्फी झालेल्या सामन्यात कोल्हापूरच्या निलेश पवार याचा १३-४ असा पराभव करत दिमाखात अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे, उस्मानाबादच्या रवींद्र खरेने सुवर्ण पदकासाठी आपली दावेदारी सिद्ध करताना साताºयाच्या श्रीधर मुळेचा ४-१ असा पराभव केला. शनिवारी होणाºया अंतिम सामन्यात रामचंद्र आणि रवींद्र यांच्यात कोण बाजी मारतो? याकडेच कुस्तीप्रेमींचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Maharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाMaharashtraमहाराष्ट्रWrestlingकुस्तीOsmanabadउस्मानाबादSolapurसोलापूर