शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

भारतात दर्जेदार स्थानिक स्पर्धांची उणीव

By admin | Updated: March 31, 2015 23:17 IST

भारतात दर्जेदार स्थानिक स्पर्धांचे आयोजन होत नसल्यामुळे दर्जेदार टेनिसपटू निर्माण होत नाहीत, असे मत महान टेनिसपटू रमेश कृष्णन यांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली : भारतात दर्जेदार स्थानिक स्पर्धांचे आयोजन होत नसल्यामुळे दर्जेदार टेनिसपटू निर्माण होत नाहीत, असे मत महान टेनिसपटू रमेश कृष्णन यांनी व्यक्त केले. भविष्यातील चॅम्पियन तयार करण्यासाठी खेळाचा प्रचार व प्रसार देशाच्या काना-कोपऱ्यात होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.१९८७ मध्ये आॅस्ट्रेलियाचा पराभव करीत भारताला डेव्हिस कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रमेश कृष्णनला भारतीय खेळाडूंमधील उणिवांबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘‘ती वेळ वेगळी होती. त्या वेळी भारतीय टेनिस वर्तुळ विश्व टेनिसचा महत्त्वाचा भाग होते. प्रत्येक तीन-चार महिन्यांत येथे चांगल्या स्पर्धेचे आयोजन होत होते. त्यामुळे अधिक पैसा खर्च होत नव्हता, पण आता सर्व स्पर्धा युरोपमध्ये होत आहेत. त्यामुळे युरोपला चांगला लाभ मिळत आहे. भारतीय खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मोठा प्रवास करावा लागतो. ही खर्चिक बाब आहे. येथे अधिकाधिक स्पर्धांचे आयोजन झाले तर युवा खेळाडूंना कामगिरीमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळेल.’’ १९७९ मध्ये विम्बल्डन आणि फ्रेंच ओपन स्पर्धेत ज्युनिअर गटात जेतेपद पटकावणारे आणि जागतिक क्रमवारीत ज्युनिअर गटात अव्वल स्थान भूषवलेले खेळाडू असलेले रमेश म्हणाले, ‘‘त्या वेळी येथे मोठ्या स्पर्धा होत होत्या. युरोपमध्ये वर्षांतील काही महिने टेनिस होत होते.’’महान खेळाडू रामनाथन कृष्णनचे पुत्र असलेल्या रमेश यांनी १९८० च्या दशकात तीन ग्रॅण्डस्लॅममध्ये उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. १९८५ मध्ये त्यांनी जागतिक क्रमवारीत २३ वे स्थान पटकावले होते. रमेश म्हणाले, ‘‘भारतीय खेळाडू आता अनेक खेळांमध्ये चमकदार कामगिरी करीत आहेत. बॅडमिंटनमध्ये आपली कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे. सर्व खेळांमध्ये खेळाडूंना प्रतिस्पर्ध्यांसोबत संघर्ष करावा लागत आहे. भारतीय क्रीडा वर्तुळासाठी ही चांगली बाब आहे. टेनिसमध्ये युवा खेळाडूंना आकर्षित करण्यासाठी योजना तयार करणे आवश्यक आहे.’’ भारताचे आघाडीचे टेनिसपटू सोमदेव देववर्मन व युकी भांबरी यांच्याबाबत बोलताना रमेश म्हणाले, ‘‘सोमदेव चांगला खेळत आहे. त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो पूर्णपणे सावरला असेल, असे मला वाटत नाही. भारतासाठी ही दुर्दैवाची बाब आहे. युकीने काही चांगले विजय मिळवले आहे.’’ (वृत्तसंस्था)