शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक मैदानाची उणीव जाणवते : द्रविड

By admin | Updated: April 10, 2015 08:59 IST

आयपीएलमध्ये दोन वर्षांपासून स्वत:चे स्थानिक सामने दुसऱ्या मैदानावर खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सला स्थानिक मैदानाची उणीव जाणवत आहे.

मुंबई : आयपीएलमध्ये दोन वर्षांपासून स्वत:चे स्थानिक सामने दुसऱ्या मैदानावर खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सला स्थानिक मैदानाची उणीव जाणवत आहे. या संघाचा सल्लागार राहुल द्रविड याने ही खंत व्यक्त केली; पण इतरत्र खेळण्यासाठी आम्ही मानसिकरीत्या सज्ज झाल्याचेही तो म्हणाला.संघाचा माजी कर्णधार आणि आता सल्लागार बनलेला द्रविड म्हणाला, ‘मागच्या वर्षी आम्ही अहमदाबाद हे स्थानिक मैदान निवडले होते. यंदा मुंबईत खेळणार आहोत. आम्हाला सवाई मानसिंग स्टेडियमची उणीव जाणवते. त्या मैदानावर आमचा रेकॉर्डदेखील चांगला आहे.’ राजस्थानने मानसिंग स्टेडियमवर पहिल्या सहा पर्वांतील ३८ पैकी २९ सामने जिंकले हे विशेष. २०१४ साली मात्र आरसीएला सरकारकडून परवानगी न मिळाल्याने शहरात एकही सामना आयोजित होऊ शकला नाही. तेव्हापासून हे प्रकरण लालफितशाहीत अडकले आहे. आरसीएने अहमदाबादच्या मोतेरा मैदानावर चारपैकी दोन सामने जिंकले आहेत. २०१५ च्या पर्वात आम्ही या मैदानावर अधिक सामने जिंकू, असा विश्वास द्रविडने व्यक्त केला. यंदा आठव्या पर्वात मुंबईच्या स्थानिक मैदानावर राजस्थान रॉयल्सला तीन सामने खेळायचे आहेत. यावर द्रविड म्हणाला, ‘आमच्या संघासाठी यंदा परिस्थिती वेगळी आहे. अहमदाबाद येथे खेळल्यानंतर आता क्रिकेट क्लब आॅफ इंडियाच्या ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये खेळावे लागत आहे. येथे सरावासाठी सर्व खेळाडू उत्सुक आहेत.’ कामगिरीत सातत्य राखणारे आणि दडपणातही उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू टी-२० क्रिकेटला हवे आहेत. विजयाची भूक असेल तर या प्रकारात निश्चितपणे विजय मिळत असल्याचे द्रविडने सांगितले. (वृत्तसंस्था)