शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

केदारची कामगिरी आश्चर्यचकित करणारी

By admin | Updated: June 17, 2017 02:42 IST

उपांत्य फेरीत भारताने बांगलादेशविरुद्ध मिळविलेल्या विजयात अनेक ‘हीरो’ ठरले, पण त्यात एक मात्र आश्चर्यचकित करणारा होता. केदार जाधवने डावाच्या मधल्या

- व्हीव्हीएस लक्ष्मण लिहितात...उपांत्य फेरीत भारताने बांगलादेशविरुद्ध मिळविलेल्या विजयात अनेक ‘हीरो’ ठरले, पण त्यात एक मात्र आश्चर्यचकित करणारा होता. केदार जाधवने डावाच्या मधल्या टप्प्यात भारताला वर्चस्व मिळवून दिले. त्याने महत्त्वाचे बळी घेत बांगलादेश संघ ३१० किंवा ३२० धावांची मजल मारणार नाही, हे निश्चित केले. डावाच्या मधल्या षटकांत कुठल्याही गोलंदाजाने प्रतिस्पर्धी संघाचे बळी घेण्यासारखे दुसरे चांगले काम नाही, पण यामुळे भारताच्या पाचव्या गोलंदाजाबाबत मात्र प्रश्न उपस्थित झाला आहे. भुवनेश्वरने सुरुवातीला बळी घेतल्यानंतर आणि त्याने व बुमराहने एजबेस्टनच्या पाटा खेळपट्टीवर शिस्तबद्ध मारा केला. त्यानंतर तमिम इक्बाल व मुशीफिकूर रहीम यांनी डाव सावरला. विराटने केदारकडे चेंडू सोपविण्याचा जुगार खेळला आणि त्यात त्याला यशही मिळाले. केदार २८ व्या षटकात गोलंदाजीला आला. त्याने सलग सहा षटके टाकताना २२ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. २८ ते ४० षटकांदरम्यान बांगलादेशला केवळ ५५ धावा वसूल करता आल्या आणि त्यासाठी त्यांना तीन गड्यांचे मोल द्यावे लागले. त्यामुळे तळाच्या फलंदाजांसाठी सध्याच्या स्थितीत डेथ ओव्हर्स स्पेशालिस्टमध्ये गणल्या जाणाऱ्या गोलंदाजांविरुद्ध धावा फटकावणे कठीण बाब होती.केदार चाणाक्ष गोलंदाज आहे. कमी उंची लाभलेला केदार राऊंड आर्म शैलीने गोलंदाजी करतो. त्यामुळे त्याचे चेंडू फलंदाजाच्या रोखाने येतात. त्याच्या चेंडूचा टप्पा फुललेंथही नसतो आणि आखूडही नसतो. त्यामुळे चेंडूच्या खोलात जाऊन फटका खेळणे किंवा बॅकफूटवर कटचा फटका मारण्याची संधी नसते. त्यामुळे त्याचे एकापाठोपाठ एक निर्धाव चेंडू पडत असतात. यापूर्वी, न्यूझीलंड व इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान त्याने गोलंदाजीमध्ये छाप सोडली आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या धावगतीवर लगाम घालण्यासाठी २५ ते ४० व्या षटकांदरम्यान बळी घेणे आवश्यक असते. भारतीय संघाला हार्दिक पांड्याकडून गोलंदाजीमध्ये आशा आहे. कारण माझ्या मते सध्याच्या घडीला भारतीय संघात पाचवा गोलंदाज हीच एकमेव कमकुवत बाजू आहे. हा अपवाद वगळता गुरुवारी भारतीय संघाची खेळी शानदार ठरली. शिखर धवनचा फॉर्म संघाच्या यशात महत्त्वाचा आहे. रोहितचे योगदानही उल्लेखनीय ठरत आहे. विराटचे कव्हर ड्राईव्हचे फटके डोळ्याचे पारणे फेडणारे होते. त्याची आतापर्यंतची या स्पर्धेतील ही सर्वोत्तम खेळी होती. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम लढतीसाठी आणखी काही राखून ठेवलेले असेल, अशी आशा आहे. ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये आयसीसीच्या स्पर्धेत प्रथमच भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान अंतिम लढत होणे म्हणजे या रंगतदार स्पर्धेची यशस्वी सांगता होण्यासारखे आहे. (गेमप्लॉन)