शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोहली, रहाणेच्या शतकानंतरही भारताची फलंदाजी कोसळली

By admin | Updated: December 28, 2014 15:03 IST

विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेच्या अडीचशे धावांच्या भागीदारीनंतरही भारताच्या तळाचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्याने तिस-या दिवसअखेर भारताची अवस्था ८ बाद ४६२ अशी झाली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मेलबर्न, दि. २८ - विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेच्या अडीचशे धावांच्या भागीदारीनंतरही भारताच्या तळाचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्याने तिस-या दिवसअखेर भारताची अवस्था ८ बाद ४६२ अशी झाली आहे.

तिस-या दिवशी एक बाद १०८ धावांवरुन पुढे खेळायला सुरुवात करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. चेतेश्वर पुजारा २५ आणि मुरली विजय ६८ धावांवर बाद झाल्याने भारताची अवस्था ३ बाद १४७ अशी झाली होती. यानंतर मैदानात उतरलेल्या विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या जोडीने भारताच्या डावाला आकार देत ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तरही दिले. या जोडीने चौथ्या विकेटसाठी तब्बल २६२ धावांची भागीदारी केली.  नॅथन लियॉनने रहाणे १४७ धावांवर बाद ही जोडी फोडली. रहाणे बाद झाला त्यावेळी भारताने ५ गडी गमावत ४०९ धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर तळाचे फलंदाज  स्वस्तात तंबूत परतले. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा लोकेश राहुल फारशी चमक दाखवू शकला नाही. तो केवळ तीन धावा करुन तंबूत परतला. त्यापाठोपाठ कर्णधार महेंद्रसिंह धोनी ११ धावांवर तर आर. अश्विन भोपळा न फोडताच माघारी परतला. त्यामुळे तिस-या दिवशी भक्कम धावसंख्या उभारुन भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर देऊन अशी आशा असतानाच  भारताची अवस्था ७ बाद ४३४ अशी झाली. तिस-या दिवसाच्या शेवटच्या षटकात विराट कोहली १६९ धावांवर बाद झाला.मोहम्मद शमी ११ धावांवर नाबाद आहे.  ऑस्ट्रेलियातर्फे रॅन हॅरिसने सर्वाधिक चार विकेट घेतल्या आहेत.