शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

भारतीयांची ऑलिम्पिक पात्रता धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 1:15 AM

दहा सदस्य असलेल्या भारतीय कॅनोइंग संघ पटाया, थायलंड (३० एप्रिल-७ मे ) येथे होणाऱ्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेला मुकला आहे

अभिजित देशमुखकाही महिन्यांपूर्वी १५० भारतीय खेळाडू ऑलिम्पिकसाठी सहज पात्र ठरतील, अशी शक्यता निर्माण झाली होती; पण अनेक देशांनी कोविडमुळे प्रवासबंदी केली आहे, त्यामुळे अनेक खेळाडूंच्या ऑलिम्पिक पात्रतेवर धोका निर्माण झाला आहे. भारताचे आतापर्यंत ९१ खेळाडू ११ क्रीडाप्रकारांत ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. 

महिला रिले संघभारतीय ४x४०० आणि ४x१०० महिला रिले संघ कदाचित यंदा टोकियो ऑलिम्पिकमध्ये दिसणार नाहीत. २००२ पासून आशियाई क्रीडा स्पर्धेत ४x४०० महिला संघाने नेहमी गोल्ड मेडल जिंकले आहेत. सर्व भारतीय ॲथलेटिक्स खेळाडू (१-२ मे) दरम्यान पोलंड येथे होणाऱ्या वर्ल्ड रिले ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी सज्ज होते. भारतातून पोलंडला थेट विमानसेवा नसल्यामुळे, भारतीय संघ हॉलंड मार्गे पोलंडमध्ये दाखल होणार होता; पण हॉलंडने भारतीयांना प्रवासबंदी घातल्यामुळे ॲथलेटिक्स संघाला विमानामध्ये प्रवेश दिला नाही. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरू शकणाऱ्या महिला रिले संघाचे आव्हान जवळ जवळ संपले आहे. 

कॅनोईंगदहा सदस्य असलेल्या भारतीय कॅनोइंग संघ पटाया, थायलंड (३० एप्रिल-७ मे ) येथे होणाऱ्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेला मुकला आहे. या स्पर्धेसाठी १० दिवस विलगीकरण आवश्यक होते, त्यासाठी भारतीय संघ १६ एप्रिलला रवाना होणार होता; पण थायलंडने शेवटच्या क्षणी भारतातून थेट विमानसेवा बंद केल्यामुळे कॅनोइंग संघाला धक्का बसला. इतर कुठल्याही देशातून शेवटच्या क्षणी विमानसेवा उपलब्ध नसल्यामुळे कॅनोइंग संघाचे ऑलिम्पिक स्वप्न संपुष्टात आले.

मलेशिया व्हाया कतार?भारतीय ओपन सुपर ५०० स्पर्धा रद्द झाल्यामुळे भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, किदंबी श्रीकांत आणि अश्विनी पोनाप्पा - सिक्की रेड्डी जोडी यांची ऑलिम्पिक पात्रता धोक्यात दिसत आहे. त्यामुळे उरलेल्या दोन स्पर्धा मलेशिया (मे २५-३०) आणि सिंगापूर (जून १-६) येथे उत्तम कामगिरी करावी लागेल. पण दोन्ही देशांनी भारतातून थेट विमानसेवा बंद केली आहे. त्यामुळे मलेशिया व्हाया कतार किंवा आणखी कुठला देश परवानगी देतो याचे नियोजन भारतीय बॅडमिंटन संघटनेला करावे लागेल. पी. व्ही. सिंधू, साई प्रनिथ, चिराग रेड्डी - सात्विकराज रांकीरेड्डी हे आधीच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत.

 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020Indiaभारत