शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

भारताला डायमंड लीग आयोजनाची संधी, 'सॅबेस्टियन को' यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 08:04 IST

भारताला अ‍ॅथलेटिक्स डायमंड लीग आयोजनाची संधी मिळू शकते. आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष सॅबेस्टियन को यांनी ही माहिती देताना अनेक आंतरराष्ट्रीय स्टार्सचा समावेश

जकार्ता : भारताला अ‍ॅथलेटिक्स डायमंड लीग आयोजनाची संधी मिळू शकते. आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष सॅबेस्टियन को यांनी ही माहिती देताना अनेक आंतरराष्ट्रीय स्टार्सचा समावेश असलेली ही स्पर्धा जगभरातील प्रमुख शहरात आयोजित करण्यावर भर दिला आहे. येथे सुरू असलेल्या १८ व्या आशियाई स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले को यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान भारतात डायमंड लीगच्या अयोजनाच्या शक्यतेबाबत चर्चा केली.

को म्हणाले,‘ डायमंड लीग किंवा विश्व दर्जाच्या अनेक स्पर्धा युरोपपर्यंत मर्यादित राहिल्या. आमच्याकडे सुविधा उपलब्ध असल्या तरी दिल्ली, टोकियो, बीजिंग या आशियाई शहरात आयोजन व्हावे याची काळजी घेत आहोत. ’दोनदा आॅलिम्पिक चॅम्पियन राहिलेले को यांनी मोठी लोकसंख्या असलेल्या देशात आयोजनावर भर देत असल्याचे सांगून डायमंड लीग आयोजनाचा करार सध्या एक वर्षे शिल्लक असून जगभरातील शहरात ही स्पर्धा भरविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती दिली. ते पुढे म्हणाले,‘ पुढच्या वर्षी दोहा येथे आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन , २०२० मध्ये टोकियो शहरात आॅलिम्पिकचे आयोजन आणि चीनच्या नानजिंग शहरात विश्व इन्डोअर अ‍ॅथलेटिक्सचे आयोजन होणार आहे. अ‍ॅथलेटिक्सच्या दृष्टीने पुढील चार- पाच वर्षे आशियावर केंद्रित राहतील. चीन आणि कतार हे देश डायमंड लीगचे यजमानपद भूषवित आहेत.’

१९८० आणि १९८४ च्या आॅलिम्पिकमधील १५०० मीटर दौडमध्ये सुवर्ण असलेले को हे हिमा दास आणि नीरज चोप्रा यांच्या कामगिरीवर चांगलेच प्रभावी झाले आहेत. हिमाने विश्व ज्युनियर स्पर्धेत सुवर्ण तर चोप्राने २०१६ च्या अंडर २० चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकीत सुवर्ण जिंकले आहे. को म्हणाले, ‘हिमाच्या कामगिरीने मला फार प्रभावित केले. मी त्यावेळी स्टेडियममध्ये होतो. भारतासाठी हे शुभसंकेत आहेत. अ‍ॅथलेटिक्स भारतीय लोकसंख्येवर प्रभाव टाकताना दिसत आहे.’

२०१० च्या नवी दिल्ली राष्ट्रकुलच्या यशस्वी स्मृतींना उजाळा देत को यांनी दरदिवशी स्टेडियमवर उसळणाऱ्या गर्दीची प्रशंसा केली. खेळांना जगभर लोकप्रिय करण्याच्या दृष्टीने भारताचे योगदान मोलाचे ठरू शकते.प्रायोजक आणि प्रसारक भारतीय उपखंडात अधिक असल्याने अ‍ॅथलेटिक्सला संपन्न बनविण्यासाठी आशियात मोठ्या स्पर्धेच्या आयोजनास आयएएएफ प्राधान्य देत असल्याचे को यांनी सांगितले.काय आहे डायमंड लीग...डायमंड लीगचे आयोजन एकूण १४ टप्प्यात करण्यात येते. सहभागी होणारे आघाडीचे खेळाडू मोठ्या रकमेचे पुरस्कार विजेते ठरतात, शिवाय त्यांना रँकिंग गुण मिळतात. स्पर्धेची सुरुवात २०१० मध्ये झाली. या आयोजनाचा हेतू गोल्डन लीगचे स्थान घेणे तसेच आयोजन युरोप बाहेर नेणे हा होता. या प्रायोजकांसोबतच्या कराराचे नूतनीकरण होण्याआधी नव्या शहरात आयोजनाच्या चर्चेला वेग आला आहे.

टॅग्स :Sportsक्रीडाTeam Indiaभारतीय क्रिकेट संघAsian Games 2018आशियाई स्पर्धा