शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

अर्जेंटिनाकडून भारत ३-० गोलने पराभूत

By admin | Updated: November 27, 2015 23:49 IST

स्टार खेळाडू पेइलेट गोंझालो याने नोंदविलेल्या दोन गोलच्या बळावर अर्जेंटिनाने यजमान भारताला ३-०ने सहज नमवित वर्ल्ड हॉकी लीग फायनल स्पर्धेच्या

रायपूर : स्टार खेळाडू पेइलेट गोंझालो याने नोंदविलेल्या दोन गोलच्या बळावर अर्जेंटिनाने यजमान भारताला ३-०ने सहज नमवित वर्ल्ड हॉकी लीग फायनल स्पर्धेच्या उद््घाटनाचा दिवस गाजविला. रायपूरच्या वल्लभाई पटेल स्टेडियमवर हा सामना झाला. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या अर्जेंटिनाने सुरूवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व ठेवत भारताला एकही संधी दिली नाही. सामन्याच्या तिसऱ्या मिनिटास पेनल्टी कॉर्नरद्वारे मिळालेल्या संधीचे सोने करीत गोंझालोने संघाला १-०अशी आघाडी मिळवून दिली. तर सामन्याच्या २४व्या मिनिटास पेनल्टी कॉर्नरवर जोआक्विन मिनेनी याने गोल करीत आघाडी २-० अशी वाढविली. दुसरीकडे भारताचा स्टार मिडफिल्डर सरदारसिंह याच्या नेतृत्वाखील उतरलेल्या भारताच्या संघाकडून फारसा प्रतिकारही दिसला नाही. दुसऱ्या हाफमध्ये रमनदीप, रघुनाथ, रुपींदर यांनी अर्जेंटिनावर काहीसा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताचे आक्रमण थोपविण्यात अर्जेंटिनाला यश आले. रुपींदरला ५०व्या मिनिटास पेनल्टीकॉर्नरद्वारे गोल करण्याची संधी मिळाली होती. मात्र या संधीचे तो गोलमध्ये रुपांतर करु शकला नाही. अर्जेंटिनाने आपले आक्रमण सुरुच ठेवत चेंडूवर अधिक ताबा ठेवला. सामन्याच्या ६०व्या मिनिटास पेनल्टीकॉर्नरवर गोंझालोने वैयक्तिक दुसरा गोल करीत संघाची आघाडी ३-० अशी भक्कम करीत संघाचा विजय देखिल निश्चित केला.आता भारताची पुढची लढत शनिवारी जर्मनीशी होईल.