शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

भारत व दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघांदरम्यान लढत आजपासून

By admin | Published: August 17, 2015 10:47 PM

श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेसाठी अनेक आघाडीचे खेळाडू राष्ट्रीय संघात सामील झाल्यानंतर अंबाती रायडूच्या नेतृत्वाखालील भारत ‘अ’च्या

वेनाड : श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेसाठी अनेक आघाडीचे खेळाडू राष्ट्रीय संघात सामील झाल्यानंतर अंबाती रायडूच्या नेतृत्वाखालील भारत ‘अ’च्या युवा संघापुढे दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध मंगळवारपासून खेळल्या जाणाऱ्या पहिल्या चार दिवसीय अनधिकृत कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी करण्याचे आव्हान आहे. युवा खेळाडूंना या लढतीच्या निमित्ताने निवड समिती सदस्यांचे लक्ष वेधण्याची संधी मिळाली आहे. अलीकडेच चेन्नईमध्ये आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघारिुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणाऱ्या भारत ‘अ’ संघातील कर्णधार चेतेश्वर पुजारा, के. एल. राहुल, अमित मिश्रा, वरुण अ‍ॅरोन आणि उमेश यादव श्रीलंका दौऱ्यावर आहेत. या खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारत ‘अ’ संघाची भिस्त कर्णधार रायडू, करण नायर, अभिनव मुकुंद, अंकुश बैस, बाबा अपराजित, अक्षर पटेल व कर्ण शर्मा यांच्यासारख्या युवा खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून आहे. उभय संघ तिरंगी वन-डे सामन्यांची मालिका खेळल्यानंतर येथे दाखल झाले आहेत. दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघासाठी भारत दौऱ्याची सुरुवात निराशाजनक झाली. त्यांचे १० खेळाडू अन्नातून विषबाधा झाल्यामुळे आजारी पडले होते. त्यांना मैदानावर क्षेत्ररक्षणासाठी ११ खेळाडू तैनात करणेही अडचणीचे ठरले. दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाला क्षेत्ररक्षणासाठी त्यांचे संगणक विश्लेषक व भारताचा मनदीप सिंग यांची मदत घ्यावी लागली.दक्षिण आफ्रिका संघ या धक्क्यातून आता सावरला आहे. त्यांचे सर्व खेळाडू फिट आहेत. क्विंटन डीकॉकच्या समावेशामुळे दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाची फलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे. त्याने तिरंगी मालिकेत भारत ‘अ’ संघाविरुद्ध दोन्ही लढतींमध्ये शतकी खेळी केली. भारतीय गोलंदाजांपुढे त्याला रोखण्याचे आव्हान राहील. कर्णधार डीन एल्गर, दिनिश डी ब्रएन, रिजा हेंड्रिक्स व डॅन विलास प्रतिभावान फलंदाज आहेत. भारतीय फलंदाजीाबाबत विचार करता मधल्या फळीची भिस्त रायडूच्या कामगिरीवर अवलंबून आहे. झिम्बाब्वे दौऱ्यानंतर प्रथमच खेळत असलेल्या बडोद्याच्या या फलंदाजाची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. रायडूव्यतिरिक्त मुकुंद बैस, जीवनज्योत सिंग, बाबा अपराजित, करुण नायर व विजय शंकर या युवा फलंदाजांकडूनही चमकदार कामगिरीची आशा आहे. गोलंदाजीमध्ये कर्ण शर्मा व अक्षर पटेल यांच्यासारखे अनुभवी फिरकीपटू आहेत, तर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी अभिमन्यू मिथुन, शार्दूल ठाकूर व ईश्वर पांडे यांच्यावर राहील. दक्षिण आफ्रिका संघ गोलंदाजी विभागाबाबत चिंतेत आहे. लोनवाबो त्सोत्सोबे, वायने पार्नेल, केशव महाराज व मतकोजिसी शेजी यांना तिरंगी मालिकेत छाप सोडण्यात अपयश आले. (वृत्तसंस्था)