शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटमध्येही भारत पाकिस्तानच्या उरी... न्यूझीलंडला नमवत रँकिंगमध्ये अव्वल

By admin | Updated: October 3, 2016 17:47 IST

न्यूझीलंडसोबत दुसरा कसोटी सामना खेळणा-या भारताने मालिका 2 - 0 अशी खिशात टाकतानाच कसोटी क्रिकेटच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थान पुन्हा पटकावले.

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 3 - न्यूझीलंडचा 197 धावांमध्ये धुव्वा उडवत भारताने 179 धावांनी दुसरी कसोटी जिंकत मालिका 2 - 0 अशी खिशात टाकली आहे. भारताने पहिल्या डावात 316 व दुसऱ्या डावात 263 धावा केल्या. तर न्यूझीलंडने पहिल्या डावात 204 व दुसऱ्या डावात 197 धावा केल्या. गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलेल्या या सामन्यामध्ये न्यूझीलंडसमोर विजयासाठी 376 धावांचे लक्ष्य होते. मात्र, प्रत्येकी तीन विकेट घेणाऱ्या अश्विन व जाडेजाने किवींना डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. त्यांना भुवनेश्वर कुमार व मोहम्मद शामीने चांगली साथ दिली.  शेवटचा गडी मोहम्मद शमीने टिपला. त्याच्या बाउन्सरवर मुरली विजयकडे झेल देत बोल्ट बाद झाला आणि भारताने मालिका खिशात टाकतानाच कसोटी क्रिकेटच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थान पुन्हा पटकावले. दोन्ही डावांमध्ये अर्धशतके झळकावणाऱ्या आणि चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये मोलाची कामगिरी बजावणाऱ्या वृद्धीमान साहाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
या विजयाबरोबरच कर्णधार विराट कोहलीनेही एक विक्रम केला आहे. पाच कसोटी मालिकांमध्ये एकही मालिका न गमावण्याचा विक्रम कोहलीने केला आहे.
 
दरम्यान, भारताने आत्तापर्यंत कसोटी क्रिकेटच्या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी राहण्याचा काळ...
 
- नोव्हेंबर 2009 ते ऑक्टोबर 2011 - 21 महिने
- जानेवारी 2016 ते फेब्रुवारी 2016 - 1 महिना
- ऑगस्ट 2016 ते ऑगस्ट 2016 - 5 दिवस
- ऑक्टोबर 2016 ते ---
 
 
भारताने दुसऱ्या डावामध्ये रोहीत शर्मा (82), वृद्धीमान साहा (58) आणि विराट कोहली (45) यांच्या जीवावर चांगली धावसंख्या उभी केली आणि न्यूजीलंडसमोर विजयासाठी 374 धावांचे लक्ष्य ठेवले. भारतीय गोलंदाजांनाही चांगला मारा करत भारताला चौथ्या दिवसाअखेरीसच विजय मिळवून दिला. लेथम वगळता न्यूझीलंडचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकाव धरू शकला नाही.
या विजयामुळे भारताने कसोटी रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. पाकिस्तान रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर होता, मात्र या विजयामुळे आता भारत पहिल्या स्थानी आला आहे.
भारताचा दुसरा डाव 263 धावांवर आटोपला होता आणि विजयासाठी 376 धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. न्यूझीलंडचा पहिला डाव 204 धावांत गुंडाळत 112 धावांची आघाडी घेणाऱ्या भारताने अंधुक प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी दुसऱ्या डावात 8 बाद 227 धावांची मजल मारली होती. आज सकाळी खेळ सुरु झाल्यानंतर भारताने आपल्या राहिलेल्या दोन विकेट्सही गमावल्या. ईडन गार्डनमध्ये आतापर्यंत विदेशी संघाची चौथ्या डावातील सर्वोच्च धावसंख्या 233 आहे. ही धावसंख्या 1961-62मध्ये इंग्लंडने फटकावली होती. त्यामुळे या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघापुढे मोठे आव्हान आहे.
 
रोहित शर्माने आपल्या आवडत्या ईडन गार्डन मैदानावर सूर गवसल्याचे संकेत देताना रविवारी ८२ धावांची खेळी केली आणि त्याने रिद्धिमान साहासोबत शतकी भागीदारी करीत भारताला न्यूझीलंडविरुद्ध ३०० पेक्षा अधिक धावांची आघाडी मिळवून दिली होती. रोहित, साहा व विराट यांच्या संघर्षपूर्ण खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यावर मजबूत पकड मिळवली.
 
 
पहिल्या डावात ३१६ धावा फटकाविणाऱ्या भारताची कर्णधार विराट कोहलीच्या ४५ धावांच्या खेळीनंतरही दुसऱ्या डावात एकवेळ ६ बाद १०६ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर रोहित व साहा (नाबाद ३९) यांनी सातव्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी केली. ईडनवर गेल्या पाच कसोटी सामन्यांत भारतातर्फे सातव्या विकेटसाठी ही पाचवी शतकी भागीदारी ठरली. 
 
सुरुवातीला जपून खेळणाऱ्या रोहितने त्यानंतर आपल्या नेहमीच्या शैलीत फलंदाजी करताना काही आकर्षक फटके मारले. दुसऱ्या टोकाकडून साहाने त्याला योग्य साथ दिली. पहिल्या डावात नाबाद ५४ धावांची खेळी करणाऱ्या साहाने दुसऱ्या डावातही बचावात्मक व आक्रमक खेळाचा नजारा सादर केला.