शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लंड कसोटी मालिकेवर गांगुलीची भविष्यवाणी

By admin | Updated: November 3, 2016 14:58 IST

कसोटी मालिकेत भारत इंग्लंडवर सहजपणे विजय मिळवेल अशी भविष्यवाणी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने केली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने इंग्लंड कसोटी मालिकेवर भविष्यवाणी केली आहे. कसोटी मालिकेत भारत इंग्लंडवर सहजपणे विजय मिळवेल अशी भविष्यवाणी सौरभ गांगुलीने केली आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये 9 नोव्हेंबरपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे. नुकत्याच मायदेशात झालेल्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडला ३-० असा क्लीन स्विप दिल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे.
 
'भारतीय संघ सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंडप्रमाणे अजून एकदा भारत व्हाईटवॉश देण्यासाठी तयार आहे अशी मला आशा आहे. इंग्लंड संघाने सावध राहायला हवं,' असं गांगुली बोलला आहे. 
 
 
गांगुलीप्रमाणे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननेही 'इंग्लंड संघाकडे स्पिनर्सची कमतरता असून, फलंदाज बांगलादेश विरोधात खेळताना अडखळत असल्याचं दिसत होतं,' असं म्हटलं आहे.  भारताच्या अश्विन आणि रवींद्र जाडेजासारख्या उत्तम फिरकीपटूंना सामोरं जाताना, इंग्लंडला प्रचंड सावधानता बाळगायला हवी, असंही वॉनने नमूद केलं.
 
इंग्लंड संघ ९ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी ५ नोव्हेंबर रोजी राजकोटला रवाना होणार आहे. मालिकेतील अन्य कसोटी सामने विशाखापट्टणम (१७ ते २१ नोव्हेंबर), मोहाली (२६ ते ३० नोव्हेंबर), मुंबई (८ ते १२ डिसेंबर) आणि चेन्नई (१६ ते २० डिसेंबर) येथे खेळल्या जाणार आहेत. 
 
मागच्या दोन कसोटी मालिकात इंग्लंडने भारतावर मिळवला विजय 
बांगलादेश दौ-यात निराशाजनक कामगिरी करुन इंग्लंडचा संघ भारतात आला आहे. पण शेवटच्या भारत दौ-यातील कामगिरी इंग्लंडचा उत्साह वाढवणारी आहे. २०१२-१३ मध्ये इंग्लिश संघ भारत दौ-यावर आला होता. त्यावेळी इंग्लंडने मालिका २-१ ने जिंकली होती. ३१ वर्षानंतर भारत आणि इंग्लंड पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहेत. यापूर्वी १९८४-८५ साली दोन्ही देश पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळले होते. 
 
दोन वर्षांपूर्वी २०१४ मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौ-यावर गेला होता. पाच कसोटी सामन्यांची ही मालिका इंग्लंडने ३-१ ने जिंकून पतौडी ट्रॉफीवर कब्जा केला होता. 
 
भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, अजिंक्य रहाणे, ईशांत शर्मा, मोहंमद शमी, गौतम गंभीर, रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा, जयंत यादव, हार्दिक पंड्या, उमेश यादव, करुण नायर, अमित मिश्रा, वृद्धिमान साहा आणि चेतेश्वर पुजारा.