शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Asian Games 2018 : आशियाई स्पर्धा उद्घाटनाची उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 10:47 IST

शनिवारी रात्री १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडणार असून याकडे आशिया खंडातील ४५ देशांसह संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे.

- अभिजीत देशमुख(थेट जकार्ता येथून)जकार्ता : शनिवारी रात्री १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडणार असून याकडे आशिया खंडातील ४५ देशांसह संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे.जकार्ताच्या प्रतिष्ठित गिलोरा बंग कर्नो स्टेडियमवर रंगणाऱ्या या भव्य सोहळ्याद्वारे यजमान इंडोनेशिया संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेईल.या सोहळ्यासाठी १२० मीटर लांबी, ३० मीटर रूंदी आणि २६ मीटर उंचीचा मंच एका भव्य पर्वताच्या प्रतिकृतीत उभारण्यात आला आहे. सुप्रसिद्ध इंडोनेशियन नृत्यदिगदर्शक डेन्नी मलिक व एको सुप्रियांटो यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ४ हजार नर्तक येथे आपली कला सादर करतील. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध इंडोनेशियन संगीतकार एडी एमस रोनाल्ड स्टीव्हन हे आपल्या शंभरपेक्षाही जास्त वाद्यवृंदच्या तालावर उत्साही आणि रोमांचक सादरीकरण करतील. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय महिला पॉप गायक आंगुंग च्या प्रदर्शनाची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. यावेळी स्पर्धेत सहभागी ४५ देशांच्या संघाची परेड सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल. यावेळी भालाफेकपटू नीरज चोप्रा भारतीय संघाचे नेतृत्व करेल. विशेष म्हणजे तीन अब्ज टेलिव्हिजन व इंटरनेट प्रेक्षकांवर ठसा उमटवण्याची इंडोनेशियाला या स्पर्धेद्वारे संधी लाभली आहे. हा दिमाखदार सोहळा भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५:३० वाजता सुरु होईल.भारताचे लक्ष सर्वोत्तम खेळावरजकार्ता : राष्ट्रकुल स्पर्धेतील चांगल्या कामगिरीनंतर भारतीय संघाचे लक्ष्य आता आशियाई स्पर्धेत चांगला खेळ करण्याकडे आहे. येथे पोहचण्यात संघाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतरही सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याबाबत संघात उत्साह आहे.आशियाई स्पर्धेची तयारी संघासाठी तणावपूर्ण राहिली. त्यात निवडीबाबत तक्रारी आणि न्यायालयीन कारवाई सोबतच नेहमीप्रमाणे पथकाच्या ८०४ सदस्यसंख्येबाबतही वाद निर्माण झाला. तसेच, पथकासोबत असलेल्या अधिकाºयांच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले.मात्र भारतीय खेळाडू आता फक्त आपल्या खेळावरच लक्ष देत आहेत. गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पदकांच्या बाबतीत दुसरे सर्वोत्तम प्रदर्शन केले. मात्र जास्तीत जास्त खेळाडू आणि प्रशिक्षकांनी मान्य केले की, आशियाई स्पर्धेत चीन, जापान, कोरिया या सारख्या देशांच्या उपस्थितीने आव्हान आणखी कडवे होेते. मात्र त्यामुळे उत्साह कमी झालेला नाही.भारताने २०१४ आशियाडमध्ये पदकांच्या संख्येच्याबाबतीत आपल्या सर्वोत्तम कामगिरीची बरोबरी केली होती. भारताने त्यात ११ सुवर्ण पदकांसह ५७ पदक मिळवले होते. संभाव्य पदकविजेत्यांमध्ये नेमबाजीत मनु भाकर, कुस्तीत सुशील कुमार, भालाफेकीत नीरज चोप्रा आघाडीवर आहेत. या पथकात हिमा दास हिचा समावेश आहे. २० वर्षांखालील विश्व चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण विजेती धावपटू असलेल्या हिमाकडून भारताला विशेष आशा आहे.बॅडमिंटन, कुस्ती, हॉकी संघावर नजर...भारताच्या ट्रॅक व फिल्डच्या खेळाडूंनी आशिया स्पर्धेच्या इतिहासात शानदार खेळ केला आहे. त्यात ७४ सुवर्णपदके मिळवली आहेत. बॅडमिंटन कोर्टवर सायना नेहवाल आणि पी.व्ही सिंधू यांचे कडवे आव्हान आहे. के. श्रीकांत आणि एच.एस. प्रणय यांच्यामुळे भारताला आणखी पदके मिळण्याची शक्यता आहे. कुस्तीत बजरंग पुनिया आणि विनेश फोगाटकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुरुष हॉकी संघ सुवर्णपदकासह २०२० आॅलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवण्याकरता खेळेल. त्याचवेळी महिला संघ गत स्पर्धेतील कांस्यपदकाचा रंग बदलण्यास उत्सुक आहे.

टॅग्स :Asian Games 2018एशियन गेम्स २०१८IndonesiaइंडोनेशियाIndiaभारत