शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

Asian Games 2018 : आशियाई स्पर्धा उद्घाटनाची उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 10:47 IST

शनिवारी रात्री १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडणार असून याकडे आशिया खंडातील ४५ देशांसह संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे.

- अभिजीत देशमुख(थेट जकार्ता येथून)जकार्ता : शनिवारी रात्री १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडणार असून याकडे आशिया खंडातील ४५ देशांसह संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे.जकार्ताच्या प्रतिष्ठित गिलोरा बंग कर्नो स्टेडियमवर रंगणाऱ्या या भव्य सोहळ्याद्वारे यजमान इंडोनेशिया संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेईल.या सोहळ्यासाठी १२० मीटर लांबी, ३० मीटर रूंदी आणि २६ मीटर उंचीचा मंच एका भव्य पर्वताच्या प्रतिकृतीत उभारण्यात आला आहे. सुप्रसिद्ध इंडोनेशियन नृत्यदिगदर्शक डेन्नी मलिक व एको सुप्रियांटो यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ४ हजार नर्तक येथे आपली कला सादर करतील. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध इंडोनेशियन संगीतकार एडी एमस रोनाल्ड स्टीव्हन हे आपल्या शंभरपेक्षाही जास्त वाद्यवृंदच्या तालावर उत्साही आणि रोमांचक सादरीकरण करतील. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय महिला पॉप गायक आंगुंग च्या प्रदर्शनाची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. यावेळी स्पर्धेत सहभागी ४५ देशांच्या संघाची परेड सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल. यावेळी भालाफेकपटू नीरज चोप्रा भारतीय संघाचे नेतृत्व करेल. विशेष म्हणजे तीन अब्ज टेलिव्हिजन व इंटरनेट प्रेक्षकांवर ठसा उमटवण्याची इंडोनेशियाला या स्पर्धेद्वारे संधी लाभली आहे. हा दिमाखदार सोहळा भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५:३० वाजता सुरु होईल.भारताचे लक्ष सर्वोत्तम खेळावरजकार्ता : राष्ट्रकुल स्पर्धेतील चांगल्या कामगिरीनंतर भारतीय संघाचे लक्ष्य आता आशियाई स्पर्धेत चांगला खेळ करण्याकडे आहे. येथे पोहचण्यात संघाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतरही सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याबाबत संघात उत्साह आहे.आशियाई स्पर्धेची तयारी संघासाठी तणावपूर्ण राहिली. त्यात निवडीबाबत तक्रारी आणि न्यायालयीन कारवाई सोबतच नेहमीप्रमाणे पथकाच्या ८०४ सदस्यसंख्येबाबतही वाद निर्माण झाला. तसेच, पथकासोबत असलेल्या अधिकाºयांच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले.मात्र भारतीय खेळाडू आता फक्त आपल्या खेळावरच लक्ष देत आहेत. गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पदकांच्या बाबतीत दुसरे सर्वोत्तम प्रदर्शन केले. मात्र जास्तीत जास्त खेळाडू आणि प्रशिक्षकांनी मान्य केले की, आशियाई स्पर्धेत चीन, जापान, कोरिया या सारख्या देशांच्या उपस्थितीने आव्हान आणखी कडवे होेते. मात्र त्यामुळे उत्साह कमी झालेला नाही.भारताने २०१४ आशियाडमध्ये पदकांच्या संख्येच्याबाबतीत आपल्या सर्वोत्तम कामगिरीची बरोबरी केली होती. भारताने त्यात ११ सुवर्ण पदकांसह ५७ पदक मिळवले होते. संभाव्य पदकविजेत्यांमध्ये नेमबाजीत मनु भाकर, कुस्तीत सुशील कुमार, भालाफेकीत नीरज चोप्रा आघाडीवर आहेत. या पथकात हिमा दास हिचा समावेश आहे. २० वर्षांखालील विश्व चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण विजेती धावपटू असलेल्या हिमाकडून भारताला विशेष आशा आहे.बॅडमिंटन, कुस्ती, हॉकी संघावर नजर...भारताच्या ट्रॅक व फिल्डच्या खेळाडूंनी आशिया स्पर्धेच्या इतिहासात शानदार खेळ केला आहे. त्यात ७४ सुवर्णपदके मिळवली आहेत. बॅडमिंटन कोर्टवर सायना नेहवाल आणि पी.व्ही सिंधू यांचे कडवे आव्हान आहे. के. श्रीकांत आणि एच.एस. प्रणय यांच्यामुळे भारताला आणखी पदके मिळण्याची शक्यता आहे. कुस्तीत बजरंग पुनिया आणि विनेश फोगाटकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुरुष हॉकी संघ सुवर्णपदकासह २०२० आॅलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवण्याकरता खेळेल. त्याचवेळी महिला संघ गत स्पर्धेतील कांस्यपदकाचा रंग बदलण्यास उत्सुक आहे.

टॅग्स :Asian Games 2018एशियन गेम्स २०१८IndonesiaइंडोनेशियाIndiaभारत