शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

वाद मिटल्याचा आनंद...

By admin | Updated: March 12, 2017 03:03 IST

बंगळुरू कसोटीदरम्यान निर्माण झालेला वाद मिटल्यामुळे आनंद झाला. दोन्ही बाजूंनी समजूतदारपणा दाखवल्यामुळे पुन्हा एकदा मैदानावरील खेळाचा आनंद घेता येईल. हा वाद मिटणे अधिक महत्त्वाचे होते.

- हर्ष भोगले लिहितो..बंगळुरू कसोटीदरम्यान निर्माण झालेला वाद मिटल्यामुळे आनंद झाला. दोन्ही बाजूंनी समजूतदारपणा दाखवल्यामुळे पुन्हा एकदा मैदानावरील खेळाचा आनंद घेता येईल. हा वाद मिटणे अधिक महत्त्वाचे होते. आॅस्ट्रेलियन खेळाडू डीआरएस घेताना नियमित मदत घेत होते, ही बाब विराट कोहलीने पंचांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर, त्याला ते सिद्धही करता आले. पण, आता या वादात न पडता आगेकूच करण्याची गरज आहे. सन २००८मध्ये सिडनी येथे घडलेली घटना मी जवळून बघितली आहे. आपल्या क्रीडाक्षेत्रासाठी ही चांगली बाब नाही. आपल्या खेळाचे खरे सौंदर्य आश्विन स्मिथला आणि लियोन कोहलीला गोलंदाजी करीत असल्याचे बघताना आहे.बंगळुरूमध्ये भारताने लढवय्या खेळ करण्यास सक्षम असल्याचे सिद्ध केले. पिछाडीवर पडल्यानंतरही आम्ही मोठ्या फरकाने विजय मिळवू शकतो, हे भारताने दाखवून दिले. दोन्ही फिरकीपटंूनी सहा बळी घेण्याची कामगिरी केली असून, वेगवान गोलंदाज आपली भूमिका चोख बजावत आहेत. भारतीय संघात समतोल साधला गेला आहे. कर्णधाराने या मालिकेत अद्याप मोठी खेळी केलेली नाही. पण, त्याने द्विशतक झळकावण्यास बराच कालावधी झालेला नाही. त्यामुळे गेल्या दोन कसोटी सामन्यांतील अपयशानंतर कोहलीवर टीका करण्याचे धाडस कुणी करणार नाही. भारत दौऱ्यावर असलेल्या आॅस्ट्रेलिया संघातील तीन खेळाडू महत्त्वाचे आहेत. त्यात वॉर्नरला अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. भारतीय उपखंडात कामगिरीत सातत्य राखण्यात तो अपयशी ठरत आहे. आशिया खंडाच्या बाहेर मात्र त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरते. त्याला लवकरच सूर गवसेल, अशी आशा आहे. दुसरा खेळाडू म्हणजे मिशेल स्टार्क. पण तो आता या मालिकेत खेळणार नाही. आॅस्ट्रेलिया संघासाठी हा मोठा धक्का आहे. नव्या व जुन्या चेंडूने परंपरागत व रिव्हर्स स्विंग मारा करण्यात सक्षम असलेला हा गोलंदाज मालिकेतील उर्वरित सामन्यांना मुकणार असल्यामुळे आॅस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. क्रिकेटसाठी स्टार्क महत्त्वाचा आहे. तो लवकरच फिट होईल, अशी आशा आहे.भारतीय संघाचे मनोधैर्य उंचावलेले असून, आॅस्ट्रेलिया संघाकडून रांचीमध्ये लढवय्या खेळ अपेक्षित आहे. (पीएमजी)