शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
3
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
4
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
5
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
6
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
7
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
8
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
9
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
10
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
11
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
12
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
13
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
14
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
15
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
16
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
17
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
18
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
19
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
20
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन

वाद मिटल्याचा आनंद...

By admin | Updated: March 12, 2017 03:03 IST

बंगळुरू कसोटीदरम्यान निर्माण झालेला वाद मिटल्यामुळे आनंद झाला. दोन्ही बाजूंनी समजूतदारपणा दाखवल्यामुळे पुन्हा एकदा मैदानावरील खेळाचा आनंद घेता येईल. हा वाद मिटणे अधिक महत्त्वाचे होते.

- हर्ष भोगले लिहितो..बंगळुरू कसोटीदरम्यान निर्माण झालेला वाद मिटल्यामुळे आनंद झाला. दोन्ही बाजूंनी समजूतदारपणा दाखवल्यामुळे पुन्हा एकदा मैदानावरील खेळाचा आनंद घेता येईल. हा वाद मिटणे अधिक महत्त्वाचे होते. आॅस्ट्रेलियन खेळाडू डीआरएस घेताना नियमित मदत घेत होते, ही बाब विराट कोहलीने पंचांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर, त्याला ते सिद्धही करता आले. पण, आता या वादात न पडता आगेकूच करण्याची गरज आहे. सन २००८मध्ये सिडनी येथे घडलेली घटना मी जवळून बघितली आहे. आपल्या क्रीडाक्षेत्रासाठी ही चांगली बाब नाही. आपल्या खेळाचे खरे सौंदर्य आश्विन स्मिथला आणि लियोन कोहलीला गोलंदाजी करीत असल्याचे बघताना आहे.बंगळुरूमध्ये भारताने लढवय्या खेळ करण्यास सक्षम असल्याचे सिद्ध केले. पिछाडीवर पडल्यानंतरही आम्ही मोठ्या फरकाने विजय मिळवू शकतो, हे भारताने दाखवून दिले. दोन्ही फिरकीपटंूनी सहा बळी घेण्याची कामगिरी केली असून, वेगवान गोलंदाज आपली भूमिका चोख बजावत आहेत. भारतीय संघात समतोल साधला गेला आहे. कर्णधाराने या मालिकेत अद्याप मोठी खेळी केलेली नाही. पण, त्याने द्विशतक झळकावण्यास बराच कालावधी झालेला नाही. त्यामुळे गेल्या दोन कसोटी सामन्यांतील अपयशानंतर कोहलीवर टीका करण्याचे धाडस कुणी करणार नाही. भारत दौऱ्यावर असलेल्या आॅस्ट्रेलिया संघातील तीन खेळाडू महत्त्वाचे आहेत. त्यात वॉर्नरला अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. भारतीय उपखंडात कामगिरीत सातत्य राखण्यात तो अपयशी ठरत आहे. आशिया खंडाच्या बाहेर मात्र त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरते. त्याला लवकरच सूर गवसेल, अशी आशा आहे. दुसरा खेळाडू म्हणजे मिशेल स्टार्क. पण तो आता या मालिकेत खेळणार नाही. आॅस्ट्रेलिया संघासाठी हा मोठा धक्का आहे. नव्या व जुन्या चेंडूने परंपरागत व रिव्हर्स स्विंग मारा करण्यात सक्षम असलेला हा गोलंदाज मालिकेतील उर्वरित सामन्यांना मुकणार असल्यामुळे आॅस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. क्रिकेटसाठी स्टार्क महत्त्वाचा आहे. तो लवकरच फिट होईल, अशी आशा आहे.भारतीय संघाचे मनोधैर्य उंचावलेले असून, आॅस्ट्रेलिया संघाकडून रांचीमध्ये लढवय्या खेळ अपेक्षित आहे. (पीएमजी)