शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची मागणी

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

नवी मुंबई : नवी मुंबईच्या रेल्वे प्रकल्पात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांचे अद्याप योग्य पुनर्वसन झालेले नाही. त्यानुसार या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची तसेच प्रकल्पग्रस्तांना गुणवत्तेनुसार रेल्वेत नोकरीची संधी देण्याची मागणी रेल्वेमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

नवी मुंबई : नवी मुंबईच्या रेल्वे प्रकल्पात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांचे अद्याप योग्य पुनर्वसन झालेले नाही. त्यानुसार या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची तसेच प्रकल्पग्रस्तांना गुणवत्तेनुसार रेल्वेत नोकरीची संधी देण्याची मागणी रेल्वेमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
मुंबई उपनगर रेल्वे सेवेचा विस्तार झाल्यानंतर मानखुर्द ते पनवेल व ठाणे ते नेरूळ हा नवीन रेल्वे मार्ग सुरू करण्यात आला. मात्र नवी मुंबईत हा रेल्वे प्रकल्प उभारत असताना त्या ठिकाणच्या अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. त्यानुसार प्रकल्पबाधित प्रकल्पग्रस्तांसाठी काही योजनाही राबवल्या. परंतु त्याचा लाभ अत्यल्प प्रकल्पग्रस्तांना झाला असल्याचे शिवसेना शहर प्रमुख सुरेश म्हात्रे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अद्यापही रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होणे बाकी आहे. त्यांना गुणवत्तेनुसार रेल्वेमध्ये नोकरी मिळावी, अशी मागणी त्यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. कोकण रेल्वेने त्यांच्या प्रकल्पात बाधित झालेल्यांचे पुनर्वसन केलेले आहे. याच धर्तीवर मध्य रेल्वेनेही नवी मुंबईच्या रेल्वे प्रकल्पग्रस्तांना नोकरीत समाविष्ट करून घ्यावे, अशी म्हात्रे यांची मागणी आहे. त्यांच्या या मागणीला अनुसरून यासंबंधीचा अहवाल मागवून घेतला जाईल, असे उत्तरही रेल्वेमंत्री प्रभू यांच्याकडून म्हात्रे यांना प्राप्त झाले आहे.(प्रतिनिधी)