शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा : मुंबई शहर पुरुषांत, मुंबई उपनगर महिलांत अजिंक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 14:53 IST

ठाणे -  मुंबई शहर यांनी पुरुष गटात, तर मुंबई उपनगरने महिला गटात "२२व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक" कबड्डी स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले.

ठाणे -  मुंबई शहर यांनी पुरुष गटात, तर मुंबई उपनगरने महिला गटात "२२व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक" कबड्डी स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले. मुंबई शहरचा प्रणव राणे आणि मुंबई उपनगरची हरजित संधू  हे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. महिलांच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरने मुंबई शहरला ३८-३७ असे पराभूत करून पाच लाख रुपयांच्या बक्षीसासह "छत्रपती शिवाजी महाराज चषक" ऊंचावला. उपविजेत्या मुंबईला तीन लाखांचा घनादेश दिला गेला.

दोन्ही संघानी सावध सुरुवात केली. मुंबई शहरने ६व्या मिनिटाला पहिला लोण देत १४-०५ अशी आघाडी घेतली. पण त्याला प्रतिउत्तर देत मध्यांतरापूर्वी काही सेकंद आधी उपनगरने लोणची परतफेड करीत हीआघाडी २ गुणांवर आणली. मध्यांतराला मुंबई शहरकडे २०-१८ अशी आघाडी होती. मध्यांतरानंतर उपनगरने आपला खेळ गतिमान करीत मुंबई वर लोण देत २७-२१ अशी आघाडी घेतली. मुंबईने देखील तोडीस तोड खेळ करीत ३६-३६ अशी बरोबरी साधली. शेवटच्या मिनिटात ३६-३५ अशी आघाडी मुंबईकडे होती. सामन्याची शेवटची चढाई मुंबईच्या पूजा यादवने केली. त्यावेळी उपनगराच्या सायली जाधवने तिची अव्वल पकड केली आणि उपनगरने मुंबईच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. पूजाच्या या पकडिने मुंबई शहरचे विजयाचे स्वप्न भंग केले.

मुंबई उपनगरने या सामन्यात २८ झटापटीचे गुण, लोणचे ४ गुण, दोन अव्वल पकड करीत ४गुण तर २ बोनस गुण असे ३८ गुण मिळविले. हरजित संधूच्या झंझावाती चढाया तिला प्रणाली नागदेवता, सायली जाधव यांची मिळालेली पकडीची साथ यामुळे उपनगरला आपला विजय साकारला आला. मुंबई शहरने या सामन्यात झटापटीचे २५ गुण, बोनसचे १०गुण, १लोण देत २गुण असे ३७ गुण मिळविले. अपेक्षा टाकले, पूजा यादव, प्रतीक्षा तांडेल यांचा खेळ मुंबईचा पराभव टाळण्यास अगदी थोडासा कमी पडला. 

पुरुषांच्या अंतिम सामन्यात मात्र मुंबई शहरने पुण्याचे आव्हान ३४-२७ असे मोडून काढले. मुंबईने पहिली पकड करीत गुणांचे खाते खोलले. पूर्वार्धात लोण देऊन देखील मुंबईकडे १३-११ अशी नाममात्र आघाडी होती. उत्तरार्धात दुसरा लोण देत मुंबईने २८-२० अशी आपली आघाडी वाढविली. शेवटी ७ गुणांच्या फरकाने त्यांनी विजय साकारला. मुंबईने या सामन्यात झटापटीचे २९ गुण, २ लोण देत ४गुण, बोनस करत १गुण असे ३४गुण मिळविले. प्रणय राणे, राज आचार्य यांच्या संयमी चढाया, त्याला सिद्धेश तटकरे, साहिल राणे यांची मिळालेली पकडीची साथ यामुळे हे शक्य झाले. पुण्याने झटापटीचे १५गुण, बोनस करीत १०गुण, अव्वल पकड करीत २गुण असे २७ गुण मिळविले. अजित चौहान, सुनील दुबीले, सुरेश जाधव, ऋषिकेश भोजने यांचा चढाई पकडीचा खेळ पुण्याचा पराभव टाळू शकला नाही.  

टॅग्स :Kabaddiकबड्डीthaneठाणेMumbaiमुंबई