शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

चानूचा सुवर्ण पराक्रम, जागतिक भारोत्तोलन, मल्लेश्वरीनंतर २२ वर्षांनी विश्वविक्रमाला गवसणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 1:41 AM

भारताची महिला भारोत्तोलक मीराबाई चानूने जागतिक भारोत्तोलन (वेटलिफ्टिंग) चॅम्पियनशिप स्पर्धेत विश्वविक्रमाची नोंद करीत सुवर्ण पदकाची कमाई केली. ४८ किलो वजन गटात तिने स्नॅचमध्ये ८५ किलो आणि जर्कमध्ये १०९ किलो वजन उचलून हा पराक्रम केला.

नवी दिल्ली : भारताची महिला भारोत्तोलक मीराबाई चानूने जागतिक भारोत्तोलन (वेटलिफ्टिंग) चॅम्पियनशिप स्पर्धेत विश्वविक्रमाची नोंद करीत सुवर्ण पदकाची कमाई केली. ४८ किलो वजन गटात तिने स्नॅचमध्ये ८५ किलो आणि जर्कमध्ये १०९ किलो वजन उचलून हा पराक्रम केला. भारोत्तोलन स्पर्धेत पदकाची कमाई करणारी ती दुसरी भारतीय महिला ठरली आहे. २२ वर्षांपूर्वी कर्णम मल्लेश्वरीने विश्व भारोत्तोलन चॅम्पियनशिप स्पर्धेत अशी कामगिरी केली होती.यामुळे रिओ आॅलिम्पिकमधील खराब कामगिरीची तिची नाराजीदेखील दूर झाली. राष्टÑगीताची धून वाजताच भारतीय रेल्वेची खेळाडू असलेल्या मीराबाईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. आॅलिम्पिक कांस्य विजेती कर्णम मल्लेश्वरी हिने याआधी १९९४ आणि १९९५ मध्ये विश्व स्पर्धेचे सुवर्ण जिंकले होते. चानू रिओ आॅलिम्पिकच्या तिन्ही प्रयत्नांत अपयशी ठरली होती. १२ खेळाडूंचा समावेश असलेल्या या प्रकारात ज्या दोन खेळाडू स्पर्धा पूर्ण करू शकल्या नव्हत्या, त्यात चानू एक होती. आज थायलंडची सुकराचोन हिला रौप्य आणि सेगुरा इरिसने कांस्य जिंकले. डोपिंग प्रकरणामुळे रशिया, चीन, कझाकस्तान, युक्रेन आणि अझरबैजान येथील भारोत्तोलक या स्पर्धेत सहभागी होऊ शकले नाहीत.राष्टÑपती, पंतप्रधानांकडून अभिनंदनसुवर्ण विजेती भारोत्तोलक साइखोम मीराबाई चानू हिचे राष्टÑपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.‘भारताला मीराबाईच्या कामगिरीचा अभिमान आहे. त्यासाठी तिचे अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा,’ असे मोदी यांनी टिष्ट्वट केले. ‘देशाला चॅम्पियन देणाºया मणिपूरचे आणि विश्व पराक्रमी मीराबाईचे अभिनंदन’, असे राष्टÑपतींनी म्हटले आहे.मीराबाईचे अभिनंदन करणाºयांमध्ये क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड, पाच वेळेची विश्व चॅम्पियन बॉक्सर एम. सी. मेरीकोम, आॅलिम्पिक पदक विजेता बॉक्सर विजेंदरसिंग यांचा समावेश आहे.भारतीय भारोत्तोलन महासंघाचे महासचिव सहदेव यादव म्हणाले,‘ही आॅलिम्पिकपेक्षा मोठी उपलब्धी आहे. विश्व स्पर्धेत अतिषय अवघड आव्हान असते. त्यासाठी मीराबाई आणि कोच विजय शर्मा अभिनंदनास पात्र आहेत.आज मी जे काही मिळवले आहे, ते प्रशिक्षक विजय शर्मा यांच्या मार्गदर्शनाशिवाय शक्य झाले नसते. मी आणि माझ्या प्रशिक्षकांनी उच्च स्तरावर यशस्वी होण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नव्हती. रिओ आॅलिम्पिक स्पर्धेतील अपयश माझ्यासाठी खूप निराशाजनक होते. मी रिओला चुका केल्या होत्या आणि अजूनही ती गोष्ट सलत आहे. मात्र, या पदकाने ती निराशा दूर झाली आहे. आता मी माझ्या कमजोर बाजूंकडे अधिक लक्ष देईल आणि आगामी राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा तसेच टोकिओ आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकाण्याचा पुर्ण प्रयत्न करेल.- मीराबाई चानू

टॅग्स :Sportsक्रीडाIndiaभारत