शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

अरुण भारद्वाज मुंबई-नाशिक-पुणे-मुंबई रन पूर्ण करणारे पहिले भारतीय अल्ट्रा-मॅरेथॉन धावपटू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 16:20 IST

महाराष्ट्रातील तीन प्रमुख शहरांत ५६० किलोमीटर अंतर १६६ तासांत धावून पार

मुंबई : आंतरराष्ट्रीय मल्टि-डे रेसचे एकमेव भारतीय विजेते अरुण कुमार भारद्वाज यांनी अलीकडेच मुंबई-नाशिक-पुणे-मुंबई रन पूर्ण करून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. महाराष्ट्रातील तीन प्रमुख शहरांना जोडणारा  ५६० किलोमीटरचा विनाथांबा प्रवास त्यांनी ३१ जानेवारी, २०२१ रोजी सुरू केला आणि १६६ तासांत पूर्ण केला.  चेतावणी दिली होती; बेन स्टोक्सनं उडवला विराटचा त्रिफळा अन् 'ते' ट्विट व्हायरल, Video

गेल्या काही वर्षांत भारद्वाज यांनी दीर्घ अंतराची अनेक रनिंग टायटल्स जिंकली आहे. हा रन त्यांनी व्यायाम व धावण्याच्या माध्यमातून आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा संदेश देण्याच्या उद्दिष्टाने सुरू केला. लोकांना आपल्या कृतीद्वारे प्रेरणा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. भारद्वाज यांनी हा मार्ग निवडला, कारण, त्यांना धावण्याती आव्हानांना सामोरे जायला आवडते व हा मार्ग उष्मा आणि तीव्र चढणीचे घाट यांच्यामुळे आव्हानात्मक आहे. या मार्गातील १४ किलोमीटर लांबीचा कसारा घाट तीव्र चढणीचा आहे आणि हा घाट सर्वांत खडतर घाटांपैकी एक समजला जातो. ६.५ दिवसांच्या या रनमध्ये अरुण यांनी दिवसाला सरासरी ८० किलोमीटर अंतर कापले आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या या रनमध्ये अनेक लोक त्यांना पाठिंबा म्हणून त्यांच्यासोबत काही किलोमीटर धावले.  India vs England, 1st Test : चेन्नईतील पराभवानंतर विराट कोहलीनं दिलं 'हे' कारण, म्हणाला...

भारतातील पहिल्या काही आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त केलेल्या एण्ड्युरन्स रनर्सपैकी एक असलेले अरुण भारद्वाज या रनबद्दल म्हणाले, “भारतात रनिंगची संस्कृती गेल्या काही वर्षांपासून वेग घेऊ लागली आहे. आरोग्य व तंदुरुस्तीचा संदेश देण्यासोबतच अल्ट्रा-मॅरेथॉन रन्स आपल्या भविष्यकाळातील क्रीडापटूंना ऑलिम्पिक्समध्ये स्थान मिळवण्याच्या दृष्टीने तयारीमध्ये मदत करतील. मी धावतो, कारण, मला अधिकाधिक लोकांना रनिंगची प्रेरणा द्यायची आहे आणि माझ्यातील क्रीडापटूला कष्ट करण्यासाठी तसेच तंदुरुस्त व निरोगी राहण्यासाठी नवीन आव्हाने हवी असतात. मला माझ्या मुलींसाठीही रोल मॉडेल व्हायचे आहे.”

दिल्लीचे रहिवासी असलेले अरुण यांना काही दिवसांत शेकडो किलोमीटर अंतर धावून पार करण्याची सवय आहे. लेहमार्गे कारगिल ते कन्याकुमारी हा ४१०० किलोमीटर्सचा रन त्यांचा सर्वांत आवडता आहे. हे अंतर कापण्यासाठी त्यांना दोन महिने लागले. गेल्या काही वर्षांत भारद्वाज यांनी अनेक दीर्घ पल्ल्याचे रन्स पूर्ण केले आहेत. २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेत केलेल्या ‘सिक्स-डे रेस’मध्ये त्यांनी दक्षिण आशियामधील विक्रम प्रस्थापित केला होता.

टॅग्स :MumbaiमुंबईNashikनाशिक