शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

अनुष्का माझी शक्ती : विराट कोहली

By admin | Updated: April 15, 2015 01:37 IST

क्रिकेट वर्तुळात सध्या सर्वांत चर्चेत असलेले प्रेमी जोडपे म्हणजे भारतीय स्टार फलंदाज विराट कोहली व अनुष्का शर्मा यांचे आहे.

बंगळुरू : क्रिकेट वर्तुळात सध्या सर्वांत चर्चेत असलेले प्रेमी जोडपे म्हणजे भारतीय स्टार फलंदाज विराट कोहली व अनुष्का शर्मा यांचे आहे. टीकाकारांचे लक्ष्य ठरल्यानंतरही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा आपल्या प्रेमिकेचे समर्थन केले आहे. अनुष्काची सोबत मला आवडत असून ती माझी शक्ती आहे, असे विराट म्हणाला.एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विराटने सांगितले की, ‘अनुष्कासोबत माझे नाते विशेष आहे. विश्वकप स्पर्धेनंतर हे नाते अधिक घट्ट झाले. आमच्या दोघांमधील प्रेम आणखी वृद्धिंगत झाले. माझ्या प्रेमाबाबत कुणी वाईट बोलले तर मला राग येणे स्वाभाविक आहे. कारण ते माझ्या खासगी जीवनात हस्तक्षेप करण्यासारखे आहे.’रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या बसमधील या हायप्रोफाईल पेअरचे एकत्र छायचित्र सध्या सोशल नेटवर्किंग साईटवर लोकप्रिय होत आहे. विराट पुढे म्हणाला,‘अनुष्का माझी शक्ती आहे. ज्या वेळी ती माझ्यासोबत आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर होती, त्या वेळी माझी कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. अनुष्का मैदानावर उपस्थित असल्यानंतर मला विशेष आनंद मिळतो.’पत्रकारासोबत झालेल्या बाचाबाचीबाबत बोलताना विराट म्हणाला, ‘माझे कधी-कधी स्वत:वर नियंत्रण राहत नाही; पण कुणी जर माझ्या खासगी जीवनाबाबत उलटसुलट बोलत असेल तर राग येणे स्वाभाविक आहे.’ विराट पुढे म्हणाला,‘बीसीसीआयची परवानगी मिळाल्यानंतर अनुष्का माझ्यासोबत आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर आली होती. मी शतक झळकावल्यानंतर स्टेडियममध्ये उपस्थित अनुष्काला टाळ्या वाजवताना बघून आनंद झाला. ती स्टेडियममध्ये उपस्थित असताना मी शतक ठोकले होते, याचा क्रिकेट चाहत्यांना विसर पडला. विश्वकप स्पर्धेत भारताच्या पराभवासाठी अनुष्काला जबाबदार धरण्यात येईल, याचा मी कधी विचारही केला नव्हता. मी माझे जीवन क्रिकेटला समर्पित केले आहे, याचा लोकांनी विचार करायला हवा. माझ्या हृदयाची स्पंदनं ‘इंडिया’साठी असतात आणि त्यामुळेच मैदानावर उतरल्यानंतर चमकदार कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असतो. याची माझ्या संघाला व अधिकाऱ्यांना चांगली कल्पना आहे. कुणापुढे हे सिद्ध करण्याची मला गरज वाटत नाही.’ (वृत्तसंस्था) एखाद्याच्या खासगी आयुष्यात दुसरे हस्तक्षेप कसे करतात, याचे मला आश्चर्य वाटते. एखाद्याबाबत एवढे वाईट कसे काय बोलू शकतात. भारताच्या पराभवात अनुष्काची काय भूमिका आहे? ती उपस्थित असली म्हणजे मी मैदानावर सकारात्मक असतो; पण लोकांनी तिलाच लक्ष्य ठरवले, याचे आश्चर्य वाटले. विश्वकप स्पर्धेनंतर अनुष्का व माझे नाते अधिक घट्ट झाले. त्यानंतर आम्हाला एकमेकांना समजून घेण्याची चांगली संधी मिळाली.- विराट कोहली