शहरं
Join us  
Trending Stories
1
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
2
“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल
3
याला म्हणतात 'इंटरनॅशनल बेइज्जती'! रशियन तरुणींना कोणत्या देशाचे तरुण सर्वाधिक आवडतात? पाकिस्तानी ब्लॉगरचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही!
4
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
5
SIR वरुन पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढला; कोलकात्यात शेकडो BLO चे तीव्र आंदोलन...
6
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
7
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
8
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
9
तीन स्मार्ट मैत्रिणी अन् महिन्याला लाखोंची कमाई ! ब्रम्होसची माहिती देत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांतला केवळ तीन वर्षांची शिक्षा
10
लैंगिक शोषणाच्या तक्रारींची भिती दाखवणाऱ्या प्राध्यापकाला इतकी सौम्य शिक्षा कशी? चार प्राध्यापकांची केली होती फसवणूक
11
IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला...
12
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
13
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
14
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
15
Video: Kiss घेण्याचा मोह...; प्रेमी जोडप्याचे मालगाडी खाली बसून 'नको ते' चाळे अन् अचानक... 
16
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
17
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
18
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
19
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
20
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
Daily Top 2Weekly Top 5

अनुष्का माझी शक्ती : विराट कोहली

By admin | Updated: April 15, 2015 01:37 IST

क्रिकेट वर्तुळात सध्या सर्वांत चर्चेत असलेले प्रेमी जोडपे म्हणजे भारतीय स्टार फलंदाज विराट कोहली व अनुष्का शर्मा यांचे आहे.

बंगळुरू : क्रिकेट वर्तुळात सध्या सर्वांत चर्चेत असलेले प्रेमी जोडपे म्हणजे भारतीय स्टार फलंदाज विराट कोहली व अनुष्का शर्मा यांचे आहे. टीकाकारांचे लक्ष्य ठरल्यानंतरही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा आपल्या प्रेमिकेचे समर्थन केले आहे. अनुष्काची सोबत मला आवडत असून ती माझी शक्ती आहे, असे विराट म्हणाला.एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विराटने सांगितले की, ‘अनुष्कासोबत माझे नाते विशेष आहे. विश्वकप स्पर्धेनंतर हे नाते अधिक घट्ट झाले. आमच्या दोघांमधील प्रेम आणखी वृद्धिंगत झाले. माझ्या प्रेमाबाबत कुणी वाईट बोलले तर मला राग येणे स्वाभाविक आहे. कारण ते माझ्या खासगी जीवनात हस्तक्षेप करण्यासारखे आहे.’रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या बसमधील या हायप्रोफाईल पेअरचे एकत्र छायचित्र सध्या सोशल नेटवर्किंग साईटवर लोकप्रिय होत आहे. विराट पुढे म्हणाला,‘अनुष्का माझी शक्ती आहे. ज्या वेळी ती माझ्यासोबत आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर होती, त्या वेळी माझी कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. अनुष्का मैदानावर उपस्थित असल्यानंतर मला विशेष आनंद मिळतो.’पत्रकारासोबत झालेल्या बाचाबाचीबाबत बोलताना विराट म्हणाला, ‘माझे कधी-कधी स्वत:वर नियंत्रण राहत नाही; पण कुणी जर माझ्या खासगी जीवनाबाबत उलटसुलट बोलत असेल तर राग येणे स्वाभाविक आहे.’ विराट पुढे म्हणाला,‘बीसीसीआयची परवानगी मिळाल्यानंतर अनुष्का माझ्यासोबत आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर आली होती. मी शतक झळकावल्यानंतर स्टेडियममध्ये उपस्थित अनुष्काला टाळ्या वाजवताना बघून आनंद झाला. ती स्टेडियममध्ये उपस्थित असताना मी शतक ठोकले होते, याचा क्रिकेट चाहत्यांना विसर पडला. विश्वकप स्पर्धेत भारताच्या पराभवासाठी अनुष्काला जबाबदार धरण्यात येईल, याचा मी कधी विचारही केला नव्हता. मी माझे जीवन क्रिकेटला समर्पित केले आहे, याचा लोकांनी विचार करायला हवा. माझ्या हृदयाची स्पंदनं ‘इंडिया’साठी असतात आणि त्यामुळेच मैदानावर उतरल्यानंतर चमकदार कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असतो. याची माझ्या संघाला व अधिकाऱ्यांना चांगली कल्पना आहे. कुणापुढे हे सिद्ध करण्याची मला गरज वाटत नाही.’ (वृत्तसंस्था) एखाद्याच्या खासगी आयुष्यात दुसरे हस्तक्षेप कसे करतात, याचे मला आश्चर्य वाटते. एखाद्याबाबत एवढे वाईट कसे काय बोलू शकतात. भारताच्या पराभवात अनुष्काची काय भूमिका आहे? ती उपस्थित असली म्हणजे मी मैदानावर सकारात्मक असतो; पण लोकांनी तिलाच लक्ष्य ठरवले, याचे आश्चर्य वाटले. विश्वकप स्पर्धेनंतर अनुष्का व माझे नाते अधिक घट्ट झाले. त्यानंतर आम्हाला एकमेकांना समजून घेण्याची चांगली संधी मिळाली.- विराट कोहली