शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या तिजोरीची चावी येणार पुन्हा महिलेच्या हाती

By admin | Updated: May 23, 2017 02:16 IST

महापालिकेची तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने शुभांगी पाटील व शिवसेनेने ऋचा पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महापालिकेची तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने शुभांगी पाटील व शिवसेनेने ऋचा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मंगळवारी निवडणूक होणार असून तिजोरीच्या चाव्या दुसऱ्यांदा महिलेच्या हाती जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गतवर्षी राष्ट्रवादीच्या एका सदस्याला मतदानाचा हक्क नाकारल्याने व काँगे्रसने बंडखोरी केल्याने शिवसेनेने सभापतीपद मिळविले होते. परंतु यावेळी अंतर्गत वादामुळे शिवसेनेने नवख्या सदस्याला संधी देवून अप्रत्यक्षपणे हार मानली असल्याचे बोलले जात आहे. एक महिन्यापासून सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडीमुळे स्थायी समिती सभापतीपदासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी व शिवसेनेच्यावतीने कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसेनेमध्ये सदस्य निवडीवरून प्रचंड मतभेद झाले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संमतीने विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यासह इतर सदस्यांच्या यादीला विजय नाहटा यांच्या गटाने जोरदार आक्षेप घेतले. नवीन नगरसेवकांना संधी मिळावी यासाठी एक गटाने बेलापूरचे संपर्क प्रमुख विठ्ठल मोरे यांच्याकडे राजीनामे दिले होते. यामुळे शेवटच्या क्षणी दोन नवीन सदस्यांना संधी देण्यात आली. पक्षातील भांडणामुळे स्थायी समिती सभापती निवडणुकीकडे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्लक्ष केले. काँगे्रसनेही सहकार्य करण्यास नकार दिल्याने अखेर शिवसेनेने नवख्या ऋचा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेमधील भांडणामुळे राष्ट्रवादी काँगे्रसनेही बघ्याची भूमिका घेतली होती. सेनेची यादी निश्चित झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांची यादी जाहीर केली. सभापतीपदासाठी सुरेश कुलकर्णी यांचे नाव आघाडीवर असताना शेवटच्या क्षणी तुर्भेमधील नगरसेविका शुभांगी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँगे्रसने दुसऱ्यांदा निवडून आलेल्या व स्थायी समितीचा अनुभव असलेल्या नगरसेविकेला संधी दिली आहे. दुसरीकडे शिवसेना व भाजपाने नवख्या उमेदवाराला संधी दिली आहे. गतवेळी काँगे्रसने बंडखोरी करून युतीला साथ दिली होती. यावेळी पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या सदस्यांना आघाडी धर्म पाळण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेनेच्यावतीने काँगे्रसचे मत वळविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यास यश आले नसल्याने शेवटच्या क्षणी ऋचा पाटीलला उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाला पूर्णविराम मिळाल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजता निवडणूक होणार असून काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.