शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

महापालिकेच्या तिजोरीची चावी येणार पुन्हा महिलेच्या हाती

By admin | Updated: May 23, 2017 02:16 IST

महापालिकेची तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने शुभांगी पाटील व शिवसेनेने ऋचा पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महापालिकेची तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने शुभांगी पाटील व शिवसेनेने ऋचा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मंगळवारी निवडणूक होणार असून तिजोरीच्या चाव्या दुसऱ्यांदा महिलेच्या हाती जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गतवर्षी राष्ट्रवादीच्या एका सदस्याला मतदानाचा हक्क नाकारल्याने व काँगे्रसने बंडखोरी केल्याने शिवसेनेने सभापतीपद मिळविले होते. परंतु यावेळी अंतर्गत वादामुळे शिवसेनेने नवख्या सदस्याला संधी देवून अप्रत्यक्षपणे हार मानली असल्याचे बोलले जात आहे. एक महिन्यापासून सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडीमुळे स्थायी समिती सभापतीपदासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी व शिवसेनेच्यावतीने कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसेनेमध्ये सदस्य निवडीवरून प्रचंड मतभेद झाले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संमतीने विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यासह इतर सदस्यांच्या यादीला विजय नाहटा यांच्या गटाने जोरदार आक्षेप घेतले. नवीन नगरसेवकांना संधी मिळावी यासाठी एक गटाने बेलापूरचे संपर्क प्रमुख विठ्ठल मोरे यांच्याकडे राजीनामे दिले होते. यामुळे शेवटच्या क्षणी दोन नवीन सदस्यांना संधी देण्यात आली. पक्षातील भांडणामुळे स्थायी समिती सभापती निवडणुकीकडे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्लक्ष केले. काँगे्रसनेही सहकार्य करण्यास नकार दिल्याने अखेर शिवसेनेने नवख्या ऋचा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेमधील भांडणामुळे राष्ट्रवादी काँगे्रसनेही बघ्याची भूमिका घेतली होती. सेनेची यादी निश्चित झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांची यादी जाहीर केली. सभापतीपदासाठी सुरेश कुलकर्णी यांचे नाव आघाडीवर असताना शेवटच्या क्षणी तुर्भेमधील नगरसेविका शुभांगी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँगे्रसने दुसऱ्यांदा निवडून आलेल्या व स्थायी समितीचा अनुभव असलेल्या नगरसेविकेला संधी दिली आहे. दुसरीकडे शिवसेना व भाजपाने नवख्या उमेदवाराला संधी दिली आहे. गतवेळी काँगे्रसने बंडखोरी करून युतीला साथ दिली होती. यावेळी पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या सदस्यांना आघाडी धर्म पाळण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेनेच्यावतीने काँगे्रसचे मत वळविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यास यश आले नसल्याने शेवटच्या क्षणी ऋचा पाटीलला उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाला पूर्णविराम मिळाल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजता निवडणूक होणार असून काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.