शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
6
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
7
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
8
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
9
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
10
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
11
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
12
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
13
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
14
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
15
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
16
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
17
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
18
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
19
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
20
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

महापालिकेच्या तिजोरीची चावी येणार पुन्हा महिलेच्या हाती

By admin | Updated: May 23, 2017 02:16 IST

महापालिकेची तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने शुभांगी पाटील व शिवसेनेने ऋचा पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महापालिकेची तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने शुभांगी पाटील व शिवसेनेने ऋचा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मंगळवारी निवडणूक होणार असून तिजोरीच्या चाव्या दुसऱ्यांदा महिलेच्या हाती जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गतवर्षी राष्ट्रवादीच्या एका सदस्याला मतदानाचा हक्क नाकारल्याने व काँगे्रसने बंडखोरी केल्याने शिवसेनेने सभापतीपद मिळविले होते. परंतु यावेळी अंतर्गत वादामुळे शिवसेनेने नवख्या सदस्याला संधी देवून अप्रत्यक्षपणे हार मानली असल्याचे बोलले जात आहे. एक महिन्यापासून सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडीमुळे स्थायी समिती सभापतीपदासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी व शिवसेनेच्यावतीने कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसेनेमध्ये सदस्य निवडीवरून प्रचंड मतभेद झाले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संमतीने विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यासह इतर सदस्यांच्या यादीला विजय नाहटा यांच्या गटाने जोरदार आक्षेप घेतले. नवीन नगरसेवकांना संधी मिळावी यासाठी एक गटाने बेलापूरचे संपर्क प्रमुख विठ्ठल मोरे यांच्याकडे राजीनामे दिले होते. यामुळे शेवटच्या क्षणी दोन नवीन सदस्यांना संधी देण्यात आली. पक्षातील भांडणामुळे स्थायी समिती सभापती निवडणुकीकडे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्लक्ष केले. काँगे्रसनेही सहकार्य करण्यास नकार दिल्याने अखेर शिवसेनेने नवख्या ऋचा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेमधील भांडणामुळे राष्ट्रवादी काँगे्रसनेही बघ्याची भूमिका घेतली होती. सेनेची यादी निश्चित झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांची यादी जाहीर केली. सभापतीपदासाठी सुरेश कुलकर्णी यांचे नाव आघाडीवर असताना शेवटच्या क्षणी तुर्भेमधील नगरसेविका शुभांगी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँगे्रसने दुसऱ्यांदा निवडून आलेल्या व स्थायी समितीचा अनुभव असलेल्या नगरसेविकेला संधी दिली आहे. दुसरीकडे शिवसेना व भाजपाने नवख्या उमेदवाराला संधी दिली आहे. गतवेळी काँगे्रसने बंडखोरी करून युतीला साथ दिली होती. यावेळी पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या सदस्यांना आघाडी धर्म पाळण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेनेच्यावतीने काँगे्रसचे मत वळविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यास यश आले नसल्याने शेवटच्या क्षणी ऋचा पाटीलला उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाला पूर्णविराम मिळाल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजता निवडणूक होणार असून काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.