शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

रस्त्यांच्या कामामधील त्रुटीमुळेच पाणी, गाळ साचण्याचे प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 12:20 AM

रस्त्यांच्या कामादरम्यान तांत्रिक बाबींकडे ठेकेदारांकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे.

नवी मुंबई : रस्त्यांच्या कामादरम्यान तांत्रिक बाबींकडे ठेकेदारांकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे रस्त्यांच्या आराखड्यात त्रुटी निर्माण होऊन जागोजागी पाणी तसेच गाळ साचण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, या प्रकारामुळे दुचाकीस्वारांना अपघातांचे निमंत्रण मिळत आहे.शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण करताना रस्त्याचा उतार लगतच्या नाल्याच्या दिशेने करणे आवश्यक आहे. याकरिता रस्त्यांची कामे केली जाताना ती अत्यंत बारकाईने तपासली गेली पाहिजेत. मात्र, नवी मुंबई महापालिकेकडून ठेकेदारांना काम दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्याला बगल दिली जाते. यामुळे तांत्रिक बाबींचे गांभीर्य लक्षात न घेता, सरसकट डांबरीकरण उरकण्याचे काम ठेकेदाराकडून केले जाते. याकरिता रस्त्याचा उतार योग्य झाला आहे का हे देखील तपासले जात नाही. परिणामी शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी चढ-उतार झाल्याचे पाहायला मिळते. त्याचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागतो. हाच निष्काळजीपणा पावसाळ्यात देखील डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यांचा उतार योग्य दिशेला नसल्याने मध्यभागी पाणी साचणे, अथवा गटारांच्या विरुद्ध दिशेने पाणी वाहणे असे प्रकार रस्त्यांवर पाहायला मिळत आहेत. त्यातूनच काही ठिकाणी पाण्यासोबत वाहून आलेला मातीचा गाळ रस्त्यालगत साचत आहे. यामुळे त्याठिकाणी रस्ता निसरडा होऊन दुचाकीस्वारांच्या अपघातांचे प्रकार घडत आहेत. शिवाय अशा ठिकाणी स्वच्छतेचाही प्रश्न निर्माण होत आहे. ही बाब पालिकेकडून गांभीर्याने घेऊन रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या सदोष कार्यपद्धतीत सुधार करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अभयचंद्र सावंत यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. भविष्यात रस्त्यांचे डांबरीकरण करताना या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.