शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

ऐन दिवाळीत खारघर शहरात पाणीटंचाई; रहिवाशांचा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 23:46 IST

निवडणुका संपताच परिस्थिती जैसे थे

पनवेल : ऐन दिवाळीत खारघर शहरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरळीत झालेला पाणीपुरवठा निवडणुका संपताच पुन्हा खंडित झाल्याने खारघरवासीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.

खारघर शहरातील खराब रस्ते, अपुरा पाणीपुरवठा हे विषय रहिवाशांच्या जिव्हाळ्याचे आहेत. सिडको अथवा पालिकेच्या मार्फत हे विषय सुटत नसल्याने खारघर शहरात नोटा मोहीम सुरू झाली होती. पनवेल विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर नोटाला मतदान करण्यात आले. यावरून मूलभूत सुविधांवरून रहिवाशांची प्रचंड नाराजी असल्याचे दिसून येत आहे. ऐन दिवाळीत पाणी नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत निवडणुका संपताच पुन्हा एकदा शहरात अपुरा पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

खारघर शहराला ७० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, सध्याच्या घडीला खारघर शहराला केवळ ५५ ते ६० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विशेष म्हणजे, खारघर शहरात मोठ्या संख्येने गृहप्रकल्प उभारले जात असल्याने पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मागील दोन वर्षांपासून ही समस्या वाढत चालली असताना सिडकोच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविला गेलेला नाही. शहरातील सेक्टर १२, ११, ३६, १० तसेच २१ मधील काही सोसायटींमध्ये अपुºया पाणीपुरवठ्याची समस्या आहे. यासंदर्भात नगरसेवक गुरुनाथ गायकर यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधीक्षकांना शहरातील पाणीसमस्या सोडविण्याची विनंती केली आहे. ३० आॅक्टोबरपर्यंत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर रहिवाशांना घेऊन हंडा मोर्चा काढला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.शहरातील अपुºया पाणीपुरवठ्यासंदर्भात वरिष्ठांना माहिती दिली आहे. त्यानुसार पाणी सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शनिवारी रात्री पाणीपुरवठा सुरळीत होईल. - सुजित जाधव, पाणी पुरवठा अधिकारी, सिडको खारघर

टॅग्स :Waterपाणी