शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
2
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
3
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
4
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
5
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
6
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
7
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
8
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
9
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
10
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
11
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
12
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
13
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
14
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
15
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
16
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
17
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
18
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
19
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
20
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या लावारिसांकडून वाजपेयींच्या अंत्ययात्रेचे फोटो मोदींच्या रॅलीसाठी वापरले - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 21:07 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आश्वासनांची पोलखोल करणाऱ्या सभांचा धडाका लावला आहे. आजही कामोठे, पनवेलमध्ये झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आश्वासनांची पोलखोल करणाऱ्या सभांचा धडाका लावला आहे. आजही कामोठे, पनवेलमध्ये झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली.

गुजरातमध्ये नरेंद्र मोदींनी जेंव्हा निवडणुकीचा फॉर्म भरला, त्यावेळेला रॅलीत किती गर्दी जमली होती. हे दाखवण्यासाठी त्यांनी खोटे फोटो वापरले. भाजपाच्या लावारिस आयटीसेलने अटलजींच्या अंत्ययात्रेतील फुटेज आणि फोटो मोदींच्या निवडणुकीत फॉर्म भरतानाचे असल्याचे दाखविले, असं सांगत राज ठाकरे यांनी व्हिडीओच्या माध्यमातून नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.  

वर्षाला 2 कोटी लोकांना रोजगार मोदी देणार होते त्याचं काय झालं? मेक इन इंडियाचं काय झालं? स्टार्ट अप इंडियाचं काय झालं?नोटबंदी कोणालाही विश्वासात न घेता का लादली? ह्या नोटबंदीच्या रांगेत अनेक माणसं गेली, 4.5 ते 5 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. यावर मोदी कधी बोलणार? असे सवाल करत नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. 

मोदींच्या काळात अनेक उद्योगपती बँकांना बुडवून देशाबाहेर फरार झाले. निरव मोदींवर केसेस होत्या, सीबीआय पण एका प्रकरणात्याची चौकशी करत होते पण तरीही निरव मोदी देश सोडून पळून जाऊच कसा शकला? विजय माल्ल्यानी 9000 कोटी रुपयांचं बँकांच कर्ज थकवलं होतं, पण विजय मल्ल्या हे पैसे भरायला तयार होते. पण त्यांना मोदी सरकारकडून का संधी दिली नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. तसेच, 1 लाख 12 हजार कोटी रुपयांचं कर्ज थकवून देखील त्याला राफेलची विमान बनवायची संधी कशी दिली? कुठला अनुभव होता अनिल अंबानीना? असे म्हणत राफेल डीलवरुन मोदी सरकारवर टीका केली. 

RBI च्या फंडाला हात घालायची जर सरकारवर वेळ येत असेल तर मोदी पुलवामा हल्ल्यानंतर कशाच्या जीवावर युद्ध करायला निघाले होते?बालाकोट एअरस्ट्राईक मध्ये किती माणसं मारली गेली ह्याचा तपशील आमच्याकडे नाही असं हवाईदल प्रमुख सांगत असताना, 250 माणसं मारली गेली हा दावा अमित शाह कुठून करत होते, असं राज ठाकरे म्हणाले. 

पंतप्रधानांनी जे गाव दत्तक घेतलं तिथे नाले ओसंडून वाहत आहेत, प्यायचं पाणी शुद्ध नाही, ग्रामपंचायतीचं कार्यालय नाही, कॉलेज नाही, धड रस्ते नाहीत, गावात नाल्याचं पाणी वाहतंय, गावात रोगराई पसरली आहे. मोदींनी दत्तक घेतलेलं गाव सुधारू शकलं नाही ते देश काय सुधारणार, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. 

गेली साडेचार वर्ष सेना भाजपा एकमेकांच्या उरावर बसत होते, मग युती झालीच कशी? हे दोन्ही पक्ष सत्तेसाठी आणि पैशांसाठी लाचार आहेत, असं म्हणत राज ठाकरे यांनी भाजपा आणि शिवसेनेवर टीका केली.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMumbaiमुंबईmaval-pcमावळpanvelपनवेलNavi Mumbaiनवी मुंबईNarendra Modiनरेंद्र मोदी