शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
8
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
9
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
10
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
11
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
12
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
13
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
14
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
15
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
16
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
17
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
18
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
19
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
20
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या

दोन कंपन्या आगीच्या भक्षस्थानी; रबाळे एमआयडीसीमधील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 8:05 PM

Fire to two Companies : आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला सुमारे तीन तास प्रयत्न करावे लागले. 

ठळक मुद्देमंगळवारी संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली.

नवी मुंबई : रबाळे एमआयडीसी मधील ए.एस.व्ही केमिकल्स या कंपनीला आग लागल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. आग अधिक पसरल्याने शेजारच्या देखील एका कंपनीने पेट घेतला होता. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला सुमारे तीन तास प्रयत्न करावे लागले. 

 

मंगळवारी संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. रबाळे एमआयडीसी मधील ए.एस.व्ही. मल्टीकेमिकल्स या कंपनीत आग लागली. आगीमध्ये कंपनीतील केमिकल ने पेट घेतल्याने छोटे स्फोट होऊ लागले. त्यामुळे काही मिनिटातच संपूर्ण कंपनीत आग पसरली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निघत होते. तर सतत होणाऱ्या छोट्या छोट्या स्फोटाने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या आगीची माहिती मिळताच रबाळे एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्याकडून आग वीजवण्याचे प्रयत्न सुरु असतानाच छोटे मोठे स्फोट होत होते. शिवाय आगीचा भडका होऊन शेजारच्या शेखर ऑप्टो इलेकट्रोनिक्स या कंपनीने देखील पेट घेतला होता. त्यामुळे महापालिका अग्निशमन दलाचे व इतर एकूण सहा बंब घटनास्थळी दाखल झाले होते. हि आग वेळीच आटोक्यात न आल्यास परिसरातील इतरही कंपन्यांना धोका होता. त्यामुळे सलग तीन तास शर्थीचे प्रयत्न करून अग्निशमन दलाने सुमारे तीन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे एमआयडीसी अग्निशमन दलाचे अधिकारी आर. बी. पाटील यांनी सांगितले. परंतु आगीमध्ये दोन्ही कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. तर खबरदारी म्हणून परिसरातल्या इतरही कंपन्यांमधील कामगारांना बाहेर काढण्यात आले होते. 

टॅग्स :fireआगFire Brigadeअग्निशमन दलMIDCएमआयडीसीNavi Mumbaiनवी मुंबई