शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

एकसंघ राष्ट्र निर्माणासाठी प्रयत्न करा! राज्यातील सामाजिक अशांततेबद्दल शरद पवारांना चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 05:45 IST

मणिपूरमध्ये सामाजिक अशांतता झाल्यानंतर पंतप्रधानांना तिकडे चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा असे कधी वाटले नाही. आजूबाजूच्या राज्यांतही हे घडले. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात काही घडेल की काय, अशी चिंता वाटते.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: मणिपूरमध्ये सामाजिक अशांतता झाल्यानंतर पंतप्रधानांना आपण तिकडे चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा असे कधी वाटले नाही. आजूबाजूच्या राज्यांतही हे घडले. खाली कर्नाटकातही घडले. अलीकडच्या काळातही महाराष्ट्रात काही घडेल की काय, अशी चिंता वाटते. जात, धर्म, भाषा याच्या पलीकडे जाऊन एकसंघ राष्ट्र निर्माणासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसच्याशरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे व्यक्त केले.

डॉ. मंगेश आमले यांनी येथे आयोजित केलेल्या सामाजिक ऐक्य परिषदेमध्ये शरद पवार यांनी भूमिका मांडली. देशाच्या विविध भागांत चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातही तसेच होते की काय, अशी स्थिती आहे. ऐक्य निर्माण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण, सरकार तसे काम करीत नसल्याची टीकाही त्यांनी केली. 

महाराष्ट्रात अनेक महापुरुष होऊन गेले. त्यांनी समतेचा संदेश दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी रयतेचे राज्य निर्माण केले. त्यांच्या राज्याभिषेकालाही काहीजणांनी विरोध केला. तोच वर्ग आज सामाजिक ऐक्याला धक्का देतोय. सर्वांनी एक होऊन सामाजिक ऐक्य टिकविले पाहिजे. आज देश एकसंघ आहे तो संविधानामुळे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले. बाबासाहेबांनी देशविकासासाठी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या विचारातूनच भाक्रा नानगलसारखी धरणे तयार झाली. पाण्यापासून वीजनिर्मितीला सुरुवात झाली. त्यांनी समतेचा विचार रुजवला. महात्मा फुले, शाहू महाराज यांनीही समता रुजविली, तो विचार टिकविण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. 

महायुतीने प्रत्येक मतदारसंघात पैसे  वाटले : रोहित पवार

समाजामध्ये भांडणे लावण्याचे काम काही व्यक्ती करत आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीने प्रत्येक मतदारसंघामध्ये ६० कोटी वाटले. काही ठिकाणी १०० कोटी, तर काही ठिकाणी १५० कोटी खर्च केल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी  केला. प्रचंड पैसे खर्च करूनही जनतेने त्यांना सामान्य माणसांची ताकद दाखवून दिली, असे मत व्यक्त केले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस