शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
2
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
5
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
6
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
7
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
8
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
9
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
10
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
11
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
12
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
13
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
14
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
15
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
16
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
17
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
18
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
19
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
20
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न

एकसंघ राष्ट्र निर्माणासाठी प्रयत्न करा! राज्यातील सामाजिक अशांततेबद्दल शरद पवारांना चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 05:45 IST

मणिपूरमध्ये सामाजिक अशांतता झाल्यानंतर पंतप्रधानांना तिकडे चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा असे कधी वाटले नाही. आजूबाजूच्या राज्यांतही हे घडले. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात काही घडेल की काय, अशी चिंता वाटते.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: मणिपूरमध्ये सामाजिक अशांतता झाल्यानंतर पंतप्रधानांना आपण तिकडे चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा असे कधी वाटले नाही. आजूबाजूच्या राज्यांतही हे घडले. खाली कर्नाटकातही घडले. अलीकडच्या काळातही महाराष्ट्रात काही घडेल की काय, अशी चिंता वाटते. जात, धर्म, भाषा याच्या पलीकडे जाऊन एकसंघ राष्ट्र निर्माणासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसच्याशरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे व्यक्त केले.

डॉ. मंगेश आमले यांनी येथे आयोजित केलेल्या सामाजिक ऐक्य परिषदेमध्ये शरद पवार यांनी भूमिका मांडली. देशाच्या विविध भागांत चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातही तसेच होते की काय, अशी स्थिती आहे. ऐक्य निर्माण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण, सरकार तसे काम करीत नसल्याची टीकाही त्यांनी केली. 

महाराष्ट्रात अनेक महापुरुष होऊन गेले. त्यांनी समतेचा संदेश दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी रयतेचे राज्य निर्माण केले. त्यांच्या राज्याभिषेकालाही काहीजणांनी विरोध केला. तोच वर्ग आज सामाजिक ऐक्याला धक्का देतोय. सर्वांनी एक होऊन सामाजिक ऐक्य टिकविले पाहिजे. आज देश एकसंघ आहे तो संविधानामुळे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले. बाबासाहेबांनी देशविकासासाठी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या विचारातूनच भाक्रा नानगलसारखी धरणे तयार झाली. पाण्यापासून वीजनिर्मितीला सुरुवात झाली. त्यांनी समतेचा विचार रुजवला. महात्मा फुले, शाहू महाराज यांनीही समता रुजविली, तो विचार टिकविण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. 

महायुतीने प्रत्येक मतदारसंघात पैसे  वाटले : रोहित पवार

समाजामध्ये भांडणे लावण्याचे काम काही व्यक्ती करत आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीने प्रत्येक मतदारसंघामध्ये ६० कोटी वाटले. काही ठिकाणी १०० कोटी, तर काही ठिकाणी १५० कोटी खर्च केल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी  केला. प्रचंड पैसे खर्च करूनही जनतेने त्यांना सामान्य माणसांची ताकद दाखवून दिली, असे मत व्यक्त केले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस