शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

पनवेलमधील आदिवासींच्या घशाला कोरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 3:26 AM

टॉवरवाडीही तहानलेली : गावच्या पायथ्याला धरण असूनही पाण्यासाठी भटकंती

नवी मुंबई : पनवेलला पाणीपुरवठा करणाऱ्या देहरंग धरणाच्या टेकडीवरील टॉवरवाडी आदिवासी पाड्यातील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. दोन्ही विहिरींनी तळ गाठला असून नागरिकांना धरणात खड्डे काढून तहान भागवावी लागत आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेलचे नाव देशाच्या नकाशावर गेले आहे. भविष्यात नैना परिसरामध्ये तब्बल २३ स्मार्ट सिटी तयार केल्या जाणार आहेत. पुढील पाच वर्षामध्ये तब्बल ६० हजार कोटी रूपयांची गुंतवणूक या परिसरामध्ये केली जात आहे. देशातील सर्वात वेगाने विकसित होणारा परिसर म्हणून पनवेल तालुक्याकडे पाहिले जात आहे. विकासाचे स्वप्न दाखविताना येथील समस्यांकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. सद्यस्थितीमध्ये पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. देहरंग धरणातून पनवेल शहराला पाणी पुरवठा केला जातो.जवळपास एप्रिलपर्यंत धरणातील पाणीसाठा शहराला पुरतो. परंतु याच परिसरातील आदिवासी पाड्यांना मात्र दोन हांडे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.सद्यस्थिती टॉवरवाडी आदिवासी पाड्यामध्ये पिण्यासाठी पाणीच नाही. गावातील दोन्ही विहिरींनी तळ गाठला आहे. १५० घरांमधील नागरिकांना पिण्यासाठीही पाणी उपलब्ध होत नाही. नागरिकांनी धरणामध्ये ठिकठिकाणी खड्डे काढून पाणी मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक वर्षी मे व जूनमध्ये भीषण टंचाईला जामोरे जावे लागत आहे. आदिवासींवरील हे संकट दूर करण्यात यावे, वर्षभर पुरेल अशाप्रकारे पाणी योजना राबविण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने या प्रश्नाकडे लक्ष देवून किमान पुढील वर्षभरामध्ये टॉवरवाडी पाणीटंचाईमुक्त होईल अशा प्रकारे योजना राबवावी व पाण्याची शोकांतिका थांबवावी, अशी विनंतीही रहिवाशांनी केली आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई