शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

रिक्षाचालकांकडून रेल्वेप्रवाशांची अडवणूक; वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2020 12:12 AM

आरटीओचे दुर्लक्ष

नवी मुंबई : शहरातील रेल्वे स्थानकांच्या प्रवेशद्वारावर रिक्षाचालक प्रवाशांवर अरोरावी करीत असून रस्त्यातच उभ्या असलेल्या रिक्षाचालकांमुळे स्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघनही होत असून, स्थानकाबाहेरील रस्त्यावर रिक्षा उभ्या करून रस्ता अडवला जात आहे. यामुळे वाहतूककोंडीची समस्याही उद्भवते. या प्रकाराकडे आरटीओचे आणि वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे.

२१ व्या शतकातील शहर म्हणून ओळखल्या जाणाºया नवी मुंबई शहरात शहराला साजेशा रेल्वेस्थानकांची निर्मिती करण्यात आली आहे. स्थानकाबाहेर वाहन पार्किंग, रिक्षा, टॅक्सी स्टॅण्डचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कामानिमित्त शहरातील आणि शहराबाहेरील हजारो नागरिक रेल्वेने प्रवास करून शहरातील विविध भागात ये-जा करतात. स्थानकांच्या बाहेर बेकायदा रिक्षास्टॅण्डची संख्या वाढली असून, यामुळे रेल्वे प्रवाशांना वाहने पार्किंग करताना विविध अडचणी निर्माण होत आहेत.

नेरुळ, जुईनगर, सानपाडा, तुर्भे आदी रेल्वे स्थानकांच्या प्रवेशद्वाराबाहेरील रस्त्यावर अनेक रिक्षाचालक रिक्षा उभ्या करीत असून, प्रवेशद्वारावर येऊन प्रवाशांना रिक्षाने प्रवास करायचा आहे का, याची विचारणा करीत आहेत. स्थानकाबाहेर उभ्या केल्या जाणाऱ्या रिक्षांमुळे वाहतूककोंडी होत असून, ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांची वाट अडवली जात असल्याने वादाचे प्रसंगही उद्भवत आहेत.

रिक्षाचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जात असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे. स्थानकाबाहेर रिक्षाचालकांकडून होणाºया अरेरावीमुळे प्रवासी त्रस्त असून, याबाबत कारवाई करण्याची मागणी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडे करण्यात येत आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसNavi Mumbaiनवी मुंबईMaharashtraमहाराष्ट्र