शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

स्वच्छतेअभावी प्रसाधनगृहांची दुरवस्था; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 23:54 IST

स्वच्छ सर्वेक्षण मोहीम संपताच महापालिकेचे दुर्लक्ष

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येते; परंतु मोहीम संपल्यावर स्वच्छतेचा विसर पडत असून, यामुळे लाखो रु पये खर्च करून बांधलेल्या प्रसाधनगृहांची दुरवस्था झाली आहे. प्रसाधनगृहांची स्वच्छता होत नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे.

अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून प्रसाधनगृह असताना नागरिकांनी त्याचा वापर बंद केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात स्वच्छ सर्वेक्षण मोहीम राबविली जात आहे. नवी मुंबई महापालिकेने शहर सुशोभित करण्यासाठी स्वच्छता, सुशोभीकरण, रंगरंगोटी, सार्वजनिक शौचालये. ई-टॉयलेट, शी-टॉयलेट असे विविध उपक्र म राबविण्यात येतात. या मोहिमेत नागरिकांचाही सहभाग असावा, यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.

२१ व्या शतकातील आधुनिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहराने स्वच्छतेत राज्यात पहिला क्र मांक पटकाविला आहे. या मोहिमेसाठी दरवर्षी महापालिकेच्या माध्यमातून लाखो रु पये खर्च केले जातात. अनेक ठिकाणी सार्वजनिक प्रसाधनगृहे उभारण्यात आली आहेत. स्वच्छता मोहिमेत या प्रसाधनगृहांना रंगरंगोटी केली जाते. प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेबरोबर विविध साहित्य पुरविण्यात येते. मोहीम संपल्यावर मात्र स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे.

नेरुळमधील डी. वाय. पाटील स्टेडियम आणि रु ग्णालय परिसरात बांधण्यात आलेल्या प्रसाधनगृहांची नियमित स्वच्छता होत नाही, त्यामुळे या ठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य पसरत आहे. स्वच्छता मोहिमेमध्ये ज्या प्रकारे स्वच्छता केली जाते, त्याप्रमाणे प्रसाधनगृहांची महापालिकेने नियमित स्वच्छता करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका