शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
3
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
4
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
5
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
6
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
7
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
8
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
9
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
10
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
11
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
12
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
13
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
14
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
15
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
16
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
17
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
18
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

अर्नाळा ते कर्नाळा समुद्रात बोटी नांगरून आज आंदोलन, पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यातील मच्छीमार-प्रकल्पग्रस्त एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 09:16 IST

गुरुवारी ता. २१ जानेवारीला जेएनपीटी समुद्र मार्गात थेट जहाज अडवली जाणार असल्याची माहिती हनुमान कोळीवाडा या प्रकल्पग्रस्त गावाचे सरपंच परमानंद कोळी  यांनी दिली. 

नवी मुंबई : कोकण किनारपट्टीवर मासेमारी करणारे सागरीपुत्र आणि शहराच्या विकासासाठी सरकारला जमिनी देणाऱ्या विस्थापित भूमिपुत्र प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन व्हावे, तसेच जेएनपीटी बंदरबाधितांचे पुनर्वसनही रखडले आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ गुरुवारी, ता.२१ रोजी एमएमआरडीए कार्यक्षेत्रातील सागरीपुत्र आणि भूमिपुत्र ‘अर्नाळा टू कर्नाळा’ असे समुद्रात उतरून विविध ठिकाणी आंदोलन करणार आहेत.‘रॉल्फ्स मूव्हमेंट’अंतर्गत कोकण किनारपट्टीवर अर्नाळा टू कर्नाळा क्षेत्रातील मच्छीमार आणि भूमिपुत्रांच्या विविध संघटनांनी आपल्या प्रमुख मागण्यांसाठी एकत्रित येऊन सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. त्यासंदर्भात वाशी गावात नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मंगळवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जेएनपीटी बंदराचा विकास १९८५ साली करताना अनेक कुटुंबे विस्थापित झाली. या कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी १७ हेक्टर जागा देण्याचे आश्वासन प्रकल्पग्रस्तांना देण्यात आले होते. प्रत्यक्षात तुटपुंज्या सुविधा देऊन जेएनपीटीकडून बोळवण करण्यात आली. मात्र अशा या अर्धवट पुनर्वसनाविरोधात प्रकल्पबाधितांनी आता ऐतिहासिक लढा उभारण्याचा निर्धार केला आहे.गुरुवारी ता. २१ जानेवारीला जेएनपीटी समुद्र मार्गात थेट जहाज अडवली जाणार असल्याची माहिती हनुमान कोळीवाडा या प्रकल्पग्रस्त गावाचे सरपंच परमानंद कोळी यांनी दिली. प्रकल्पग्रस्तांची दिशाभूलप्रशासकीय अधिकारी दिशाभूल करत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त करीत असून, त्यामुळेही पुनर्वसन रखडले आहे. आंदोलनाबरोबर वाढवण बंदरातील समस्यांवर आंदोलन करणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. १७ सागरी प्रकल्प मुंबई, पालघर, ठाणे, रायगड आणि नवी मुंबई परिसरात सुरू आहेत. यामध्ये जेट्टी, सागरी उड्डाणपूल, बंदर विकास, ऊर्जा प्रकल्प यांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांना मंजुरी देताना २०१३च्या प्रकल्पग्रस्त कायद्याच्या अनुषंगाने भरपाई मिळावी, अशी मागणी केली.मूलभूत हक्क नसलेले काही शासकीय अधिकारी, राजकीय नेते, व्यापारी यांनी कायद्याची दिशाभूल आणि धाक दाखवून कष्टकरी सागरीपुत्र आणि भूमिपुत्रांच्या जीवनावर बुलडोझर फिरविण्याचे षडयंत्र सुरू केले आहे.  - डॉ. गजेंद्र भानजी, राष्ट्रीय अध्यक्ष. नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमन्स

कोट्यवधी रुपये खर्चून वाशी खाडीपुलावरील चौथा उड्डाणपूल लवकरच बांधण्यात येणार आहे. त्यामुळे येथील मच्छीमारांचे पुनर्वसन करून त्यांना नुकसानभरपाई द्यावी, या मागणीसाठीदेखील विरोध करणार आहे.- दशरथ भगत, अध्यक्ष, नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था

टॅग्स :fishermanमच्छीमारthaneठाणेagitationआंदोलनNavi Mumbaiनवी मुंबई