शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

दोनशे मच्छीमारांवर बेघर होण्याची वेळ

By admin | Updated: May 22, 2017 02:16 IST

शहरातील कस्टम बंदरातील सुमारे १६ एकर जमिनीवर स्थानिक कोळी समाजाने अतिक्रमण केल्याप्रकरणी कस्टम विभागाने सुमारे २०० जणांना नोटिसा बजावल्या आहेत

आविष्कार देसाई । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : शहरातील कस्टम बंदरातील सुमारे १६ एकर जमिनीवर स्थानिक कोळी समाजाने अतिक्रमण केल्याप्रकरणी कस्टम विभागाने सुमारे २०० जणांना नोटिसा बजावल्या आहेत. १५ दिवसांमध्ये जमीन खाली न केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. कस्टम विभागाच्या या बडग्याने सुमारे तीन हजार लोकांचे संसार उद्ध्वस्त होणार असल्याने ते चांगलेच हवालदिल झाले आहेत.दर्यावरती कोणाचे राज्य असेल, तर ते कोळी, मच्छीमार समाजाचे. समुद्रामध्ये मासेमारी करून उदरनिर्वाह करणे, समुद्रालगतच वसाहती करून राहणे, अशी कोळी-मच्छीमार समाजाची ओळख. पूर्वी अलिबाग-रामनाथ परिसरात त्यांची वस्ती होती. त्यानंतर आताचे तुषार विश्रामगृह या ठिकाणी कोळी समाज राहत होता. मासेमारी करण्यासाठी तो पुढे पुढे सरकत अलिबाग कस्टम बंदराजवळ येऊन राहू लागला. या गोष्टीला तब्बल १२० वर्षांपेक्षा अधिक कालावधी आता झाला आहे. या ठिकाणी कस्टमचे कार्यालय आहे. त्यांच्याच मालकीच्या जागेमध्ये कोळी समाज वसाहती करून राहत आहेत. त्याच ठिकाणी मच्छी सुकविण्याचे ओटे बांधले आहेत. कस्टम विभागाकडे देशाच्या अंतर्गत इंटीलिजन्सचा विषय येतो. त्यामुळे त्यांना त्यांच्या जमिनीवर अशी कोणतीच अ‍ॅक्टिव्हिटी मंजूर नसल्याने या अतिक्रमण केलेल्या जागेचा वाद थेट अलिबाग येथील जिल्हा न्यायालयात पोहोचला होता. जिल्हा न्यायालयाने १९९६ साली कस्टम विभागाची जमीन असल्याचे मान्य करीत न्याय त्यांच्याच पारड्यात टाकला होता. त्यामुळे तेथे अतिक्रमण करून राहणारे जिल्हा न्यायालयात हरले होते. त्यानंतर कस्टम विभागाने जिल्हा न्यायालयाच्या आदेशावर कोणतीच कारवाई केली नाही. कस्टम विभागाची जागा असल्याचे सिद्ध झाल्याने कस्टम विभागाने सुस्कारा सोडला होता. कालांतराने परिस्थिती तशीच राहिली. कस्टमच्या जागेवर आणखीन घराची संख्या वाढत गेली.कस्टम विभागाचे उपायुक्त एम. जे. चेतन यांच्या लक्षात पुन्हा ही बाब आली. त्यांनी १९९६ साली जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आधार घेत, सर्व्हे नंबर १९३मधील अतिक्रमणधारकांना जमीन खाली करण्याबाबत नोटिसा काढल्या आहेत. १५ दिवसांमध्ये जमीन खाली न केल्यास अतिक्रमण तोडले जाईल, असा इशारा दिला. त्यामुळे कोळी समाजासह अन्य वस्तीतील नागरिकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.२०० घरांवर बुलडोझर फिरण्याच्या भीतीने कोळी समाज हवालदिल झाला आहे. ‘पिढ्यान्पिढ्या आम्ही येथे राहत आहोत. आमची घरदारे तोडल्यास आम्ही कोठे जाणार,’ असे स्थानिक प्रकाश भगत यांनीसांगितले.‘परंपरागत व्यवसाय करून आम्ही येथे उदरनिर्वाह करतो. या ठिकाणी आमचे पूर्ण आयुष्य गेले आहे. या ठिकाणी आमचे व्यवसाय आहेत. आमच्या घरांवर बुलडोझर फिरल्यास आमचे संसार उद्ध्वस्त होतील,’ असेही यशवंत बंदरी यांनी सांगितले.१कस्टमच्या कारवाईच्या भीतीने नेमकी कोणाची मदत घ्यायची? काय करायचे? यासाठी कोळी समाजाच्या बैठकांना जोर आला आहे. कोळी समाजाच्या काही प्रतिनिधींनी अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांचीही भेट घेतली. मात्र, त्यांच्याच सूचनेनुसार शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या पुढे गाऱ्हाणे मांडायचे ठरले असल्याचेही भगत यांनी सांगितले.२सर्व्हे नंबर १९३मध्ये सुमारे २०० घरे आहेत. तेथे कोळी समाजासह लमाणी समाजाचे लोकही वस्ती करून राहत आहेत. सुमारे तीन हजार लोक तेथे राहत आहेत. त्यांच्याकडे रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन्स, पाणी पट्टी, घरपट्टी, असे विविध पुरावे आहेत. बुलडोझर फिरल्यास संसार उघड्यावर येणार असल्याच्या भीतीने ते धास्तावले आहेत.३कस्टम विभाग हा केंद्र सरकाच्या अखत्यारित येत असल्याने, राज्य सरकारचा हस्तक्षेप चालणार नसल्याचे स्पष्ट होते. स्थानिक आमदार, खासदारांमार्फत दिल्ली दरबारी विनवणी करावी लागणार आहे; परंतु हा प्रश्न देशाच्या सुरक्षेबाबत निगडित असल्याने केंद्रीय गृह विभाग यातून काय मार्ग काढणार, हाही एक प्रश्नच आहे.४१९९३ साली मुंबईतील काही भागांमध्ये सीरियल बॉम्बब्लास्ट झाले होते. त्यासाठी वापरण्यात आलेली महाविध्वंसक आरडीक्स स्फोटके याच रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन-शेखाडी येथेच समुद्रमार्गाने उतरवण्यात आली होती. या बॉम्बस्फोटामध्ये शकडो निरपराध लोकांचे प्राण गेले होते, तर हजारो जखमी झाले होते. त्याचप्रमाणे कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचेही आर्थिक नुकसान झाले होेते. भविष्यात असे काही पुन्हा घडल्यास कस्टम विभागाच्या अखत्यारीतील जमीन, सीमा या सुरक्षेसाठी प्रतिबंधित असणे गरजेचे आहे.