शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

धुवाधार पावसात रविवारची धम्माल'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 2:00 AM

पावसाने सलग दुसऱ्या रविवारी हजेरी लावून निसर्गप्रेमींच्या उत्साहात भर टाकली आहे. नवी मुंबईत दिवसभरात ३९.६५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे

नवी मुंबई : पावसाने सलग दुसऱ्या रविवारी हजेरी लावून निसर्गप्रेमींच्या उत्साहात भर टाकली आहे. नवी मुंबईत दिवसभरात ३९.६५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, तर मोरबे परिसरातही कोसळणाºया पावसामुळे धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.शनिवारी मध्यरात्रीपासून राज्याच्या अनेक भागात सुरू झालेला पाऊस रविवारी रात्रीपर्यंत सुरू होता. यामुळे निसर्गप्रेमींचा रविवारच्या सुट्टीचा दिवस पावसाचा मनसोक्त आनंद घेण्यात गेला. नवी मुंबईत रविवारी दिवसभरात ३९.६५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये बेलापूर विभागात ३५ मि.मी., नेरुळ विभागात ३८.४ मि.मी., वाशी विभागात ४०.२ मि.मी. तर ऐरोली विभागात सर्वाधिक ४५ मि.मी. पाऊस पडला. मात्र दिवसभर पाऊस कोसळत असताना वारे नसल्याने वृक्ष कोसळल्याची अथवा इतर कोणती दुर्घटना घडल्याचा गंभीर प्रकार घडला नाही, तर अपवादात्मक ठिकाणे वगळता कुठेही पाणी तुंबल्याचाही प्रकार घडला नाही.मोरबे धरण परिसरातही अद्यापपर्यंत एकूण ४५३. ६० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे मागील काही दिवसात धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होवून ७६ मीटर झाली आहे. मात्र धरणातील पाण्याची क्षमता ८८ मीटरपर्यंतची असल्याने ते भरून वाहण्यासाठी परिसरात अद्यापही अधिक पावसाची आवश्यकता आहे.दिवसाची सुरवातच ढगाळ वातावरणामुळे झाल्याने अनेकांनी सकाळीच पावसाळी सहलीचा बेत आखून छोट्या-मोठ्या ठिकाणांकडे धाव घेतली. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव काही ठिकाणी पर्यटकांना प्रवेश करण्यास मज्जाव घालण्यात आलेला आहे. याकरिता त्याठिकाणी पोलिसांचाही चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.यामुळे काहींनी घराच्या आवारातच पावसात भिजून आनंद घेतला. त्यात लहान मुला-मुलींसह तरुणांचाही उत्साह दिसून आला. नवी मुंबईसह लगतच्या मुंबई, ठाणे परिसरातही दिवसभर पाऊस होता. यामुळे कामानिमित्ताने घराबाहेरपडलेल्यांची मात्र दैना होवून, ओलेचिंबहोवूनच त्यांना प्रवास करावा लागला.रविवारी सकाळपासून अविरत कोसळणाºया पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. ऐरोली, घणसोली आणि कोपरखैरणे परिसरात अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या. अनेक भागातील बैठ्या घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. नोसिल नाका येथील झोपडपट्टी जलमय झाली होती, तर घणसोली गवळीदेव डोंगर परिसरात ठिकठिकाणी झाडाच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या होत्या. या परिस्थितीत पालिकेच्या आपत्कालीन विभागाची चांगलीच धावपळ झाल्याचे दिसून आले.वादळी पावसाने आज सकाळपासून दिवसभर थैमान घातले. ठिकठिकाणी झाडाच्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडल्यामुळे काही भागातील विद्युतपुरवठा खंडित झाला होता. सुमारे तीन तासांच्या अथक परिश्रमाने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. ऐरोली सेक्टर २0 येथील स्मशानभूमीलगतचे गटार, दिघा बिंदुमाधव नगरातील मुकुंद कंपनीकडून आलेला नाला भरून ओसंडून वाहत होता. रबाले, कोपरखैरणे आणि घणसोली रेल्वे स्थानकाच्या पादचारी आणि वाहतूक भुयारी मार्गात पाणी साचल्याने पादचाºयांचे आणि वाहनधारकांचे हाल झाले. घणसोली गावातील गुनाले तलाव आणि छत्रपती शिवाजी महाराज तलाव भरल्याने त्यातील पाणी रस्त्यावर आले होते. घणसोली गावात ताराई नगरात सखल भागात पाणी साचले होते. ऐरोली सेक्टर ३ येथील बस स्थानकात सुमारे एक ते दीड फूट पाणी साचले होते. तर ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-नेरूळ, ठाणे-पनवेल आणि वाशी-ठाणे लोकलचे वेळापत्रक काहीसे कोलमडले.पावसाचा जोर वाढल्याने सायन-पनवेल महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे काही प्रमाणात वाहतुकीला फटका बसला आहे. कळंबोली, खारघर, हिरानंदानी, बेलपाडा, उरण फाटा या ठिकाणी रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे कोपरा उड्डाणपूल, कळंबोली, कामोठे बस थांबा, बेलपाडा आदी ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या कामामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा होत आहे. त्यामुळे महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले.