शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

दहा हजारांच्या टप्प्यावर कर्णधार बदलला, पालिका आयुक्तांची बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 23:51 IST

अभिजीत बांगर यांची २३ जूनला पहिल्यांदा नवी मुंबईत बदली केली, तेव्हा रुग्णसंख्या ५,०७२ होती.

नवी मुंबई : शहरातील परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यामुळे महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. २२ दिवसांमध्ये दुसऱ्यांदा बदलीनाट्य घडविण्यात आले आहे. अभिजीत बांगर यांची २३ जूनला पहिल्यांदा नवी मुंबईत बदली केली, तेव्हा रुग्णसंख्या ५,०७२ होती. दुसऱ्यांदा नियुक्ती होईपर्यंत हा आकडा तब्बल ९,९१७ झाला असून, दहा हजारांच्या टप्प्यावरून शहर कोरोनामुक्त करण्याचे आव्हान नवीन आयुक्तांसमोर उभे राहिले आहे.नवी मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. सुनियोजित शहरही कोरोनामुक्त करण्यात यश येत नसल्यामुळे, शासनाने २३ जूनला आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली केली होती, परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मनधरणी करूनही बदली थांबविली होती. राष्ट्रवादी काँगे्रसच्या नेत्यांकडेही बदली थांबविण्यासाठी स्थानिक पदाधिकाºयांनी आग्रह धरला होता. अखेर ४८ तासांमध्ये बदली रद्द करण्यात आली. पहिल्यांदा बदली नाट्य झाले, तेव्हा नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ५,०७२ एवढी होती. कोरोनामुळे १७७ जणांचे बळी गेले होते. पुढील २२ दिवसांमध्ये या रुग्णांमध्ये जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. १४ जुलैला रुग्णसंख्या ९,९१७ झाली असून, मृतांचा आकडा ३१० झाला आहे. मधल्या २२ दिवसांमध्ये तब्बल ४,८४५ रुग्ण वाढले असून, १३३ जणांचा मृत्यू झाला आहे. बदली नाट्यामुळे प्रशासनामध्ये अस्थिरता निर्माण झाली असून, त्याचा परिणाम कोरोना नियंत्रणाच्या कामावर झाल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे.कोरोनाचे आकडे दहा हजारांपर्यंत पोहोचले असताना, नवीन आयुक्त अभिजीत बांगर पदभार स्वीकारत आहेत. प्रशासनाची विस्कटलेली घडी बसविण्याचे आव्हान आयुक्तांसमोर असणार आहे. अनेक अधिकारी नवीन असल्यामुळे त्यांना नवी मुंबईमधील परिस्थितीची पूर्णत: माहितीच नाही. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाºयांची संख्या कमी आहे. सर्वसाधारण रुग्णालय बंद असल्यामुळे कोरोनाव्यतिरिक्त आजारांसाठीही नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे. खासगी रुग्णालयांकडून नागरिकांची लुबाडणूक सुरू आहे. लॉकडाऊन सुरू केला आहे, परंतु त्याची कोटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही. अनधिकृत फेरीवाल्यांवर कडक कारवाई होत नाही. नियम तोडणाºयांचा फटका नियम पाळणाºया नागरिकांना बसू लागला आहे.कोपरखैरणे, नेरुळ, ऐरोली, घणसोली या चार नोडमधील परिस्थिती हाताबाहेर गेली असून, आयुक्त ती पूर्वपदावर आणण्यासाठी काय करणार, याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.कोण आहेत अभिजीत बांगर ?नवनियुक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रामध्ये एम.ए.ची पदवी घेतली आहे. ते २००८च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. रायगडमधील माणगाव विभागाचे सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पालघरचे पहिले जिल्हाधिकारी, नागपूर महानगरपालिका आयुक्त, नागपूर विभागात अतिरिक्त विभागीय आयुक्तपदावर त्यांनी काम केले आहे.

दहा हजारांच्या टप्प्यावर कर्णधार बदलला, पालिका आयुक्तांची बदली : नवी मुंबई कोरोनामुक्त करण्याचे आव्हान नवी मुंबई : शहरातील परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यामुळे महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. २२ दिवसांमध्ये दुसऱ्यांदा बदलीनाट्य घडविण्यात आले आहे. अभिजीत बांगर यांची २३ जूनला पहिल्यांदा नवी मुंबईत बदली केली, तेव्हा रुग्णसंख्या ५,०७२ होती. दुसऱ्यांदा नियुक्ती होईपर्यंत हा आकडा तब्बल ९,९१७ झाला असून, दहा हजारांच्या टप्प्यावरून शहर कोरोनामुक्त करण्याचे आव्हान नवीन आयुक्तांसमोर उभे राहिले आहे.नवी मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. सुनियोजित शहरही कोरोनामुक्त करण्यात यश येत नसल्यामुळे, शासनाने २३ जूनला आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली केली होती, परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मनधरणी करूनही बदली थांबविली होती. राष्ट्रवादी काँगे्रसच्या नेत्यांकडेही बदली थांबविण्यासाठी स्थानिक पदाधिकाºयांनी आग्रह धरला होता. अखेर ४८ तासांमध्ये बदली रद्द करण्यात आली. पहिल्यांदा बदली नाट्य झाले, तेव्हा नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ५,०७२ एवढी होती. कोरोनामुळे १७७ जणांचे बळी गेले होते. पुढील २२ दिवसांमध्ये या रुग्णांमध्ये जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. १४ जुलैला रुग्णसंख्या ९,९१७ झाली असून, मृतांचा आकडा ३१० झाला आहे. मधल्या २२ दिवसांमध्ये तब्बल ४,८४५ रुग्ण वाढले असून, १३३ जणांचा मृत्यू झाला आहे. बदली नाट्यामुळे प्रशासनामध्ये अस्थिरता निर्माण झाली असून, त्याचा परिणाम कोरोना नियंत्रणाच्या कामावर झाल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे.कोरोनाचे आकडे दहा हजारांपर्यंत पोहोचले असताना, नवीन आयुक्त अभिजीत बांगर पदभार स्वीकारत आहेत. प्रशासनाची विस्कटलेली घडी बसविण्याचे आव्हान आयुक्तांसमोर असणार आहे. अनेक अधिकारी नवीन असल्यामुळे त्यांना नवी मुंबईमधील परिस्थितीची पूर्णत: माहितीच नाही. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाºयांची संख्या कमी आहे. सर्वसाधारण रुग्णालय बंद असल्यामुळे कोरोनाव्यतिरिक्त आजारांसाठीही नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे. खासगी रुग्णालयांकडून नागरिकांची लुबाडणूक सुरू आहे. लॉकडाऊन सुरू केला आहे, परंतु त्याची कोटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही. अनधिकृत फेरीवाल्यांवर कडक कारवाई होत नाही. नियम तोडणाºयांचा फटका नियम पाळणाºया नागरिकांना बसू लागला आहे.कोपरखैरणे, नेरुळ, ऐरोली, घणसोली या चार नोडमधील परिस्थिती हाताबाहेर गेली असून, आयुक्त ती पूर्वपदावर आणण्यासाठी काय करणार, याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.कोण आहेत अभिजीत बांगर ?नवनियुक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रामध्ये एम.ए.ची पदवी घेतली आहे. ते २००८च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. रायगडमधील माणगाव विभागाचे सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पालघरचे पहिले जिल्हाधिकारी, नागपूर महानगरपालिका आयुक्त, नागपूर विभागात अतिरिक्त विभागीय आयुक्तपदावर त्यांनी काम केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई